शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

'...तर राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्मयोगीची निवडणूक लढवणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 11:55 IST

सक्षम उमेदवार मिळाले तर, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, हितासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चांगले उमेदवार व  कारखाना चालवण्यासाठी सक्षम असणाऱ्यांच्या शोधात आहे. जर असे सक्षम उमेदवार मिळाले तर, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, हितासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रागृह येथे बुधवार ( दि. २२ )  सप्टेंबर  रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या निवडणूक संदर्भातील विशेष बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे माहिती देताना जिल्हाध्यक्ष गारटकर म्हणाले की, कर्मयोगी शंकराव पाटील यांनी साखर कारखाना अतिशय काटकसरीने चालवला, वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र याउलट परिस्थिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आधिपत्याखाली सद्य परिस्थितीला निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर नाही. ऊसाची पेमेंट अद्यापी नाहीत, वाहतूकदारांचे पैसे नाहीत. अशा अनेक समस्यांनी हा साखर कारखाना ग्रासला आहे. या सहकारी साखर कारखान्याला अत्यंत उसाची जवळची वाहतुक असताना देखील, आर्थिक अडचणीत कसा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला.

कारखान्याबद्दल कारभार मनमानी पद्धतीने चालतोय ही भावना नुसत्या सभासदांची नाहीतर, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची आहे. कामगार सुद्धा म्हणताहेत पॅनल लावा व यांना हटवा, ऊस उत्पादक शेतकरी हाच हेका धरत आहेत. मात्र त्या कारखान्यात मोठी गंमत आहे ती म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी ही संस्था कायम आपल्याकडेच राहावी यासाठी काही नियम केले आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.