शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात

By admin | Updated: March 28, 2017 23:55 IST

पुणे जिल्हा परिषदेत ८०३ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, या रिक्त

घोडेगाव : पुणे जिल्हा परिषदेत ८०३ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, या रिक्त जागा भरण्यासंदर्भात प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज यांनी केली आहे.शैक्षणिक वर्ष सुरू होऊन ८ महिने झाले व शैक्षणिक वर्ष संपण्यास ३ महिने शिल्लक असताना जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा न भरल्यामूळे विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षात नुकसान झाले. जिल्हा परिषदेचे रोस्टर निश्चित करण्याचे काम दोन ते तीन वर्षांपासून चालू आहे. यामुळे जिल्हा बदलीने अनेक शिक्षक जिल्ह्यात येण्यास उत्सुक असूनही केवळ रोस्टरचे काम अपूर्ण असल्याने त्यांना पुणे जिल्हा परिषदेत सामावून घेता येत नाही.त्यातच अनेक शिक्षक जिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात जात असल्याने व त्यांच्या रिक्त जागा भरल्या जात नसल्याने यात अजूनच भर पडत आहे. पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ३,१७४ प्राथमिक शिक्षक असून त्यामध्ये सुमारे ९,५३७ उपशिक्षक काम करीत आहेत. समानीकरणाच्या बदल्या काही जिल्ह्यांत झाल्या नाहीत; परंतु पुणे जिल्हा परिषदेने समानीकरणाच्या बदल्या केल्याने व आंबेगाव, खेड, जुन्नर या ३ तालुक्यांतील बिगरआदिवासी भागातील जागा रिक्त ठेवल्याने तसेच तालुकाअंतर्गत प्रशासकीय बदल्यांमध्ये या जागा न भरल्याने संपूर्ण वर्षभर या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.दुर्गम, डोंगरी व आदिवासी भागात सोयीसुविधांचा अभाव असतो, गोरगरिबांची मुले घरच्या परिस्थितीमुळे तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांत मोफत शिक्षण मिळत असल्याने शिक्षण घेतात. खासगी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा यांच्या प्रवेशाबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळांत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या रोखण्यास मदत होणार आहे.याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेला आंतरजिल्हा बदलीबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे रोस्टरचे काम अपूर्ण असल्याने आंतरजिल्हा बदलीचा ग्रामविकास विभागाचा आदेश फक्त कागदावरच राहिला आहे. यासाठी रोस्टरचे काम लवकर पूर्ण करून आंतरजिल्हा बदलीतून पुणे जिल्हा परिषदेमध्ये येऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना त्वरित समावून घेतले जावे, अशी मागणी दत्तात्रय वाळुंज यांनी केली आहे.(वार्ताहर)रोस्टर अपूर्ततेचे कारण...प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे शैक्षणिक अर्हता असून व पात्र असूनही शिक्षकांना सेवाज्येष्ठतेचा लाभ घेता येत नाही. रोस्टरचे कारण दाखवून व रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला केवळ प्रशासनच कारणीभूत ठरले आहे. मे २०१६मध्ये प्रशासकीय बदली प्रक्रिया राबविल्यानंतर ५७१ उपशिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. जून ते आजअखेर जिल्हा बदलीने अनेक शिक्षक स्वजिल्ह्यात बदलीने तसेच अन्य कारणांमुळे गेल्याने उपशिक्षकांच्या रिक्त जागा वाढल्या आहेत. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात आजअखेर उपशिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात किंवा पदोन्नती प्रक्रिया राबविल्यास प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही रोस्टर अपूर्ततेच्या कारणास्तव होऊ शकली नाही.