शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

गावच्या समस्या सोडविल्या तर देशाच्या सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:13 IST

पुणे : प्रत्येकाने आपल्या शाळेला भेट दिली तर पूर्वीच्या समस्या अजूनही तेथे कमी अधिक प्रमाणात कायम असल्याचे दिसून येईल. ...

पुणे : प्रत्येकाने आपल्या शाळेला भेट दिली तर पूर्वीच्या समस्या अजूनही तेथे कमी अधिक प्रमाणात कायम असल्याचे दिसून येईल. त्यामुळे प्रत्येकाने या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. सर्वांनी आपापल्या गावातील समस्या सोडविल्या तर देशातील समस्या दूर होण्यास प्रयत्न होईल आणि देशाच्या विकासाला दिशा मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांनी बुधवारी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित जीवनसाधना गौरव पुरस्काराचे वितरण समारभ प्रसंगी डॉ. कोल्हे बोलत होते. विद्यापीठातर्फे उच्च शिक्षण व शैक्षणिक प्रशासन क्षेत्रातील कामगिरीबद्दल डॉ. आर. एस. माळी यांना तर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. प्रशांत होरे यांना, सांस्कृतिक क्षेत्रासाठी सुधीर गाडगीळ यांना आणि शैक्षणिक व साहित्यिक कामगिरीसाठी डॉ. न. म. जोशी यांना पुरस्कार दिले. तसेच विदीत गुजराथी, तन्मय देवचक्के, हृषीकेश पाळंदे, डॉ. स्नेहल शेकटकर आणि डी. भालचंद्र पुजारी यांना युवा गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.

आर. एस. माळी म्हणाले, विद्यार्थी म्हणून जेथे शिक्षण घेतले आणि शिक्षक म्हणून काम केले, त्याच विद्यापीठाकडून सन्मानित केले जात असल्याने आनंद होत आहे. तसेच प्रत्येकाने फळाची अपेक्षा न करता अखंडपणे प्रयत्न करत रहावे. निश्चितच त्यांना यश प्राप्त होईल.

प्रशांत हिरे म्हणाले, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिरे कुटुंबियांनी जे काम केले त्याचा परिपाक म्हणजे विद्यापीठाने केलेला हा सन्मान आहे, असे मी समजतो.

न. म. जोशी म्हणाले, विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्कार देवून माझ्या कपाळी विद्यादेवीचा टिळा लावला आहे. शिक्षण घेतलेल्या विद्यापीठाकडूनच सन्मान होत असल्यामुळे खूप आनंद होत आहे.

सुधीर गाडगीळ म्हणाले, पुरस्कार स्वीकारताना मला माझ्या पत्नीची आठवण येत आहे. तिच्यामुळे मी नोकरी सोडून निवेदन व मुलाखत क्षेत्रात मुक्तपणे काम करू शकलो. मला सर्वच क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती घेता आल्या. तसेच मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला दुय्यम न समजता त्याचा सन्मान करून बोलते केले पाहिजे.

दरम्यान, या कार्यक्रमात विद्यापीठातील व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील गुणवंत वरिष्ठ अधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पारितोषिक देण्यात आले.