शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वाडा परिसरात पर्यटन क्षेत्राला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:09 IST

वाडा परिसरात पर्यटन क्षेत्राला खीळ बसली आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक उपाशीपोटी घरात बसून आहेत. वाडा परिसरातील मंदिरे, धरणे, निसर्गरम्य ...

वाडा परिसरात पर्यटन क्षेत्राला खीळ बसली आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक उपाशीपोटी घरात बसून आहेत. वाडा परिसरातील मंदिरे, धरणे, निसर्गरम्य परिसरात फिरायला बंदी आहे. त्यामुळे पर्यटक दुर्मिळ झाले आहेत. पर्यायाने सर्व छोटे मोठे व्यावसायिक चिंतेत आहेत.

बारा ज्योतिर्लिंग आहेत. त्यात श्रीक्षेत्र भीमाशंकरचा समावेश होतो. पण मंदिर बंद असल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. हजारो नागरिक भीमाशंकर येथील मंदिराजवळ व्यवसाय करून पोट भरत होते. कोरोनाच्या महामारीत उपाशी राहण्याची वेळ आली आहे. हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. पानफुलवाले, प्रसाद दुकानमालक, पुजारी, गॅरेज दुकानदार असे हजारो नागरिक कामाविना बेकार झाले.

त्यात चक्रीवादळ आले. दुष्काळात तेरावा महिना आला. घरांचे छत्र उडून गेले. भिंती पडल्या. नागरिक बेघर झाले. तोंडावर पावसाळा आला. अशा परिस्थितीत जिणे मुश्कील झाले. कोविडमुळे निष्पाप जीव गेले. लस मिळत नाही. अशा कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.

चासकमान धरण परिसरातील हॉटेल बंद असल्याने व्यावसायिक संकटात सापडले आहेत.