शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

...हा प्रश्न मार्गी न लावल्यास पुणेकर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 20:14 IST

सांगा आम्ही कसं जगायचं? जुने वाडे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत.त्याची डागडुजी किंवा दुरूस्ती करू शकत नाही....ना दुसरीकडे घर घेण्याची ऐपत आहे. ‘घर का ना घाटका’ अशी  आमची अवस्था झाली आहे.

नम्रता फडणीस

पुणे : सांगा आम्ही कसं जगायचं? जुने वाडे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत.त्याची डागडुजी किंवा दुरूस्ती करू शकत नाही....ना दुसरीकडे घर घेण्याची ऐपत आहे. ‘घर का ना घाटका’ अशी  आमची अवस्था झाली आहे. केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर या ऐतिहासिक वास्तूंच्या शंभर मीटर परिसरात बांधकाम करण्यास प्रतिबंध केला आहे. पण आमचे वाडे गल्लीबोळात आहेत.  त्याचे बांधकाम केले तर जागतिक वारसा असलेल्या वास्तूंना काय धक्का पोहोचणार आहे? आसपास अनेक बांधकाम झाली आहेत पण आम्हाला जुन्या वाड्यांच्या दुरूस्तीची परवानगी नाही? हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करीत लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न धसास न लावल्यास  येत्या निवडणुकीत नोटाचा वापर किंवा निवडणुकीवरच  बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.              शहरातील जुन्या वाड्यांचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 1992 साली शनिवारवाडा, पाताळेश्वर  आणि आगाखान पॅलेसच्या  शंभर मीटर परिसरात बांधकाम करता येणार नाही. याविरूद्ध लोकांना कोर्टात दाद मागता येणार नाही असा अध्यादेश काढला.  त्यात 2008 मध्ये दुरूस्ती करून 200 मीटर परिसरात बांधकामाला परवानगी दिली मात्र पण उंचीची मर्यादा घातली आहे. शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर आणि आगाखान पॅलेस  हा तिन्ही भाग मिळून 120 एकर जागा आहे. त्यातील 22 एकर जागा प्रतिबंधित असून, 98 एकर जागेत प्रवेश करण्यास मनाई आहे.  शनिवारवाडा हा  कसबा, बुधवार आणि शनिवार पेठेच्या मध्यवर्ती भागात आहे. याठिकाणी शंभर ते दीडशे वर्षांपूर्वींचे 38 जुने वाडे असून, जवळपास 10 हजार लोक या भागात वास्तव्यास आहेत. हे जुने वाडे आज कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. मात्र त्याची दुरूस्ती करण्याची बाधित नागरिकांना परवानगी नाही.

             स्वत:च्याच घरात परक्यासारखे राहाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. प्रत्येक निवडणुकीत पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडूनआश्वासन दिली जातात. आम्हीच नगरसेवक, आमदार आणि पालकमंत्री निवडून दिले. मात्र आमच्याच प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या विरूद्ध आता नागरिकांनी एल्गार पुकारला असून, लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न मार्गी न लावल्यास निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उगारण्याचा निर्णय घेतला आहे

टॅग्स :historyइतिहासElectionनिवडणूक