शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

लोकशाहीतले ‘राजे’ ऐकत नसतील, तर त्यांना अडवा : उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:15 IST

पुणे : “लोकशाहीतील ‘राजे’ नीट वागत नसतील तर त्यांना ‘अडवा आणि गाडा’. सरकारला देशाची फाळणी करायची आहे का? मराठा ...

पुणे : “लोकशाहीतील ‘राजे’ नीट वागत नसतील तर त्यांना ‘अडवा आणि गाडा’. सरकारला देशाची फाळणी करायची आहे का? मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे,” अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली.

सोमवारी (दि. १४) पुण्यात औंध येथे छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे एक तासभर चर्चा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उदयनराजे यांनी सांगितले, की व्यक्तिगत स्वार्थासाठी कधी दुफळी निर्माण होईल असे काही कृत्य केले नाही. आंदोलन वगैरे का होते? आरक्षण द्यायचे असते तर राज्यकर्त्यांनी ते मागेच दिले असते. राजकारण व्यक्तिकेंद्रित झाले आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण द्या. समाजाचा उद्रेक होईल अशी वेळ येऊ देऊ नका. मराठा समाजाचा उद्रेक झाला तर आम्ही काही करू शकणार नाही.

भूतकाळाचा विचार करायला पाहिजे, हे असे का झाले? असा प्रश्न छत्रपती उदयनराजे यांनी विचारला. निवडून यायचे असल्याने त्यांना सोईच्या असलेल्या समाजाचा ते फायदा करून देतात. लोकशाहीतले राजे नीट वागत नसतील, तर त्यांना अडवा आणि गाडा. माझ्यापासून सुरुवात करा. मला प्रश्न विचारा, असेही त्यांनी सांगितले.

“छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे,” अशी ग्वाही छत्रपती उदयनराजे यांनी या वेळी दिली. प्रत्येकाचे विचार एकसारखे असावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. गायकवाड आयोगाचा अहवाल यांनी वाचलाच नाही. यात पक्ष आणू नका. हे सगळ्या पक्षांना लागू होते. इथे प्रश्न समाजाचा आहे. आरक्षणप्रश्न ही राज्याची जबाबदारी आहे. सभागृहात एक बोलतात आणि बाहेर वेगळे. विशेष अधिवेशन होऊ द्या. मग बघू, असे उदयनराजे यांनी सांगितले.

---------------------------

...दिशाभूल करणे, हे रक्तात नाही

संभाजीराजे यांनी सांगितले की, सातारा आणि कोल्हापूर ही दोन घराणी एकत्र आली, एकमेकांची भेट घेतली, याचा आनंद आहे. आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत आहे. मराठा समाजाची दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. राज्य सरकारने सहा मागण्या मान्य कराव्यात. अधिवेशनातून अनेक विषय मार्गी लागू शकतात.

चौकट

शाहू महाराज-पवार भेटीची कल्पना नाही

शाहू महाराज आणि अजित पवार यांच्या भेटीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. “शाहू महाराज आणि अजित पवारांच्या भेटीबद्दल मला कल्पना नव्हती. ते आशीर्वाद घ्यायला आले असतील. त्यातून जर काही निघणार असेल तर आनंद आहे,” असे ते म्हणाले.

-------------

‘सुपर न्यूमररी’ वापरा

सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसींच्या सवलती मराठा समाजातील गरिबांना मिळाव्यात, जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करा आणि २१८५ विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या नियुक्त्या तत्काळ द्या. आमच्या या ५ मागण्या राज्य सरकारने लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार ‘सुपर न्यूमररी’चा वापर करू शकते. आजपर्यंत राज्यात ‘सुपर न्यूमररी’ पद्धत वापरली गेली आहे. आता शिक्षणातही वापरा, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

---------

(फोटो)