शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

पुरापासून संरक्षण हवे असेल, तर खारफुटी जंगलं वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST

पुणे : खारफुटीची जंगलं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. ती कमी होत असल्याने पाऊस झाला की, तिथे पूरस्थितीचा सामना ...

पुणे : खारफुटीची जंगलं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. ती कमी होत असल्याने पाऊस झाला की, तिथे पूरस्थितीचा सामना करावा लागतो. मुंबई, कोकण या भागांत समुद्र किनारपट्टीवर ही जंगलं आहेत. पण बांधकामांमुळे खाड्या बुजवल्या गेल्या, काही ठिकाणी लोकांची वस्ती वाढली, अशा अनेक कारणांमुळे ही जंगलं कमी होत आहेत. उलट या जंगलांमुळेच आपले संरक्षण होते, त्याची माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणूनच हा दिन साजरा केल्या जात असल्याची माहिती खारफुटी वनांचे अभ्यासक डॉ. महेश शिंदीकर यांनी दिली.

युनोस्कोने २०१५ मध्ये २६ जुलै हा जागितक खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन साजरा करण्यास परवानगी दिली. खारपुटी वाचवावी म्हणून ग्रीन पिस या संस्थेने पुर्वी आंदोलने केली. या चळवळीचा मुख्य सूत्रधार डॅनियल मॅनोटो हा होता. त्यांचे निधन २६ जुलै रोजी झाले. त्यानंतर संघटनांनी त्याच्या स्मृतीप्रीत्यार्थ हा दिन साजरा करावा, अशी मागणी केली होती. मग २०१६ पासून हा दिन साजरा होत आहे.

सखल भागातील किनारपट्टीची शहर आहेत. महाराष्ट्रातील नद्या पश्चिमेकडे वाहतात. आपल्या सह्याद्रीत अनेक नद्या उगम पावतात आणि अरबी समुद्रात जातात. समुद्राला मिळण्याच्या ठिकाणी अनेक शहरे वसली आहेत. पुर्वी दळणवणाचे साधन पाणीच होते. म्हणून किनारपट्टीवर घरं झाली. त्यातून कळत नकळत खाजण वने नष्ट होत गेली. तिथे भराव घातले गेले. नद्यांचे प्रवाह वळवले. हे होत गेले आणि सखल भागात पाणी येऊ लागले. आता जो पूर येतो आहे, त्याला ही वने नष्ट होणं हे कारण आहे.

-------------------------

मुंबईत ब्रांद्रा, कुर्ला खाडीचा भाग होता. खाडीचे पाणी पसरायला तिथे जागा होती. पाणथळ भूमी होती. ती भूमी पाण्याचा साठा नियंत्रित करते. आता खाड्या बुजवल्या, बांधकामे झाली. तिथे कचरा टाकला जातो. त्यामुळे सखल भागात पाणी जाऊन पुराचा फटका बसत आहे.

- डॉ. महेश शिंदीकर, संशोधक, खारफुटी वने

----------------------

नुकताच काही संशोधकांनी जगरातील वीस किलोमीटर किनारपट्टी असणाऱ्या भागांचा अभ्यास केला. शास्त्रीय साधने वापरून हा अभ्यास केला. खारपुटी वनांमुळे जे किनाऱ्याचे रक्षण झाले, त्याचा त्यांनी आर्थिकदृष्ट्या अभ्यास केला आणि सुमारे साडेसहा हजार कोटी रूपयांचे नुकसान या वनांमुळे झाल्याचे लक्षात आले. ही वने नसती, तर आतापर्यंत खूप मोठे नुकसान झाले असते, असे प्रा. शिंदीकर म्हणाले.

-------------------

खारफुटी नष्ट होण्याची कारणे

खारफुटीची झाडे - झुडपे किनारी दलदलीत पाय रोवून उभी राहात असल्याने समुद्राचे आक्रमण थोपवणे, किनारी जमीन क्षारयुक्त (खारपड) होण्यापासून वाचवणे, इतर जैवविविधतेला अधिवास पुरवणे, पुराचे पाणी तसेच मोठ्या लाटांपासून मानवी वस्तीला संरक्षण देणे अशी अनेक कामे ती करतात. नैसर्गिकरीत्या कार्बन शोषण्याची सर्वाधिक क्षमता खारफुटीमध्ये आढळते. परंतु, किनारी प्रदेशातील बांधकामे, भराव टाकणे, प्रदूषण यांसारख्या कारणांनी खारफुटी नष्ट होत आहे, असे शिंदीकर म्हणाले.