शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
3
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
4
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
5
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
6
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
7
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
8
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
9
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
10
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
11
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
12
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
13
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
14
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
15
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
16
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
17
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
18
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
19
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
20
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन

शुल्क नियंत्रण कायद्यात होणार सुधारणा

By admin | Published: May 07, 2017 3:33 AM

शुल्क नियंत्रण कायद्यातील उणिवा तपासून त्यात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ही समिती शुल्कवाढीवरील

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शुल्क नियंत्रण कायद्यातील उणिवा तपासून त्यात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ही समिती शुल्कवाढीवरील तक्रारींचा अभ्यास करून त्यात सुधारणा करण्याबाबतचा अहवाल पुढील पंधरा दिवसांत सादर करणार आहे. त्यामुळे शाळांकडून वाढविल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्कवाढीला आळा बसणार आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम म्हणजे शुल्क नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी डिसेंबर २०१४ पासून करण्यात आली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार विभागीय शुल्क नियंत्रण समिती व पुनरिक्षण समितीही वर्षभरापूर्वी स्थापन करण्यात आल्या आहेत. या कायद्यांतर्गत शिक्षणाधिकारी, तसेच विभागीय समितीकडे शुल्कवाढीसंदर्भात पालकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. मात्र, कायद्यातील तरतुदीनुसार वैयक्तिक पालकांना विभागीय समितीकडे तक्रार करता येत नाही. शाळेतील शिक्षक-पालक संघाच्या कार्यकारी समितीने शुल्कवाढ नाकारल्यास व्यवस्थापनालाच विभागीय समितीकडे तक्रार करता येते. पालक कार्यकारी समितीकडे आपली तक्रार करू शकतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर पालक संघटनांच्या म्हणण्यानुसार, वैयक्तिक पालकही शुल्कवाढीसंदर्भात तक्रार करू शकतात. या मुद्यावर पुण्यात अधिकारी व पालकांमध्ये अनेकदा वादावादीही झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी राज्य शासनाच्या विधी विभागाचा सल्ला घेऊन पालकांच्या तक्रारींवर निर्णय घेण्याचे आश्वासन पालकांना दिले आहे. कायद्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत आलेल्या तक्रारींचा विचार करून राज्य शासनाने कायद्यातील उणिवा दूर करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पुनरिक्षण समितीचे अध्यक्ष व्ही. जी. पळशीकर या समितीचे अध्यक्ष असतील, तर मुंबईच्या विभागीय शुल्क नियंत्रण समितीचे सदस्य कृष्णप्रसाद रामचंद्र वॅरिअर, मोहन आवटे, प्राथमिक शिक्षण संचालक, मुंबईचे विभागीय उपसंचालक, विधी व न्याय विभागाचे सहसचिव, दोन शाळांचे प्रतिनिधी, दोन पालक प्रतिनिधी समितीचे सदस्य असतील, तर शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.शुल्कवाढीसंदर्भात प्राप्त झालेल्या विविध तक्रारींचा ही समिती अभ्यास करणार आहे. या तक्रारींसह शैक्षणिक धोरण व कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून कायद्यात आवश्यक सुधारणा सुचविल्या जाणार आहेत. याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचा आदेश शासनाने दिला आहे.