शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रिक्षांतून बेकायदा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 03:04 IST

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून निगडी उड्डाणपुलाच्या रस्त्यावर बेफामपणे आणि बेदरकारपणे रिक्षा चालविणाºया रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जिवाशी खेळणारे हे मुजोर चालक मुख्यत्वेकरून पिंपरी, वायसीएम रुग्णालय दरम्यान रिक्षासेवा देणारे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनिगडी : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून निगडी उड्डाणपुलाच्या रस्त्यावर बेफामपणे आणि बेदरकारपणे रिक्षा चालविणाºया रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जिवाशी खेळणारे हे मुजोर चालक मुख्यत्वेकरून पिंपरी, वायसीएम रुग्णालय दरम्यान रिक्षासेवा देणारे आहेत. तीन आसनी रिक्षांमधून चार प्रवाशांची बेकायदेशीरपणे वाहतूक सुरू आहे.नियमापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारे रिक्षाचालक या मार्गावर सर्रास दिसतात निगडी पीएमपी बसथांब्याच्या प्रवेशद्वारासमोर तसेच दत्त मंदिराजवळील पादचारी मार्गावर रिक्षा उभा करून अनेकदा या मार्गावर जाणाºया पीएमपी बसच्या समोरच रिक्षा उभी करून प्रवासी घेण्याचे धाडस करतात. असेच धाडस आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणारे रिक्षाचालक करीत असतात.रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा निगडी पीएमपी स्थानकापासूनच सुरू होतो. पिंपरी बस आत-बाहेर जाण्याच्या ठिकाणी गर्दी करतात. वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. प्रवाशींची ने-आण करताना अनेक रिक्षाचालक आपापसात स्पर्धा लावतात. वेगाची ही जीवघेणी स्पर्धा सुरू असते. पीएमपी बस डेपोतून बस बाहेर किंंवा आत जात असताना, चौकात थांबण्याचा सिग्नल असताना रिक्षाचालक बेधडक रिक्षा घुसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा पादचारी व दुचाकीस्वारांना धडकून अपघात घडत आहेत. जास्त प्रवासी घेतल्यास किंंवा बेफामपणे रिक्षा चालविणाºया रिक्षाचालकांना हटकले की ते उद्धटपणे वागतात.निगडीतील उड्डाणपुलाखाली भर रस्त्यात प्रवासी घेण्यासाठी उभ्या केल्या जातात. तेथेच पोलीस वाहतूक नियोजनासाठी थांबलेले असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते.तसेच पिंपरी चौकामध्येही रिक्षाचालक बिनधास्तपणे रस्त्यावर उभे असतात. रिक्षांना धक्का लागल्यानंतर चालक अंगावर धावून येतात. बºयाचवेळा वाहन चालकांकडून भिती दाखवून पैसे उकळण्याचेही प्रकार घडतात. याबाबत तक्रार केली तरी पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनोळखी व्यक्तींकडूनही जादा प्रमाणात पैसे उकळले जातात. रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.ज्येष्ठांचे हालनगडी पीएमपी बसथांब्यासमोर तसेच दत्त मंदिराजवळ रस्ता अरुंद आहे. याशिवाय येथे बस प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावर उभ्या राहतात. त्यातच पादचारी लोकांसाठी असलेल्या पादचारी मार्गावर ७० ते ९० रिक्षा थांबून प्रवासी घेतले जातात. यामुळे पादचारी जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडत असतात. यात सर्वाधिक हाल होतात वृद्ध, लहान मुले आणि स्त्रियांचे. या रिक्षाचालकांना कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते जुमानत नाहीत.