शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ग्रामस्थांना पटले महापालिकेचे महत्त्व

By admin | Updated: May 30, 2017 03:00 IST

गेल्या २० वर्र्षांपूवी महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा काही प्रमाणात मिळत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहडपसर : गेल्या २० वर्र्षांपूवी महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा काही प्रमाणात मिळत आहेत. हे पाहून महापालिकेतून वगळलेल्या गावांतील नागरिकांना त्याचा हेवा वाटणे स्वाभाविक आहे. त्यावेळी मात्र याच गावातील मंडळींनी महापालिकेत जाण्यासाठी विरोध केला होता. आता परिस्थिती बदलली आहे. महापालिकेचे महत्त्व नागरिकांना कळले आहे.आजही सामाजिक दडपणामुळे गावकरी महापालिकेत जाण्यासाठी तयार आहेत, अशी कुजबूज सुरू आहे. महापालिकेत या गावांचा समावेश केल्यानंतर उरलीसुरली शेतीही नष्ट होऊन काँक्रिटचे जंगल उभे राहील, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ग्रामपंचायतीचे रडगाणे आणि स्थानिक नेतेगिरी करणाऱ्यांचा आता वीट आला आहे, अशी भावना नागरिकांकडून बोलून दाखवली जात आहे. गावच्या विकासाचे नियोजन नाही. पंचायतराजमुळे गावचा विकास व्हायला पाहिजे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून मिळणारा निधीतून गावचा विकास करणे शक्य आहे. मात्र तसे होत नाही.ग्रामपंचायतीमध्ये १७-१८ जणांना ग्रामपंचायत सदस्यपदाचा मान मिळतो, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्येही सन्मान मिळतो. महापालिकेत गेल्यानंतर फक्त एक किंवा दोघांना नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किरकोळ तातडीने मार्गी लावता येणे सहज शक्य होत नाही. मात्र, तीच कामे महापालिकेच्या प्रशासनाकडूंन करून घेता येते. केंद्र शासनाने आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी चांगले प्रकल्प साकारले जात आहेत. शिक्षणासाठी अनेक लाभदायी योजना आहेत. महापालिका हद्दीपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांना गरजेनुसार पिण्यासाठी पाणी दिले जात आहे. बांधकामासाठी जागा नसल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकालगतच्या गावाकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे उपनगरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार वाढत आहे, मात्र त्यांना सुविधा पुरविता येत नाहीत. स्थानिकांची दादागिरी वाढली. बाहेरील नागरिक स्थायिक झाले आहेत, त्याना येथील स्थानिकांचा फार त्रास होत आहे, पालिकेत समाविष्ट करण्याऐवजी काहींनी स्वतंत्र महापालिका व्हावी, अशी मागणी केली आहे.पालिका हद्दीत एक गुंठा जागा खरेदीला रितसर मान्यता आहे. यामुळे शहरालगतच्या गावांचा समावेश पालिकेत झाल्यास नव्याने खरेदी होणाऱ्या गुंठेवारीला शासकीय मान्यतेची मोहर आपोआपच लागू शकेल.- तेजस हरपळे, बांधकाम व्यावसायिकपालिकेत गावे समाविष्ट झाल्याने सुविधा कमी मिळाल्या, पण पालिकेच्या नियमावलीमुळे अनधिकृत बांधकामांवर निर्बंध आले आहेत. - रूपेश पिसाळ, मुंढवास्थानिक लोकांचा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आमच्यासारख्या लोकांना त्रास होतो. कोणतेही काम स्थानिक आहे की बाहेरचा, हे पाहूनच केली जातात, त्यामुळे पालिका प्रशासन चांगले वाटते. - रवींद्र कांबळे, भेकराईनगरगावे समाविष्ट झाल्यास नव्या महापालिका स्थापनेचे वारे वेगाने वाहू लागणार, हे निश्चित झाले आहे. पूर्वी समाविष्ट केलेल्या गावांना काही प्रमाणात मूलभूत सुविधा मिळाल्या आहेत.- सागर रासकर, वाडाचीवाडी