शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

धोकादायक गावांकडे दुर्लक्षच

By admin | Updated: June 30, 2017 03:31 IST

जिल्ह्यातील माळीण सद्ृष्य धोकादायक २३ गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे अद्याप झालेली नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्ह्यातील माळीण सद्ृष्य धोकादायक २३ गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे अद्याप झालेली नाहीत. माळीणमधील ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा धोका अधोरेखित झाला आहे. राज्य शासनाकडून सुमारे चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमध्येही आवश्यक आपत्ती व्यवस्थापनाची कामे लवकरच केली जाणार आहेत,असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.पहिल्याच पावसात पुनर्वसित माळीणमधील रस्ते खचले, डे्रनेज दबले, घरात पाणी टिपकू लागले.तसेच जमिनीला भेगा पडल्या.त्यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, माळीणामध्ये तात्काळ दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. परंतु, जिल्हा प्रशासनाने माळीण सदृष्य धोकादायक गावांकडे अक्षम्य दूर्लक्ष केले आहे. माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल २३ गावे धोकादायक असल्याचे समोर आले. पावसाळ्यापूर्वी या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे करणे आवश्यक होते. मात्र, निधी प्राप्त न झाल्याने अद्याप या कामांना सुरूवातच केली नसल्याचे दिसून येत आहे. जिओलॉजीकल सर्वे आॅफ इंडिया (जीएसआय)आणि कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगतर्फे माळीण दूर्घटनेच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे सुचवली होती. त्यानुसार तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते. पावसाचे पाणी गावाबाहेर काढण्यासाठी आवश्यक ठिकाणी बांध घालणे. तसेच संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे. मात्र, माळीणची घटना घडून ३ वर्ष होत आली तरीही अद्याप गावांमध्ये आवश्यक कामे झालेली नाहीत.