शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

दंडाच्या पावत्या पुणे महानगरपालिकेच्या फाडताय तर मग लॉकडाऊनचे नियम का ग्रामीणचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:08 IST

उरुळी कांचन: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस कारवाई करताना दंडाच्या पावत्या जर पुणे महानगरपालिकेच्या फाडतात, तर मग लॉकडाऊनचे नियम ...

उरुळी कांचन: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस कारवाई करताना दंडाच्या पावत्या जर पुणे महानगरपालिकेच्या फाडतात, तर मग लॉकडाऊनचे नियम का ग्रामीणचे लावताय, असा सवाल उरुळी कांचन सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी पोलीस प्रशासनाला केला आहे.

उरुळी कांचनचा पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारीत २२ मार्च २०२१ पासून शहरात समावेश झाला असल्याने शहरातील कायदे व नियमांचे पालन या ठिकाणी होत आहे. कोविडकाळात शहरातील नियमांनुसार कायदा व्यवस्थेची जबाबदारी पोलीस सांभाळत आहेत. मात्र, दुसरीकडे हा भाग अद्याप जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत नियंत्रणाखाली येथे कामकाज चालत असल्याने प्रशासनातील कामकाजाचा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

पुणे महानगरपालिकेचा आणि उरुळी कांचन गावाचा दुरान्वयेही संबंध नाही. मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे पोलीस कारवाई करताना पोलीस विभाग हा दंडात्मक कारवाई करताना पुणे महानगरपालिकेच्या पावतीपुस्तकांचा वापर करीत आहेत. ग्रामपंचायतीकडून वारंवार तोंडी, लेखी तक्रार करूनही पोलीस खात्याकडून याबाबत कोणतीच दाखल घेतली नाही. वरिष्ठ लोकप्रतिनिधीही व जिल्हा प्रशासन याबाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. शहरी पोलीस ग्रामीण जनतेला नाहक त्रास देत आहेत. शेतकरी वर्गावर देखील कारवाई करून पाचशे पाचशे रुपयांच्या पावत्या फाडल्या जात आहेत. लॉकडाऊन व कोरोना संसर्ग याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरीवर्ग, मोलमजुरी करून जगणारा सामान्य माणूस जबरदस्त अडचणीत सापडलेला असताना...खिशात पैसे नसताना... जगण्याची भ्रांत असताना हा पोलिसी खाक्या ग्रामीण जनतेवर अन्याय करत आहे. प्रशासनाकडे याबाबत दाद मागूनही हाती निराशा येत आहे, यावर तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य ते निर्देश पोलीस खात्याला देणे गरजेचे आहे अशी मागणी सरपंच संतोष कांचन यांनी केलेली आहे.

आम्हाला पुणे शहर आयुक्तालयातून बाहेर काढून पूर्वीसारखेच ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत ठेवावे जेणेकरून ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा व स्थानिक जनतेचा समन्वय चांगल्या पद्धतीने राहून अडचणी सोडवताना त्रास होत नाही असे निवेदन जिल्हाधिकारी पुणे यांना देणार असल्याचे कांचन यांनी सांगितले.

उरुळी कांचन गाव हे शहर पोलिसांशी जोडले गेलेबाबत स्थानिक आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत उरुळी कांचन व परिसर हा ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतच ठेवण्याचा निर्णय झाला होता मात्र, आदेश काढताना अशा पद्धतीने का निघाला हे मलाही सांगता येणार नाही. मात्र, माझा आग्रह उरुळी कांचन व परिसर हा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यातच राहण्यासाठी आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे या हद्दीतील व्यावसायिक निर्बंध पोलिसांकडून पाळले जातील. या ठिकाणचा रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १३.८४ टक्के आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखालील समितीने या ठिकाणचे व्यवहार ग्रामीण भागाप्रमाणे सकाळी ७ ते ११ या वेळेत करण्याचे निश्चित केले आहे. शेती व निगडित व्यवसाय कामांना सूट देण्याचे निर्देश आहेत. तर दंडात्मक पावत्यांच्या बाबत माहिती घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल

नागेश गायकवाड, पोलीस अधिकारी, पुणे शहर पोलीस गृह शाखा