शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

गावच्या समस्या सोडविल्या तर देशाच्या सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:13 IST

पुणे : प्रत्येकाने आपल्या शाळेला भेट दिली तर पूर्वीच्या समस्या अजूनही तेथे कमी अधिक प्रमाणात कायम असल्याचे दिसून येईल. ...

पुणे : प्रत्येकाने आपल्या शाळेला भेट दिली तर पूर्वीच्या समस्या अजूनही तेथे कमी अधिक प्रमाणात कायम असल्याचे दिसून येईल. त्यामुळे प्रत्येकाने या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. सर्वांनी आपापल्या गावातील समस्या सोडविल्या तर देशातील समस्या दूर होण्यास प्रयत्न होईल आणि देशाच्या विकासाला दिशा मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांनी बुधवारी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित जीवनसाधना गौरव पुरस्काराचे वितरण समारभ प्रसंगी डॉ. कोल्हे बोलत होते. विद्यापीठातर्फे उच्च शिक्षण व शैक्षणिक प्रशासन क्षेत्रातील कामगिरीबद्दल डॉ. आर. एस. माळी यांना तर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. प्रशांत होरे यांना, सांस्कृतिक क्षेत्रासाठी सुधीर गाडगीळ यांना आणि शैक्षणिक व साहित्यिक कामगिरीसाठी डॉ. न. म. जोशी यांना पुरस्कार दिले. तसेच विदीत गुजराथी, तन्मय देवचक्के, हृषीकेश पाळंदे, डॉ. स्नेहल शेकटकर आणि डी. भालचंद्र पुजारी यांना युवा गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.

आर. एस. माळी म्हणाले, विद्यार्थी म्हणून जेथे शिक्षण घेतले आणि शिक्षक म्हणून काम केले, त्याच विद्यापीठाकडून सन्मानित केले जात असल्याने आनंद होत आहे. तसेच प्रत्येकाने फळाची अपेक्षा न करता अखंडपणे प्रयत्न करत रहावे. निश्चितच त्यांना यश प्राप्त होईल.

प्रशांत हिरे म्हणाले, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिरे कुटुंबियांनी जे काम केले त्याचा परिपाक म्हणजे विद्यापीठाने केलेला हा सन्मान आहे, असे मी समजतो.

न. म. जोशी म्हणाले, विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्कार देवून माझ्या कपाळी विद्यादेवीचा टिळा लावला आहे. शिक्षण घेतलेल्या विद्यापीठाकडूनच सन्मान होत असल्यामुळे खूप आनंद होत आहे.

सुधीर गाडगीळ म्हणाले, पुरस्कार स्वीकारताना मला माझ्या पत्नीची आठवण येत आहे. तिच्यामुळे मी नोकरी सोडून निवेदन व मुलाखत क्षेत्रात मुक्तपणे काम करू शकलो. मला सर्वच क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती घेता आल्या. तसेच मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला दुय्यम न समजता त्याचा सन्मान करून बोलते केले पाहिजे.

दरम्यान, या कार्यक्रमात विद्यापीठातील व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील गुणवंत वरिष्ठ अधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पारितोषिक देण्यात आले.