शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

खून, बलात्काराच्या घटनांमध्ये वर्षभरात वाढ

By admin | Updated: December 27, 2014 05:12 IST

खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, वर्षभरात या गुन्ह्यांचे तब्बल ‘अर्धशतक’ पूर्ण झाले आहे. राजकीय संघटनेच्या

मंगेश पांडे, पिंपरीखून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, वर्षभरात या गुन्ह्यांचे तब्बल ‘अर्धशतक’ पूर्ण झाले आहे. राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह कुख्यात गुंडाचा खून घटनेने शहरात कायदा-सुव्यवस्थे विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे अठरा लाख आहे. शहरात एकूण निगडी, पिंपरी, चिंचवड, सांगवी, हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी, वाकड अशी सात पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांचा आकडा वाढतच आहे. दिवसेंदिवस गुन्ह्यांचा आलेख वाढत असल्याने शहरवासीय भीतीच्या सावटाखाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत खुनाच्या एकूण ५० घटना घडल्या. यातील ४७ गुन्हे उघडकीस आले. व्यावसायिक वाद, प्रेमप्रकरणास विरोध, पूर्ववैमनस्य तसेच किरकोळ कारणावरून अधिकाधिक घटना घडल्या. खुनाच्या दोन घटनांमध्ये पिस्तुलांचा वापर झाल्याने शहरवासीय आणखीनच दहशतीखाली आले. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक १० खुनाच्या घटना घडल्या. चिंचवड पोलीस ठाण्यात सर्वांत कमी ४ गुन्ह्यांची नोंद झाली. वर्षभरात बलात्काराच्या तब्बल ५० घटना घडल्या. यामध्ये सर्वाधिक ११ घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनाही अधिक आहेत. यामध्ये बापाकडून स्वत:च्या मुलीवर अत्याचाराच्या केलेल्या घटनाही समोर आल्या. गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने तर सर्वत्र खळबळ उडाली. रेखाचित्राच्या साहाय्याने भोसरी पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. या घटना रोखण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना राबविण्याच्या घोषणा झाल्या. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे ठरले. मात्र, तरीही बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. विनयभंगाच्या घटनांचाही वाढता आलेख आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दुपटीने या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. १२७ गुन्हे दाखल झाले आहेत. चिंचवड ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक २८ गुन्ह्यांची नोंद आहे. महिलांमध्ये अधिक असुरक्षिततेचे वातावरण असून, त्यांना रस्त्यावर वावरणेही कठीण झाले आहे.प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनाही अधिक आहेत. यंदाच्या वर्षीच्या ११ महिन्यांत परिमंडळ तीनमध्ये ५६ गुन्हे दाखल झाले. हे उघडकीस येण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत घरफोडीचे एकूण ३८६ गुन्हे घडले. त्यांपैकी ११५ दिवसा, तर २७१ रात्री झाल्याची नोंद आहे. दरोड्याच्या तयारीतील तसेच घरफोडी करणाऱ्या टोळ्या जेरबंद करूनही घरफोडीचे प्रमाण कमी झालेले नाही.