शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जनजागृतीचा परिणाम : हौद व टाकीतील विसर्जनाला वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 02:21 IST

नदीपात्र प्रदूषित होत असल्यामुळे त्यात मूर्ती विसर्जित न करण्याच्या आवाहनाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे.

पुणे - नदीपात्र प्रदूषित होत असल्यामुळे त्यात मूर्ती विसर्जित न करण्याच्या आवाहनाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे. यंदाच्या वर्षी नदीपात्रात १ लाख ३ हजार ६७५ मूर्तींचे विसर्जन झाले, तर हौद व टाक्यांमध्ये तब्बल ३ लाख १८ हजार ४६४ मूर्ती विसर्जित झाल्या. एकूण ६७६ टन निर्माल्य जमा झाले.शहरात सहा लाखांपेक्षा अधिक मूर्तीची दरवर्षी प्रतिष्ठापना होत असते. मूर्ती विसर्जन करण्यासाठी हौदांची व्यवस्था महापालिका करते. शहरातील १८ घाटांवर, तसेच २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. ६५५ पेक्षा अधिक निर्माल्य कलश, तसेच १ हजार ३५९ कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले होते. ५ लाख २७ हजार ३१९ गणेश मूर्तींचे यावर्षी ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. त्यातील घाटांवर ५५ हजार ६९० मूर्ती विसर्जित झाल्या. हौदात १ लाख १९ हजार ७२ व टाक्यांमध्ये १ लाख १९ हजार ३९२ मूर्तींचे विसर्जन झाले. नदीपात्रात १ लाख ३ हजार ६७५, तर कॅनॉलमध्ये १ लाख ९ हजार ८७३ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. तलाव व विहिरींमध्ये अनुक्रमे ११ हजार ४३० व २ हजार ९८१ मूर्तींचे विसर्जन झाले. एका प्रायोजकाने दिलेल्या हौदांमध्ये ५ हजार ९३ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. विसर्जनाची सर्व ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सुरक्षित करण्यात आली होती. नदीपात्राच्या ठिकाणी एकूण २ हजार ४०१ जीवरक्षक नियुक्त होते. स्वच्छता कर्मचाºयांचीही स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेचे एकूण ९ हजार कर्मचारी स्वच्छतेपासून ते मंडळांच्या स्वागत कक्षापर्यंत राबत होते. पोलीस तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेतील या कर्मचाºयांनीही जबाबदारी पार पाडली.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन