शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

गावच्या समस्या सोडविल्या तर देशाच्या सुटतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:13 IST

पुणे : प्रत्येकाने आपल्या शाळेला भेट दिली तर पूर्वीच्या समस्या अजूनही तेथे कमी अधिक प्रमाणात कायम असल्याचे दिसून येईल. ...

पुणे : प्रत्येकाने आपल्या शाळेला भेट दिली तर पूर्वीच्या समस्या अजूनही तेथे कमी अधिक प्रमाणात कायम असल्याचे दिसून येईल. त्यामुळे प्रत्येकाने या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. सर्वांनी आपापल्या गावातील समस्या सोडविल्या तर देशातील समस्या दूर होण्यास प्रयत्न होईल आणि देशाच्या विकासाला दिशा मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांनी बुधवारी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित जीवनसाधना गौरव पुरस्काराचे वितरण समारभ प्रसंगी डॉ. कोल्हे बोलत होते. विद्यापीठातर्फे उच्च शिक्षण व शैक्षणिक प्रशासन क्षेत्रातील कामगिरीबद्दल डॉ. आर. एस. माळी यांना तर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. प्रशांत होरे यांना, सांस्कृतिक क्षेत्रासाठी सुधीर गाडगीळ यांना आणि शैक्षणिक व साहित्यिक कामगिरीसाठी डॉ. न. म. जोशी यांना पुरस्कार दिले. तसेच विदीत गुजराथी, तन्मय देवचक्के, हृषीकेश पाळंदे, डॉ. स्नेहल शेकटकर आणि डी. भालचंद्र पुजारी यांना युवा गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.

आर. एस. माळी म्हणाले, विद्यार्थी म्हणून जेथे शिक्षण घेतले आणि शिक्षक म्हणून काम केले, त्याच विद्यापीठाकडून सन्मानित केले जात असल्याने आनंद होत आहे. तसेच प्रत्येकाने फळाची अपेक्षा न करता अखंडपणे प्रयत्न करत रहावे. निश्चितच त्यांना यश प्राप्त होईल.

प्रशांत हिरे म्हणाले, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिरे कुटुंबियांनी जे काम केले त्याचा परिपाक म्हणजे विद्यापीठाने केलेला हा सन्मान आहे, असे मी समजतो.

न. म. जोशी म्हणाले, विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्कार देवून माझ्या कपाळी विद्यादेवीचा टिळा लावला आहे. शिक्षण घेतलेल्या विद्यापीठाकडूनच सन्मान होत असल्यामुळे खूप आनंद होत आहे.

सुधीर गाडगीळ म्हणाले, पुरस्कार स्वीकारताना मला माझ्या पत्नीची आठवण येत आहे. तिच्यामुळे मी नोकरी सोडून निवेदन व मुलाखत क्षेत्रात मुक्तपणे काम करू शकलो. मला सर्वच क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती घेता आल्या. तसेच मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला दुय्यम न समजता त्याचा सन्मान करून बोलते केले पाहिजे.

दरम्यान, या कार्यक्रमात विद्यापीठातील व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील गुणवंत वरिष्ठ अधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पारितोषिक देण्यात आले.