शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अग्निशमन जवानांना अवमानाची ‘धग’, केंद्राच्या आदेशाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 06:25 IST

कडक गणवेशात आपत्तीचा सामना करण्यासाठी कायम सज्ज असलेल्या अग्निशमन दलातील जवानांचा पदाधिकारी व प्रशासनाकडून सातत्याने अवमान केला जात आहे.

पुणे : कडक गणवेशात आपत्तीचा सामना करण्यासाठी कायम सज्ज असलेल्या अग्निशमन दलातील जवानांचा पदाधिकारी व प्रशासनाकडून सातत्याने अवमान केला जात आहे. या जवानांना अन्य कामे सांगू नयेत, असा थेट केंद्र सरकारचा आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावरील चिखल स्वच्छ करणे किंवा पावसाने पडलेली झाडे उचलून रस्ता मोकळा करून देणे अशी कामे या जवानांनी करणे अपेक्षित धरले जात आहे. अशी कामे केली नाही म्हणून अग्निशमन दलप्रमुखांवर कारवाई करा, त्यांची पात्रता तपासा, अशी मुक्ताफळं काही सदस्यांनी थेट सर्वसाधारण सभेत उच्चारली आहेत. त्यामुळे या विभागातील जवानांमध्ये संतप्त भावना असून, या अवमानाची धग या जवानांना चांगलीच जिव्हारी लागत आहे.केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना एक आदेश लागू केला गेला आहे. त्यानुसार अग्निशमन सेवा ही अत्यावश्यक सेवा समजण्यात आली आहे. अग्निशमन व आणीबाणी सेवा असेच तिचे नामकरण करण्यात आले आहे. रस्ते धुणे, सासफाई करणे, पाणीपुरवठा करणे अशा प्रकारची कामे या विभागातील जवानांना सांगितली जातात. त्याचीच दखल केंद्र सरकारच्या या आदेशात घेण्यात आली आहे. या प्रकारची कामे अग्निशमन दलाच्या जवानांना सांगू नयेत, असे ठळकपणे या आदेशात बजावण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेवरून राज्यपालांच्या नावाने हा आदेश राज्य सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २००७ मध्ये पाठवला आहे. त्याचे पालन केले नाही, तर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही या आदेशात स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही प्रशासनाकडून मात्र त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून अग्निशमनसेवेतील जवानांनी कोणतीही कामे करावीत, अशी अपेक्षा ठेवली जात आहे.प्रशासनाचे विभागाकडे दुर्लक्षप्रशासनाचे या विभागाकडे दुर्लक्ष असल्याचेच दिसते आहे. पदाधिकाऱ्यांनी हा विभाग अद्ययावत करण्यात काही रस नाही असेच दिसते आहे. ३५ लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात किमान ३० अग्निशमन केंद्र असण्याची गरज आहे. प्रत्यक्षात ती फक्त १३ आहे, तसेच २ तयार आहेत; पण ती केंद्रे सुरू झालेली नाहीत. ४ केंद्रांची बांधकामे रखडली आहेत. ९५० जवान अपेक्षित व पदमान्यताही असताना फक्त ४५० जण आहेत. त्यात अधिकाºयांपासून चालकांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे.चिखल साफ करण्याची अपेक्षाहडपसर परिसरात माती वाहणाºया मालमोटारीतून माती रस्त्यावर पडली. त्यात पाणी सांडले. त्याचा चिखल झाला. तो स्वच्छ करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसहित पुढाकार घेतला,मात्र मदतीला अग्निशमन दलाचे जवान यावेत अशी अपेक्षा धरली. दलप्रमुखाने स्पष्ट शब्दांत नाही, असे सांगितल्यावर लगेचच संपूर्ण विभागावरच राग काढला गेला.चालकही फायर फायटर नाहीकेंद्राच्या नियमाप्रमाणे चालकही फायर फायटिंगचे प्रशिक्षण घेतलेला असणे गरजेचे आहे. मात्र वाहन विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात गरज म्हणून दिलेल्या चालकांमध्ये कोणाचेही या प्रकारचे कोणतेही प्रशिक्षण झालेले नाही....आम्ही काय माळी आहोत का ?पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर झाड पडल्याच्या दुर्घटना होतात. एखादी फांदी पडते किंवा संपूर्ण झाडच उन्मळून रस्त्यावर येते. अशा घटनांमध्ये रस्त्यावरची फांदी किंवा झाड काढण्याचे काम उद्यान विभागाचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र वाहने, स्वतंत्र कर्मचारी आहेत. मात्र तरीही या कामातही अग्निशमन दलाची मदत घेतली जाते. त्यांच्या जवानांना रस्ता मोकळा करून देण्यास सांगण्यात येते. आले नाहीत तर त्यांच्यावर टीका होते.पावसाळ्यात तर रोजच संध्याकाळी किंवा रात्री उशिरा हे काम अग्निशमन दलाचे जवानच करीत असतात. उद्यान विभागाने पावसाळ्यात काही कर्मचारी व वाहने रात्रपाळीकरिता ठेवली तरी त्यांच्याकडून हे काम होऊ शकते, मात्र तेही करायला प्रशासन तयार नाही.अग्निशमन दलाच्या जवानांनाच त्यासाठी पाचारण केले जाते, रस्ता मोकळा करून द्यायला आम्ही वाहतूक शाखेचे आहोत की वृक्षांची निगराणी करणारे माळी आहोत, असे जवानांचे म्हणणे आहे.वर्दी आली, की धावून जायचे हे अग्निशमन विभागाचे काम आहे, मात्र रस्त्यांवरील चिखल धुऊन काढण्यासाठी हा विभाग नाही. त्यामुळे सरकारच्या आदेशाप्रमाणे त्यावेळी नकार दिला. झाडपडीच्या घटनांमध्ये रात्री उशिरा काही घडले तर वर्दी येते व जावे लागते.- प्रशांत रणपिसे,अग्निशमन दलप्रमुख

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दल