शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

एलबीटी रद्द केल्यास आंदोलन करणार

By admin | Updated: June 16, 2014 08:16 IST

महाराष्ट्र राज्य महापालिका-नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या रविवारी पिंपरीतील बैठकीत बोलताना अध्यक्ष शरद राव

बैठक : महाराष्ट्र राज्य महापालिका-नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या रविवारी पिंपरीतील बैठकीत बोलताना अध्यक्ष शरद राव. 

महापालिका-नगरपालिका कामगार कर्मचारी, तसेच सर्व क्षेत्रांतील कामगार-कर्मचार्‍यांना आवाहन करणारा ठराव मंजूर केला. राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करू नये, असे आवाहन केले. तसेच आंदोलनाच्या सर्मथनार्थ सार्वजनिक परिवहन सेवेतील कामगार, ऑटो रिक्षावाले, फेरीवाले, लाखो कंत्नाटी कामगार बेमुदत आंदोलन करतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला. पिंपरी : राज्य सरकारने एलबीटी रद्द केल्यास महाराष्ट्रातील सर्व महापालिकांचे कर्मचारी बेमुदत आंदोलन करतील. आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारविरोधी मतदान करून धडा शिकवतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य महापालिका-नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष शरद राव यांनी रविवारी पिंपरी येथे दिला. महाराष्ट्र राज्य महापालिका-नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या राज्यभरातील प्रमुख कामगार प्रतिनिधींची बैठक यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य सभागृहात झाली. या वेळी ते बोलत होते. फेडरेशनचे सरचिटणीस शशिकांत ऊर्फ बबन झिंजुर्डे, सुभाष सरीन, प्रकाश जाधव, रवि राव, बापू पवार, दीपक कुलकर्णी, डॉ. नवनाथ महारनवर, डॉ. सुरेश ठाकूर, गणेश शिंगे उपस्थित होते.शरद राव म्हणाले, ''उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता एलबीटी रद्द करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केल्यास महाराष्ट्रातील सर्व महापालिकांतील सर्व कामगार-कर्मचारी बेमुदत आंदोलन करतील. एलबीटी व जकातची बाब न्यायप्रविष्ट असून, यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकार कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. असे असताना न्यायलय निर्णयाची वाट न पाहता निर्णय घेतल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल. १0 मे २0१३ रोजी सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती एच. एल. दत्तू व न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार ४ महिन्यांत मुंबई उच्च न्यायालयाने जकात व एलबीटीसंदर्भात सुनावणी घ्यावी, असे सांगितले आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयातून या दाव्याची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. या कारणाने आमच्या वकिलांनी अर्ज करूनही हादावा बोर्डावर घेतला नाही. जकात व एलबीटीचा प्रश्न उच्च न्यायालयामार्फत सोडविल्यानंतरच राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावयास हवा, केवळ राजकीय व मूठभर व्यापार्‍यांच्या मतांचा विचार करून किंवा व्यापार्‍यांच्या दबावाखाली येऊन सरकारने निर्णय घेऊ नये.''(प्रतिनिधी)