शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

मंत्रिमंडळ बैठकीत दिली जाते जलसाठ्याची चुकीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:23 IST

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत.

- विशाल शिर्के पुणे : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत. राज्यातील ४६ मोठ्या आणि १६० मध्यम अशा २०६ प्रकल्पांची ३५ दिवसांच्या धरणसाठ्याची माहिती अद्ययावत केली जात नसल्याने, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चुकीची माहिती सादर केली जात असल्याचे समोर आले आहे.राज्यातील धरणसाठ्यांची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी राज्य सरकारने ‘प्रवाह’ नावाने अ‍ॅप तयार केला आहे. धरणसाठ्यांची माहिती भरण्यासाठी एक अधिकारीही आहे. त्याच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन ही माहिती भरल्यास राज्य सरकारच्या संकेतस्थळावर विश्लेषणासह ती माहिती अद्ययावत होत असते. मात्र संबंधित अधिकारी ही माहिती अद्ययावत करीत नसल्याची बाब समोर आली आहे.यासंदर्भात जलसंपदा विभागाने सर्व मुख्य अभियंत्याना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, धरण पाणीसाठ्याची माहिती दररोज अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही माहिती अद्ययावत न केल्यास सरकारची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितास जबाबदार धरण्यात येईल. जलसाठ्याची माहिती अद्ययावत न केल्याने सरकारकडे चुकीची माहिती सादर होत असल्याचे जलसंपदा ई प्रशासन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी म्हटले आहे.>दीड महिन्यात पंधरा टक्के जलसाठा घटलाअकोला: वºहाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील जलसाठा अवघ्या दीड महिन्यात १५ टक्के घटला असून, आता केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पुढे आणखी सात महिने काढायचे असल्याने टंचाईचा प्रश्न उभा ठाकणार आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३.४८ टक्के साठा होता. नोव्हेंबर उजाडताच यामध्ये घट झाली असून, ३ डिसेंबरला एकूण ४८.९४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.