शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

विजेअभावी कांदालागवड खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:42 IST

रब्बी हंगाम : नित्याचे आठ तास भारनियमन; त्यानंतरही लपंडाव

शेलपिंपळगाव : खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रब्बी हंगामातील आर्थिक उत्पन्नाचा हुकमी एक्का अर्थात कांदालागवडीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र, लागवडीदरम्यान अधूनमधून वारंवार खंडित होणाऱ्या विजेअभावी कांदालागवडीची कामे खोळंबली आहेत. विजेचे झटके शेतकºयांना सहन करून लागवडीची कामे मार्गी लावावी लागत असल्याने लागवडीच्या काळात विद्युत महामंडळाने अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.

चालू वर्षी पावसाळी हंगामातील सुरुवातीच्या दोन महिन्यांत अल्प प्रमाणात वरुणराजाची कृपा झाल्याने पाण्याचे संकट निर्माण होऊ लागले होते. रब्बीतील कांदापीक शेतकºयांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. कांद्याच्या उत्पादनावर बळीराजाचे वार्षिक अर्थनियोजन अवलंबून असते. मात्र, यंदापावसाने दीर्घ काळ ओढ दिल्याने पाणीस्रोतांची पातळी खालावली आहे. परिणामी, कांदालागवडीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या उत्तर भागात परतीच्या मुसळधार वळवाच्या पावसाची कृपा होऊ लागल्याने शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या कांद्याची रोपे लागवडीसाठी परिपक्व होऊन लागवडीलायक झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर, यांत्रिक अवजारांच्या साह्याने शेतकरी जमिनींची मशागत करून ती लागवडयोग्य बनवून रब्बीची कामे हाती घेत आहेत. कांदालागवडीच्या कामांना मजुरांची टंचाई प्रकर्षाने जाणवत असून, लागवडीसाठी परगावाहून मजूर बोलवावे लागत आहेत. परिणामी, शेतकºयांना मजुरांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. आर्थिक झळ सोसून सुरू असलेल्या लागवडीदरम्यान वीज गायब होत असल्याने मजुरांना बसवून ठेवण्याची वेळ आली आहे.कांदारोपे उपलब्ध...चालू वर्षीच्या रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या रोपांचा तुटवडा जाणवत नसल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होऊ लागली आहे. खेड तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मागील वर्षीच्या रब्बी हंगामाच्या शेवटी-शेवटी कांद्याच्या बियाण्यांसाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांद्याच्या गोठाची लागवड केली होती. हवामानाने साथ दिल्याने त्यापासून बियाण्यांचे उत्पादन मिळविण्यात शेतकºयांनाही यश मिळाल्याने चालू वर्षी मोठ्या प्रमाणात रोपांची टाकणी झालेली आहे. परिणामी, कांदालागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्यास अधिक मदत होत आहे.चासकमान धरणातील पाण्याचा फायदा...खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला नेहमीच चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातील पाण्याचा फायदा होतो. चालू वर्षी धरण पाणलोट क्षेत्रात वरुणराजाने कृपा केल्याने चासकमान धरण १०० टक्के भरले आहे. जीवनदायिनी पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरीवर्गातही आनंदाचे वातावरण आहे. 

टॅग्स :Puneपुणे