शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मंत्रिमंडळ बैठकीत दिली जाते जलसाठ्याची चुकीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:23 IST

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत.

- विशाल शिर्के पुणे : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत. राज्यातील ४६ मोठ्या आणि १६० मध्यम अशा २०६ प्रकल्पांची ३५ दिवसांच्या धरणसाठ्याची माहिती अद्ययावत केली जात नसल्याने, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चुकीची माहिती सादर केली जात असल्याचे समोर आले आहे.राज्यातील धरणसाठ्यांची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी राज्य सरकारने ‘प्रवाह’ नावाने अ‍ॅप तयार केला आहे. धरणसाठ्यांची माहिती भरण्यासाठी एक अधिकारीही आहे. त्याच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन ही माहिती भरल्यास राज्य सरकारच्या संकेतस्थळावर विश्लेषणासह ती माहिती अद्ययावत होत असते. मात्र संबंधित अधिकारी ही माहिती अद्ययावत करीत नसल्याची बाब समोर आली आहे.यासंदर्भात जलसंपदा विभागाने सर्व मुख्य अभियंत्याना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, धरण पाणीसाठ्याची माहिती दररोज अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही माहिती अद्ययावत न केल्यास सरकारची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितास जबाबदार धरण्यात येईल. जलसाठ्याची माहिती अद्ययावत न केल्याने सरकारकडे चुकीची माहिती सादर होत असल्याचे जलसंपदा ई प्रशासन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी म्हटले आहे.>दीड महिन्यात पंधरा टक्के जलसाठा घटलाअकोला: वºहाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील जलसाठा अवघ्या दीड महिन्यात १५ टक्के घटला असून, आता केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पुढे आणखी सात महिने काढायचे असल्याने टंचाईचा प्रश्न उभा ठाकणार आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३.४८ टक्के साठा होता. नोव्हेंबर उजाडताच यामध्ये घट झाली असून, ३ डिसेंबरला एकूण ४८.९४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.