शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

जादा भाडे आकारल्यास करा शासनाकडे थेट तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 04:17 IST

गर्दीच्या हंगामात खासगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पुुणे : गर्दीच्या हंगामात खासगी वाहनचालकांनी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने तिकिटाचे पैसे घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आता यासंदर्भात प्रवाशांना थेट तक्रार करता येणार आहे. प्रवाशांना मोटार वाहन विभागाच्या ०२२-६२४२६६६६ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवता येणार आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित केला आहे. या निर्णयानुसार आता गर्दीच्या हंगामात खासगी प्रवासी वाहनधारकांना एसटी महामंडळाच्या बसच्या तिकिटापेक्षा दीडपटच तिकीट आकारता येणार आहे. दरम्यान, जर एखाद्या प्रवासी वाहनांमध्ये यापेक्षा जास्त भाडे आकारले गेले तर संबंधित वाहनाचा परवानाही रद्द करण्यात येणार आहे. खासगी प्रवासी वाहनधारकांकडून गर्दीच्या काळात प्रवाशांची होणारी लुबाडणूक आता थांबणार आहे. तसेच तक्रारी विभागाच्या ६६६.३१ंल्ल२स्रङ्म१३ूङ्मेस्र’ं्रल्ल३२.ेंँंङ्मल्ल’्रल्ली.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरदेखील नोंदविता येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.उन्हाळी सुटी, दिवाळी सुटी, गणेशोत्सव, होळी, नाताळ सुटी या गर्दीच्या काळामध्ये खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. त्यामुळे या वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका याचिकेत दिले होते. त्यानुसार हे भाडेदर निश्चित करण्यासाठी पुणे येथील केंद्र शासनाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेने खासगी कंत्राटी वाहतुकीच्या विविध वर्गवारीतील सोयी-सुविधांचा अभ्यास करून अहवाल सादर केला.