शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा फटका

By admin | Updated: February 28, 2015 23:19 IST

सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज पहाटे ५.४५ वा. पावसाच्या सरी पडल्या. त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यानंतर पुन्हा पावसाच्या तुरळक सरी सुरू झाल्या.

पेठ : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात आज पहाटे ५.४५ वा. पावसाच्या सरी पडल्या. त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यानंतर पुन्हा पावसाच्या तुरळक सरी सुरू झाल्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अचानक आलेल्या पावसाच्या सरी व दिवसभर असलेले ढगाळ वातावरण यामुळे हवामन बदलाचा शेतीपिकांवर परिणाम होणार असून, मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान होणार असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत.शेतकऱ्यांची या अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. सातगाव पठार भागातील पारगाव, पेठ, कारेगाव, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी व कुरवंडी या सर्वच गावांत पावसाच्या सरिंनी हजेरी लावली. या भागातील ज्वारी पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली असून, काढून झालेली ज्वारीची कणसे तसेच कडबा हा शेतातच होता. अचानक आलेल्या पावसाने ही ज्वारी तसेच कडबा पावसाने भिजणार आहे. शेतकऱ्यांनी या कडब्यावर तसेच कणसांवर प्लॅस्टिक कागद टाकण्यासाठी लगबग सुरू केली आहे.ज्वारी पिकांबरोबरच सध्या या गावांमध्ये उन्हाळी बाजरी काढणी चालू असून, बाजरीची कणसे शेतातचच आहेत, ती पावसाने भिजू नये, तसेच शेतात साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांदा पावसाने भिजू नये, यासाठी कणसावर तसेच कांद्यावर झाकण टाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. ज्वारीची कणसे काढून झाल्यानंतर ती उन्हात वाळवून मग त्याची मळणी केली जाते. मात्र, आता या ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे बहुतांशी शेतकऱ्यांची शेतातील ज्वारीची कणसे ही पावसाने भिजली असून, जोपर्यंत कडक ऊन पडत नाही तोपर्यंत या ज्वारीच्या कणसांची मळणी करता येणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले. एकंदरच अचानक आलेला पाऊस व ढगाळ हवामान यांमुळे शेतीपिकाच्या उत्पादनाला याचा चांगलाच फटका बसणार असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील अवकाळी फटक्यातून शेतकरी सावरला नसतानाच पुन्हा अवकाळी फेरा आला आहे. (वार्ताहर)४सासवड : गेले आठवडाभर सासवडसह पुरंदरमध्ये तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आज (दि. २८) सायंकाळी सर्वत्र अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले होते व सायंकाळी ५ च्या सुमारास पाऊस सुरू झाला. या पावसामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन किमान तापमान ११; तर कमाल तापमान २६.२ इतके नोंदण्यात आल्याचे आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या वेधशाळेचे व्यवस्थापक नितीन यादव यांनी सांगितले. ४सायंकाळी झालेला अवकाळी पाऊस २ मि.मीटर नोंदला गेल्याचे यादव यांनी सांगितले .या पावसाने रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेल्या अनेक पिकांना धोका निर्माण झाल्याने बळिराजा मात्र धास्तावला आहे. काढणीस आलेला कांदा, गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना फटका बसणार आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजीर, डाळिंब व तत्सम फळझाडांना हानी पोचणार असल्याचे माळशिरसचे शेतकरी भास्कर यादव यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. शेतकऱ्यांची धांदल४दावडी : दावडी परिसरात हलक्या सरी व ढगाळ हवामानामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शेतातील हातातोंडाशी गहू, तांदळाची पिके काढण्याची शेतकऱ्यांची धांदल उडाली.पिकांचे नुकसान४खळद : पुरंदर तालुक्यात सासवड, खळद परिसरात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वेळी या पावसाने आंब्याच्या मोहरासह अनेक पिकांना फटका बसला. याने शेतकरी हवालदील झाला आहे.४ आज सकाळपासूनच ढगाळ हवामान होते, तर हवेत प्रचंड गारवा जाणवत होता. सध्या शेतात ज्वारी, हरभरा काढणीची कामे सुरू आहेत, तर अनेकांची वैरण, ज्वारीची कणसे, काढलेला हरभरा, कापलेला गहू शेतात पडून असल्याने अचानक पाऊस आल्याने पावसाने याचे नुकसान झाले, तर या वेळी शेतकऱ्यांची प्रचंड धांदल उडाली. ४ यंदा आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहर आला असून, यालाही या अवकाळी पावसाचा फटका बसेल. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.