शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आभास : पृथ्वीराज चव्हण; पुण्यात साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:14 IST

पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंजाब नॅशनल बँक, हायपरलूप तंत्रज्ञान कोरेगाव भिमा येथील दुर्घटना यासह मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या गुंतवणीच्या व रोजगाराच्या आकडेवारीवर टीका केली.

ठळक मुद्देशासनाकडून गुंतवणूकीची व रोजगाराची फसवी आकडेवारी जाहीर : पृथ्वीराज चव्हाण'गेल्या पाच वर्षात राज्याचा सरासरी विकासदर ७.३ टक्के'

पुणे : मेक इन इंडिया व मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे सादर करून राज्य शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा केवळ आभास निर्माण केला आहे. मात्र, राज्याच्या कृषी व अर्थ व्यवस्थेचे कंबरडे मोडले असून राज्यातील बेरोजगारी वाढत चालेली आहे. परंतु, अनावश्यक प्रकल्प उभे करून जनतेवर विविध करांचा बोजा लादला जात आहे. शासनाकडून गुंतवणूकीची व रोजगाराची फसवी आकडेवारी जाहीर केली जात आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पुण्यात केला.शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंजाब नॅशनल बँक, हायपरलूप तंत्रज्ञान कोरेगाव भिमा येथील दुर्घटना यासह मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या गुंतवणीच्या व रोजगाराच्या आकडेवारीवर टीका केली. या प्रसंगी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत चव्हाण आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील गुंतवणुकीची व रोजगार निर्मितीची आकडेवारी जाहीर केली जात आहे. मात्र, मेक इन इंडियासह मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्सच्या पार्श्वभूमीवर सांगितली जाणारी आकडेवाडी केवळ जाहिरातबाजी असून कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या गावात कोणती कंपनी, कोणते उत्पादन घेणार आहे. त्यातून किती रोजगार निर्मिती होईल, याची माहिती राज्य शासनाने जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच महाराष्ट्रातील गुंतवणूक कमी होत चालली असून गुजरातमध्ये गुंतवणूक वाढत आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना चव्हाण म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र सोडून देवून अहमदाबादमध्ये दिले आहे. हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असून त्यात फडणवीस यांनी शरणागती पत्करून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास घात केला आहे. त्याचे उत्तर फडणवीस यांनी दिले पाहिजे.देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ट्रिलीयन डॉलर एवढी होईल, अशी घोषणा फडणवीस यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्स या कार्यक्रमात केली. परंतु, राज्याची अर्थव्यवस्था जवळपास ४०० बिलीयन डॉलर्सची आहे. गेल्या पाच वर्षात राज्याचा सरासरी विकासदर ७.३ टक्के असून ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी किमान २०३२ साल उजाडणार आहे. परंतु, गेल्या तीन वर्षाच्या युती सरकारच्या कालावधीत राज्याची अर्थव्यव्सथा डबघाईला आली आहे, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस