शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

किचकट प्रक्रियेमुळे विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 6, 2014 00:32 IST

शहरात विवाह नोंदणी करण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत आहे . विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही किचकट प्रक्रिया नागरिकांना वाटते.

सुवर्णा नवले, पिंपरीशहरात विवाह नोंदणी करण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत आहे . विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही किचकट प्रक्रिया नागरिकांना वाटते. यामुळे नागरिक विवाह नोंदणीला धजावत नाहीत. शहरातील नागरिकांचे असे मत आहे की, विवाह नोंदणीसाठी कागदपत्रे मोठया प्रमाणात जमा करावे लागतात. विवाह नोंदणी विभागातून अथवा नागरी सुविधा केंद्रातून विवाह संबंधी कागदपत्राची मोठी यादी मिळते. नागरिकांकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध नसतात. त्यांना अर्धवट माहिती यासंदर्भात असते.विवाह नोंदणी संदर्भात महत्त्वाचे कागदपत्रांमध्ये नागरिकांना शहरातील वधू किंवा वर रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे़ तसेच विवाह नोंदणी अर्जावर वधू व वर यांचे साक्षीदारांचे पासपोर्ट साईज फ ोटो लागतात. नोंदणीसाठी १०० रूपये किंमतीचा कोर्ट फी स्टँप विवाह नोंदणीसाठी लागतो. वधू व वर यांच्या जन्म तारखेचा पुरावा व शाळा सोडल्याचा दाखला, हे उपलब्ध नसल्यास नोंदणी धारकांचा वाहनपरवाना अथवा पासपोर्ट लागतो. विवाह नोंदणी करण्यासाठी लग्नपत्रिका लागते ती नसल्यास विवाहाचा फ ोटो लागतो. वर व वधू घटस्फोटीत असल्यास कोर्टाच्या हुकूमनाम्याची प्रत लागते. विवाह झाल्याचा कार्यालयाचा दाखला तसेच विवाह लावलेल्या भटजीची स्वाक्षरी लागते. या सर्व कागदपत्रामुळे नागरिक विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष करतात. विवाह नोंदणीसाठी १५ दिवसाच्या आत कागदपत्रांची तपासणी करून विवाह प्रमाणपत्र दिले जाते. असे विवाह अधिनियाममध्ये नमूद केले आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी कायदा १९९८ कलम ५ व ६ प्रमाणे हा अधिनियम आहे. १५ दिवसाचा एकूण विवाह नोंदणी कालावधी आहे. मात्र १५ दिवस उलटून गेल्यानंतरही नागरिकांना प्रमाणपत्र मिळत नाही. असे नागरिकांचे म्हणणे आहे. विवाह नोंदणी ही महत्त्वाची बाब आहे. नागरिक महत्त्वाची गरज भासल्यास विवाह नोंदणीकडे वळतात. तेव्हा लगेच नोंदणी होत नाही.