शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन जवानांना अवमानाची ‘धग’, केंद्राच्या आदेशाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 06:25 IST

कडक गणवेशात आपत्तीचा सामना करण्यासाठी कायम सज्ज असलेल्या अग्निशमन दलातील जवानांचा पदाधिकारी व प्रशासनाकडून सातत्याने अवमान केला जात आहे.

पुणे : कडक गणवेशात आपत्तीचा सामना करण्यासाठी कायम सज्ज असलेल्या अग्निशमन दलातील जवानांचा पदाधिकारी व प्रशासनाकडून सातत्याने अवमान केला जात आहे. या जवानांना अन्य कामे सांगू नयेत, असा थेट केंद्र सरकारचा आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावरील चिखल स्वच्छ करणे किंवा पावसाने पडलेली झाडे उचलून रस्ता मोकळा करून देणे अशी कामे या जवानांनी करणे अपेक्षित धरले जात आहे. अशी कामे केली नाही म्हणून अग्निशमन दलप्रमुखांवर कारवाई करा, त्यांची पात्रता तपासा, अशी मुक्ताफळं काही सदस्यांनी थेट सर्वसाधारण सभेत उच्चारली आहेत. त्यामुळे या विभागातील जवानांमध्ये संतप्त भावना असून, या अवमानाची धग या जवानांना चांगलीच जिव्हारी लागत आहे.केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना एक आदेश लागू केला गेला आहे. त्यानुसार अग्निशमन सेवा ही अत्यावश्यक सेवा समजण्यात आली आहे. अग्निशमन व आणीबाणी सेवा असेच तिचे नामकरण करण्यात आले आहे. रस्ते धुणे, सासफाई करणे, पाणीपुरवठा करणे अशा प्रकारची कामे या विभागातील जवानांना सांगितली जातात. त्याचीच दखल केंद्र सरकारच्या या आदेशात घेण्यात आली आहे. या प्रकारची कामे अग्निशमन दलाच्या जवानांना सांगू नयेत, असे ठळकपणे या आदेशात बजावण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेवरून राज्यपालांच्या नावाने हा आदेश राज्य सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २००७ मध्ये पाठवला आहे. त्याचे पालन केले नाही, तर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही या आदेशात स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही प्रशासनाकडून मात्र त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून अग्निशमनसेवेतील जवानांनी कोणतीही कामे करावीत, अशी अपेक्षा ठेवली जात आहे.प्रशासनाचे विभागाकडे दुर्लक्षप्रशासनाचे या विभागाकडे दुर्लक्ष असल्याचेच दिसते आहे. पदाधिकाऱ्यांनी हा विभाग अद्ययावत करण्यात काही रस नाही असेच दिसते आहे. ३५ लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात किमान ३० अग्निशमन केंद्र असण्याची गरज आहे. प्रत्यक्षात ती फक्त १३ आहे, तसेच २ तयार आहेत; पण ती केंद्रे सुरू झालेली नाहीत. ४ केंद्रांची बांधकामे रखडली आहेत. ९५० जवान अपेक्षित व पदमान्यताही असताना फक्त ४५० जण आहेत. त्यात अधिकाºयांपासून चालकांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे.चिखल साफ करण्याची अपेक्षाहडपसर परिसरात माती वाहणाºया मालमोटारीतून माती रस्त्यावर पडली. त्यात पाणी सांडले. त्याचा चिखल झाला. तो स्वच्छ करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसहित पुढाकार घेतला,मात्र मदतीला अग्निशमन दलाचे जवान यावेत अशी अपेक्षा धरली. दलप्रमुखाने स्पष्ट शब्दांत नाही, असे सांगितल्यावर लगेचच संपूर्ण विभागावरच राग काढला गेला.चालकही फायर फायटर नाहीकेंद्राच्या नियमाप्रमाणे चालकही फायर फायटिंगचे प्रशिक्षण घेतलेला असणे गरजेचे आहे. मात्र वाहन विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात गरज म्हणून दिलेल्या चालकांमध्ये कोणाचेही या प्रकारचे कोणतेही प्रशिक्षण झालेले नाही....आम्ही काय माळी आहोत का ?पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर झाड पडल्याच्या दुर्घटना होतात. एखादी फांदी पडते किंवा संपूर्ण झाडच उन्मळून रस्त्यावर येते. अशा घटनांमध्ये रस्त्यावरची फांदी किंवा झाड काढण्याचे काम उद्यान विभागाचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र वाहने, स्वतंत्र कर्मचारी आहेत. मात्र तरीही या कामातही अग्निशमन दलाची मदत घेतली जाते. त्यांच्या जवानांना रस्ता मोकळा करून देण्यास सांगण्यात येते. आले नाहीत तर त्यांच्यावर टीका होते.पावसाळ्यात तर रोजच संध्याकाळी किंवा रात्री उशिरा हे काम अग्निशमन दलाचे जवानच करीत असतात. उद्यान विभागाने पावसाळ्यात काही कर्मचारी व वाहने रात्रपाळीकरिता ठेवली तरी त्यांच्याकडून हे काम होऊ शकते, मात्र तेही करायला प्रशासन तयार नाही.अग्निशमन दलाच्या जवानांनाच त्यासाठी पाचारण केले जाते, रस्ता मोकळा करून द्यायला आम्ही वाहतूक शाखेचे आहोत की वृक्षांची निगराणी करणारे माळी आहोत, असे जवानांचे म्हणणे आहे.वर्दी आली, की धावून जायचे हे अग्निशमन विभागाचे काम आहे, मात्र रस्त्यांवरील चिखल धुऊन काढण्यासाठी हा विभाग नाही. त्यामुळे सरकारच्या आदेशाप्रमाणे त्यावेळी नकार दिला. झाडपडीच्या घटनांमध्ये रात्री उशिरा काही घडले तर वर्दी येते व जावे लागते.- प्रशांत रणपिसे,अग्निशमन दलप्रमुख

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दल