शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेल्वे रूळावर जनावरे सोडणाऱ्यांना कारावास : कृष्णाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 19:54 IST

जनावरे रेल्वे रूळाकडे सोडणाऱ्या मालकांना पाच वर्षांचा कारावास आणि दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे पुणे वरिष्ठ मंडलचे वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी दिला आहे.  

ठळक मुद्देरेल्वेच्या हद्दीत कचरा टाकल्यास ५०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आतापर्यत ५ हजार पत्रके वाटून नागरिकांमध्ये जागृतीचे काम

पुणे : रेल्वेच्या हद्दीत कचरा टाकणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणी टाकताना आढळल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वारंवार जनावरे रेल्वे रूळावर येतात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. जनावरे रेल्वे रूळाकडे सोडणाऱ्या मालकांना पाच वर्षांचा कारावास आणि दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे पुणे वरिष्ठ मंडलचे वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी दिला आहे.  कृष्णाथ पाटील म्हणाले, जनावरे रेल्वे रूळावर येण्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांत वारंवार अशा घटना घडल्या आहेत. रेल्वे अधिनियम १४७, १५३ आणि १७४ प्रमाणे गुन्हा आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनी बेकायदेशीर रेल्वे रूळ ओलांडू नये. रेल्वे फूटब्रीजचा वापर करावा. तसेच रेल्वेच्या हद्दीत कचरा टाकल्यास ५०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे पुणे मंडलच्या वतीने पुणे स्टेशन, शिवाजीनगरसह लोणावळा, दौंड  पिंपरी, निगडी, हडपसर, केडगाव स्टेशन परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यत ५ हजार पत्रके वाटून नागरिकांमध्ये जागृतीचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे नागरिकांनी यापुढे काळजी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासी