शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

काम करता येत नाही तर खुर्च्या खाली करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:39 IST

भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात शहराचे कचऱ्यापासून सार्वजनिक आरोग्यापर्यंत व पाण्यापासून ते वाहतुकीपर्यंत सर्वच प्रश्न बिकट होत चालले आहेत.

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात शहराचे कचऱ्यापासून सार्वजनिक आरोग्यापर्यंत व पाण्यापासून ते वाहतुकीपर्यंत सर्वच प्रश्न बिकट होत चालले आहेत. त्यांना कोणत्याही विषयावर उपाययोजना करता येत नाही. सत्ता राबवण्यात अपयश येत असल्याने काम करता येत नाही तर खुर्च्या खाली करा, अशी मागणी करत काँग्रेसच्या शहर शाखेने बेलबाग चौकात शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर यावेळी टीका करण्यात आली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, शहराच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. पुणेकरांनी खासदारकी, आमदारकी व पुन्हा पालिकेतील सत्ताही त्यांना दिली. इतकी सत्तास्थाने असतील तर पुण्याचे नंदनवन करायला हवे. पण त्यांना काहीच जमायला तयार नाही. पाण्याचा प्रश्न सोडवता येत नाही. वाहतूककोंडीही सुटत नाही. सार्वजनिक आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. मग हे करतात तरी काय, असा प्रश्न आता पुणेकरांना पडू लागला आहे. त्यांचाच आवाज म्हणून काँग्रेस हे आंदोलन करत आहे.भाजपा काम काहीच करत नाही व हेल्मेटसक्ती करून पुणेकरांना वेठीला मात्र धरत आहे, अशी टीका पालकमंत्री बापट यांच्यावर करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, चिटणीस संजय बालगुडे, कमल व्यवहारे यांचीही भाषणे झाली. सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, रवींद्र धंगेकर, अजित दरेकर, मुकारी अलगुडे, सोनाली मारणे, प्रदीप परदेशी, बाळासाहेब आमराळे, चंद्रशेखर कपोते, विजय खळदकर, प्रवीण करपे, सुनील धाडगे, सुजित यादव आदी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.>शहर महिलातर्फे मंगळवारी हंडा मोर्चाशहर महिला काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पाणी कपात करण्याच्या निर्णयाविरोधात २९ जानेवारीला हंडामोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसभवनपासून हा मोर्चा महापालिकेवर नेण्यात येईल, अशी माहिती शहराध्यक्ष सोनाली मारणे यांनी दिली.