शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

किचकट प्रक्रियेमुळे विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 6, 2014 00:32 IST

शहरात विवाह नोंदणी करण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत आहे . विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही किचकट प्रक्रिया नागरिकांना वाटते.

सुवर्णा नवले, पिंपरीशहरात विवाह नोंदणी करण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत आहे . विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही किचकट प्रक्रिया नागरिकांना वाटते. यामुळे नागरिक विवाह नोंदणीला धजावत नाहीत. शहरातील नागरिकांचे असे मत आहे की, विवाह नोंदणीसाठी कागदपत्रे मोठया प्रमाणात जमा करावे लागतात. विवाह नोंदणी विभागातून अथवा नागरी सुविधा केंद्रातून विवाह संबंधी कागदपत्राची मोठी यादी मिळते. नागरिकांकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध नसतात. त्यांना अर्धवट माहिती यासंदर्भात असते.विवाह नोंदणी संदर्भात महत्त्वाचे कागदपत्रांमध्ये नागरिकांना शहरातील वधू किंवा वर रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे़ तसेच विवाह नोंदणी अर्जावर वधू व वर यांचे साक्षीदारांचे पासपोर्ट साईज फ ोटो लागतात. नोंदणीसाठी १०० रूपये किंमतीचा कोर्ट फी स्टँप विवाह नोंदणीसाठी लागतो. वधू व वर यांच्या जन्म तारखेचा पुरावा व शाळा सोडल्याचा दाखला, हे उपलब्ध नसल्यास नोंदणी धारकांचा वाहनपरवाना अथवा पासपोर्ट लागतो. विवाह नोंदणी करण्यासाठी लग्नपत्रिका लागते ती नसल्यास विवाहाचा फ ोटो लागतो. वर व वधू घटस्फोटीत असल्यास कोर्टाच्या हुकूमनाम्याची प्रत लागते. विवाह झाल्याचा कार्यालयाचा दाखला तसेच विवाह लावलेल्या भटजीची स्वाक्षरी लागते. या सर्व कागदपत्रामुळे नागरिक विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष करतात. विवाह नोंदणीसाठी १५ दिवसाच्या आत कागदपत्रांची तपासणी करून विवाह प्रमाणपत्र दिले जाते. असे विवाह अधिनियाममध्ये नमूद केले आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी कायदा १९९८ कलम ५ व ६ प्रमाणे हा अधिनियम आहे. १५ दिवसाचा एकूण विवाह नोंदणी कालावधी आहे. मात्र १५ दिवस उलटून गेल्यानंतरही नागरिकांना प्रमाणपत्र मिळत नाही. असे नागरिकांचे म्हणणे आहे. विवाह नोंदणी ही महत्त्वाची बाब आहे. नागरिक महत्त्वाची गरज भासल्यास विवाह नोंदणीकडे वळतात. तेव्हा लगेच नोंदणी होत नाही.