शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीतले ‘राजे’ ऐकत नसतील, तर त्यांना अडवा : उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:15 IST

पुणे : “लोकशाहीतील ‘राजे’ नीट वागत नसतील तर त्यांना ‘अडवा आणि गाडा’. सरकारला देशाची फाळणी करायची आहे का? मराठा ...

पुणे : “लोकशाहीतील ‘राजे’ नीट वागत नसतील तर त्यांना ‘अडवा आणि गाडा’. सरकारला देशाची फाळणी करायची आहे का? मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे,” अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.

सोमवारी (दि. १४) पुण्यात औंध येथे छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे एक तासभर चर्चा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उदयनराजे यांनी सांगितले, की व्यक्तिगत स्वार्थासाठी कधी दुफळी निर्माण होईल असे काही कृत्य केले नाही. आंदोलन वगैरे का होते? आरक्षण द्यायचे असते तर राज्यकर्त्यांनी ते मागेच दिले असते. राजकारण व्यक्तिकेंद्रित झाले आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण द्या. समाजाचा उद्रेक होईल अशी वेळ येऊ देऊ नका. मराठा समाजाचा उद्रेक झाला तर आम्ही काही करू शकणार नाही.

भूतकाळाचा विचार करायला पाहिजे, हे असे का झाले? असा प्रश्न छत्रपती उदयनराजे यांनी विचारला. निवडून यायचे असल्याने त्यांना सोईच्या असलेल्या समाजाचा ते फायदा करून देतात. लोकशाहीतले राजे नीट वागत नसतील, तर त्यांना अडवा आणि गाडा. माझ्यापासून सुरुवात करा. मला प्रश्न विचारा, असेही त्यांनी सांगितले.

“छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे,” अशी ग्वाही छत्रपती उदयनराजे यांनी या वेळी दिली. प्रत्येकाचे विचार एकसारखे असावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. गायकवाड आयोगाचा अहवाल यांनी वाचलाच नाही. यात पक्ष आणू नका. हे सगळ्या पक्षांना लागू होते. इथे प्रश्न समाजाचा आहे. आरक्षणप्रश्न ही राज्याची जबाबदारी आहे. सभागृहात एक बोलतात आणि बाहेर वेगळे. विशेष अधिवेशन होऊ द्या. मग बघू, असे उदयनराजे यांनी सांगितले.

---------------------------

...दिशाभूल करणे, हे रक्तात नाही

संभाजीराजे यांनी सांगितले की, सातारा आणि कोल्हापूर ही दोन घराणी एकत्र आली, एकमेकांची भेट घेतली, याचा आनंद आहे. आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत आहे. मराठा समाजाची दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. राज्य सरकारने सहा मागण्या मान्य कराव्यात. अधिवेशनातून अनेक विषय मार्गी लागू शकतात.

चौकट

शाहू महाराज-पवार भेटीची कल्पना नाही

शाहू महाराज आणि अजित पवार यांच्या भेटीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. “शाहू महाराज आणि अजित पवारांच्या भेटीबद्दल मला कल्पना नव्हती. ते आशीर्वाद घ्यायला आले असतील. त्यातून जर काही निघणार असेल तर आनंद आहे,” असे ते म्हणाले.

-------------

‘सुपर न्यूमररी’ वापरा

सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसींच्या सवलती मराठा समाजातील गरिबांना मिळाव्यात, जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करा आणि २१८५ विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या नियुक्त्या तत्काळ द्या. आमच्या या ५ मागण्या राज्य सरकारने लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार ‘सुपर न्यूमररी’चा वापर करू शकते. आजपर्यंत राज्यात ‘सुपर न्यूमररी’ पद्धत वापरली गेली आहे. आता शिक्षणातही वापरा, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

---------

(फोटो)