शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

दंडाच्या पावत्या पुणे महानगरपालिकेच्या फाडताय तर मग लॉकडाऊनचे नियम का ग्रामीणचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:08 IST

उरुळी कांचन: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस कारवाई करताना दंडाच्या पावत्या जर पुणे महानगरपालिकेच्या फाडतात, तर मग लॉकडाऊनचे नियम ...

उरुळी कांचन: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस कारवाई करताना दंडाच्या पावत्या जर पुणे महानगरपालिकेच्या फाडतात, तर मग लॉकडाऊनचे नियम का ग्रामीणचे लावताय, असा सवाल उरुळी कांचन सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी पोलीस प्रशासनाला केला आहे.

उरुळी कांचनचा पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारीत २२ मार्च २०२१ पासून शहरात समावेश झाला असल्याने शहरातील कायदे व नियमांचे पालन या ठिकाणी होत आहे. कोविडकाळात शहरातील नियमांनुसार कायदा व्यवस्थेची जबाबदारी पोलीस सांभाळत आहेत. मात्र, दुसरीकडे हा भाग अद्याप जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत नियंत्रणाखाली येथे कामकाज चालत असल्याने प्रशासनातील कामकाजाचा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

पुणे महानगरपालिकेचा आणि उरुळी कांचन गावाचा दुरान्वयेही संबंध नाही. मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे पोलीस कारवाई करताना पोलीस विभाग हा दंडात्मक कारवाई करताना पुणे महानगरपालिकेच्या पावतीपुस्तकांचा वापर करीत आहेत. ग्रामपंचायतीकडून वारंवार तोंडी, लेखी तक्रार करूनही पोलीस खात्याकडून याबाबत कोणतीच दाखल घेतली नाही. वरिष्ठ लोकप्रतिनिधीही व जिल्हा प्रशासन याबाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. शहरी पोलीस ग्रामीण जनतेला नाहक त्रास देत आहेत. शेतकरी वर्गावर देखील कारवाई करून पाचशे पाचशे रुपयांच्या पावत्या फाडल्या जात आहेत. लॉकडाऊन व कोरोना संसर्ग याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरीवर्ग, मोलमजुरी करून जगणारा सामान्य माणूस जबरदस्त अडचणीत सापडलेला असताना...खिशात पैसे नसताना... जगण्याची भ्रांत असताना हा पोलिसी खाक्या ग्रामीण जनतेवर अन्याय करत आहे. प्रशासनाकडे याबाबत दाद मागूनही हाती निराशा येत आहे, यावर तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य ते निर्देश पोलीस खात्याला देणे गरजेचे आहे अशी मागणी सरपंच संतोष कांचन यांनी केलेली आहे.

आम्हाला पुणे शहर आयुक्तालयातून बाहेर काढून पूर्वीसारखेच ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत ठेवावे जेणेकरून ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा व स्थानिक जनतेचा समन्वय चांगल्या पद्धतीने राहून अडचणी सोडवताना त्रास होत नाही असे निवेदन जिल्हाधिकारी पुणे यांना देणार असल्याचे कांचन यांनी सांगितले.

उरुळी कांचन गाव हे शहर पोलिसांशी जोडले गेलेबाबत स्थानिक आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत उरुळी कांचन व परिसर हा ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतच ठेवण्याचा निर्णय झाला होता मात्र, आदेश काढताना अशा पद्धतीने का निघाला हे मलाही सांगता येणार नाही. मात्र, माझा आग्रह उरुळी कांचन व परिसर हा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातच राहण्यासाठी आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे या हद्दीतील व्यावसायिक निर्बंध पोलिसांकडून पाळले जातील. या ठिकाणचा रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १३.८४ टक्के आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखालील समितीने या ठिकाणचे व्यवहार ग्रामीण भागाप्रमाणे सकाळी ७ ते ११ या वेळेत करण्याचे निश्चित केले आहे. शेती व निगडित व्यवसाय कामांना सूट देण्याचे निर्देश आहेत. तर दंडात्मक पावत्यांच्या बाबत माहिती घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल

नागेश गायकवाड, पोलीस अधिकारी, पुणे शहर पोलीस गृह शाखा