शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

बहुमत असूनही भाजपच्या हाती ‘धुपाटणे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST

निलेश राऊत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा करण्याचा अधिकार महापालिकेचाच ...

निलेश राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा करण्याचा अधिकार महापालिकेचाच आहे,” असा हट्ट धरून स्वत:ला हवा तसा विकास आराखडा तयार करण्यासाठी खास सर्वसाधारण सभा बोलविणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपला राज्य सरकारने चांगला दणका दिला. गुुरूवारी (दि. १५) आयोजित खास सभेच्या आदल्या दिवशीच बुधवारी (दि. १४) विकास आराखडा करण्याचे महापालिकेचे अधिकार राज्य शासनाने काढून घेतले. त्यामुळे ‘तेल गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे’ अशी गत महापालिकेतील सत्ताधारी भाजपाची झाली आहे.

महापालिका हद्दीत नव्याने २३ गावांचा समावेश करण्याची अधिसूचना राज्य शासनाने ३० जून रोजी काढली. त्यामुळे या गावांचे सर्वाधिकार महापालिकेकडे आले असल्याचे सांगत, सत्ताधारी भाजपाने अवघ्या बारा दिवसातच या गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी खास ऑनलाईन सर्वसाधारण सभा बोलावली. या सभेसाठी भाजपाच्या सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याकरता ‘व्हीप’ काढण्यात आला होता.

दरम्यान, महापालिका हद्दीत तीन वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या ११ गावांचाही विकास आराखडा सत्ताधारी भाजपा तयार करु शकला नाही. मग या नव्या २३ गावांबाबत एवढी घाई का, असे म्हणत प्रमुख विरोधकांनी या खास सभेवरच आक्षेप घेतला. पण बहुमताच्या जोरावर ही सभा घेऊन विकास आराखड्याचा ठराव करू या आत्मविश्वासात सत्ताधारी भाजप मश्गुल राहिला. ‘पीएमआरडीए’ने या गावांचा यापूर्वी तयार केलेला प्रारूप विकास आराखडाही झुगारून लावत, आम्हीच तो आराखडा तयार करणार अशी भूमिका सत्ताधारी भाजपाने घेतली होती.

प्रत्यक्षात राज्य सरकारने भाजपचा हा मनसुबा एका रात्रीत हाणून पाडला. बुधवारी सकाळीच या २३ गावांना अविकसित क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात आले. या गावांच्या विकासासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्तीही केली. या माध्यमातून २३ गावांच्या विकास आराखड्याकरता होणाऱ्या खास सर्वसाधारण सभेची हवाच काढून घेतली.

चौकट

भाजपाची ‘पायावर कुऱ्हाड’

महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांचा ‘पीएमआरडीए’ने तयार केलेला प्रारूप विकास आराखडा स्विकारला असता तर महापालिकेला या विकास आराखड्यात हव्या तशा सुधारणा व बदल करून स्वत:ला हवे असलेले मनसुबे अंमलात आणणे शक्य झाले असते. पण ‘आम्हीच विकास आराखडा तयार करणार’ अशी भूमिका घेत पीएमआरडीएचा विकास आराखडा नाकारून सत्ताधारी भाजपाने हा मार्ग बंद केला आणि स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली अशी कुजबुज त्यांच्याच पक्षात सुरू झाली आहे.