शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

पुरापासून संरक्षण हवे असेल, तर खारफुटी जंगलं वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST

पुणे : खारफुटीची जंगलं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. ती कमी होत असल्याने पाऊस झाला की, तिथे पूरस्थितीचा सामना ...

पुणे : खारफुटीची जंगलं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. ती कमी होत असल्याने पाऊस झाला की, तिथे पूरस्थितीचा सामना करावा लागतो. मुंबई, कोकण या भागांत समुद्र किनारपट्टीवर ही जंगलं आहेत. पण बांधकामांमुळे खाड्या बुजवल्या गेल्या, काही ठिकाणी लोकांची वस्ती वाढली, अशा अनेक कारणांमुळे ही जंगलं कमी होत आहेत. उलट या जंगलांमुळेच आपले संरक्षण होते, त्याची माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणूनच हा दिन साजरा केल्या जात असल्याची माहिती खारफुटी वनांचे अभ्यासक डॉ. महेश शिंदीकर यांनी दिली.

युनोस्कोने २०१५ मध्ये २६ जुलै हा जागितक खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन साजरा करण्यास परवानगी दिली. खारपुटी वाचवावी म्हणून ग्रीन पिस या संस्थेने पुर्वी आंदोलने केली. या चळवळीचा मुख्य सूत्रधार डॅनियल मॅनोटो हा होता. त्यांचे निधन २६ जुलै रोजी झाले. त्यानंतर संघटनांनी त्याच्या स्मृतीप्रीत्यार्थ हा दिन साजरा करावा, अशी मागणी केली होती. मग २०१६ पासून हा दिन साजरा होत आहे.

सखल भागातील किनारपट्टीची शहर आहेत. महाराष्ट्रातील नद्या पश्चिमेकडे वाहतात. आपल्या सह्याद्रीत अनेक नद्या उगम पावतात आणि अरबी समुद्रात जातात. समुद्राला मिळण्याच्या ठिकाणी अनेक शहरे वसली आहेत. पुर्वी दळणवणाचे साधन पाणीच होते. म्हणून किनारपट्टीवर घरं झाली. त्यातून कळत नकळत खाजण वने नष्ट होत गेली. तिथे भराव घातले गेले. नद्यांचे प्रवाह वळवले. हे होत गेले आणि सखल भागात पाणी येऊ लागले. आता जो पूर येतो आहे, त्याला ही वने नष्ट होणं हे कारण आहे.

-------------------------

मुंबईत ब्रांद्रा, कुर्ला खाडीचा भाग होता. खाडीचे पाणी पसरायला तिथे जागा होती. पाणथळ भूमी होती. ती भूमी पाण्याचा साठा नियंत्रित करते. आता खाड्या बुजवल्या, बांधकामे झाली. तिथे कचरा टाकला जातो. त्यामुळे सखल भागात पाणी जाऊन पुराचा फटका बसत आहे.

- डॉ. महेश शिंदीकर, संशोधक, खारफुटी वने

----------------------

नुकताच काही संशोधकांनी जगरातील वीस किलोमीटर किनारपट्टी असणाऱ्या भागांचा अभ्यास केला. शास्त्रीय साधने वापरून हा अभ्यास केला. खारपुटी वनांमुळे जे किनाऱ्याचे रक्षण झाले, त्याचा त्यांनी आर्थिकदृष्ट्या अभ्यास केला आणि सुमारे साडेसहा हजार कोटी रूपयांचे नुकसान या वनांमुळे झाल्याचे लक्षात आले. ही वने नसती, तर आतापर्यंत खूप मोठे नुकसान झाले असते, असे प्रा. शिंदीकर म्हणाले.

-------------------

खारफुटी नष्ट होण्याची कारणे

खारफुटीची झाडे - झुडपे किनारी दलदलीत पाय रोवून उभी राहात असल्याने समुद्राचे आक्रमण थोपवणे, किनारी जमीन क्षारयुक्त (खारपड) होण्यापासून वाचवणे, इतर जैवविविधतेला अधिवास पुरवणे, पुराचे पाणी तसेच मोठ्या लाटांपासून मानवी वस्तीला संरक्षण देणे अशी अनेक कामे ती करतात. नैसर्गिकरीत्या कार्बन शोषण्याची सर्वाधिक क्षमता खारफुटीमध्ये आढळते. परंतु, किनारी प्रदेशातील बांधकामे, भराव टाकणे, प्रदूषण यांसारख्या कारणांनी खारफुटी नष्ट होत आहे, असे शिंदीकर म्हणाले.