शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

महत्त्वाची कागदपत्रे झाली खाक!

By admin | Updated: March 9, 2015 00:43 IST

शनिवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बारामती नगरपालिकेच्या तळमजल्यावरील नगररचना

बारामती : शनिवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बारामती नगरपालिकेच्या तळमजल्यावरील नगररचना, जागा भाडे, संगणक कक्ष, लेखा विभाग, घरपट्टी, आस्थापना विभागाची महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. अंदाजे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे पालिकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाले आहे, असे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले.आग लागल्याचा प्रकार दहा वाजण्याच्या सुमारास शेजारी नवीन प्रशासकीय इमारतीचे काम चाललेल्या कामगारांना लक्षात आला. त्यांनी सुरक्षारक्षकाला याबाबत माहिती दिली. तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. बांधकाम व नगररचना विभागाच्या बाजूने आगीचे लोट खिडकीतून बाहेर येत होते. संगणक कक्षाचे फारसे नुकसान झालेले नाही. त्याचबरोबर जुने ब्रिटिशकालीन रेकॉर्ड, नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सुरू असल्यामुळे व्यापार संकुलात स्थलांतरित करण्यात आले आहे. आग विझविण्यासाठी नगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी, एमआयडीसी अग्निशमन विभाग, माळेगाव कारखाना, छत्रपती कारखाना आदी भागातील अग्निशमन बंबाने जवळपास एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर यश आले. महत्त्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली. उर्वरित कागदपत्रे पाण्यामुळे भिजली आहेत. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. आगीचे कारण काय, याबाबत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. आज नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, खातेप्रमुख, मुख्याधिकारी, नगरसेवक आदींच्या उपस्थितीत आगीतून बचावलेली कागदपत्रे बाजूला काढण्यात आली. खातेप्रमुखदेखील या कामासाठी जुंपले होते. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, नगरसेवक किरण गुजर, शाम इंगळे, बापू बागल, सुनील सस्ते, शाकीर बागवान, भाजपाचे अ‍ॅड. नितीन भामे, रासपचे किशोर मासाळ, मनसेचे विनोद जावळे, माजी नगराध्यक्षा मंगल शहा सराफ यांच्यासह आजी माजी नगरसेवक, मुख्याधिकारी झिंजाड, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, महावितरणचे परिमंडल कार्यकारी अभियंता इरवाडकर, उपअभियंता देवकाते, मोकाशी, पोलीस कर्मचारी, अधिकारी, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, खातेप्रमुख आदींनी आग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यामुळे अधिकचे नुकसान टळले. नगरपालिकेच्या आवारातील वाहनांमुळे आग विझविण्यात अडथळे आले. अग्निशमन बंब आत आणण्यात अडचणी आल्या. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जळाली. (प्रतिनिधी)