शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आभास : पृथ्वीराज चव्हण; पुण्यात साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:14 IST

पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंजाब नॅशनल बँक, हायपरलूप तंत्रज्ञान कोरेगाव भिमा येथील दुर्घटना यासह मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या गुंतवणीच्या व रोजगाराच्या आकडेवारीवर टीका केली.

ठळक मुद्देशासनाकडून गुंतवणूकीची व रोजगाराची फसवी आकडेवारी जाहीर : पृथ्वीराज चव्हाण'गेल्या पाच वर्षात राज्याचा सरासरी विकासदर ७.३ टक्के'

पुणे : मेक इन इंडिया व मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे सादर करून राज्य शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा केवळ आभास निर्माण केला आहे. मात्र, राज्याच्या कृषी व अर्थ व्यवस्थेचे कंबरडे मोडले असून राज्यातील बेरोजगारी वाढत चालेली आहे. परंतु, अनावश्यक प्रकल्प उभे करून जनतेवर विविध करांचा बोजा लादला जात आहे. शासनाकडून गुंतवणूकीची व रोजगाराची फसवी आकडेवारी जाहीर केली जात आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पुण्यात केला.शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंजाब नॅशनल बँक, हायपरलूप तंत्रज्ञान कोरेगाव भिमा येथील दुर्घटना यासह मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या गुंतवणीच्या व रोजगाराच्या आकडेवारीवर टीका केली. या प्रसंगी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत चव्हाण आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील गुंतवणुकीची व रोजगार निर्मितीची आकडेवारी जाहीर केली जात आहे. मात्र, मेक इन इंडियासह मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्सच्या पार्श्वभूमीवर सांगितली जाणारी आकडेवाडी केवळ जाहिरातबाजी असून कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या गावात कोणती कंपनी, कोणते उत्पादन घेणार आहे. त्यातून किती रोजगार निर्मिती होईल, याची माहिती राज्य शासनाने जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच महाराष्ट्रातील गुंतवणूक कमी होत चालली असून गुजरातमध्ये गुंतवणूक वाढत आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना चव्हाण म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र सोडून देवून अहमदाबादमध्ये दिले आहे. हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असून त्यात फडणवीस यांनी शरणागती पत्करून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास घात केला आहे. त्याचे उत्तर फडणवीस यांनी दिले पाहिजे.देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ट्रिलीयन डॉलर एवढी होईल, अशी घोषणा फडणवीस यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्स या कार्यक्रमात केली. परंतु, राज्याची अर्थव्यवस्था जवळपास ४०० बिलीयन डॉलर्सची आहे. गेल्या पाच वर्षात राज्याचा सरासरी विकासदर ७.३ टक्के असून ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी किमान २०३२ साल उजाडणार आहे. परंतु, गेल्या तीन वर्षाच्या युती सरकारच्या कालावधीत राज्याची अर्थव्यव्सथा डबघाईला आली आहे, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस