शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

रुग्णवाहिकांना वाट दिल्यास वाचेल जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:58 IST

एका ज्येष्ठाच्या छातीत खूप वेदना होत होत्या... कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली... रुग्णाची स्थिती खूपच गंभीर होती... त्यांना बावधनहून कोथरूडमधील एका रुग्णालयात आणले.

पुणे : एका ज्येष्ठाच्या छातीत खूप वेदना होत होत्या... कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली... रुग्णाची स्थिती खूपच गंभीर होती... त्यांना बावधनहून कोथरूडमधील एका रुग्णालयात आणले. उपचार सुरू झाले अन् रुग्णाचा जीव वाचला... पण त्या वेळी डॉक्टरांचे एक वाक्य सर्वांनाच हुरहुर लावून गेले... ‘थोडा उशीर झाला असता, तर ते वाचले नसते.’ रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितलेला हा अनुभव... त्या दिवशी वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकली असती तर... प्रत्येक वेळी वाट मोकळी असेलच, असे नाही... शहर व परिसरात अनेकदा वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचे पाहायला मिळते. रुग्णांच्या नातेवाइकांप्रमाणेच आम्हालाही वाहतूककोंडीची धास्ती असल्याचे रुग्णवाहिकाचालकांनी सांगितले.‘रुग्णवाहिकांसाठी वाट मोकळी करून द्या’ असे आवाहन विविध यंत्रणांकडून सातत्याने केले जाते. पण तब्बल ३० लाखांहून अधिक वाहने असलेल्या शहरामध्ये रुग्णवाहिकांसाठी ही वाट तितकीशी सोपी नाही. ‘लोकमत’ने गुरूवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून रुग्णवाहिकांसाठी ही वाट किती बिकट असते, हे समोर आणले. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही रुग्णावाहिकांकडे अनेक वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जाते. सायरन वाजवत येणाºया रुग्णवाहिकांना वाट देण्यातही कुचराई केली जाते. त्यामुळे चालकांना अनेकदा हॉर्न वाजविण्याची वेळ येते. रस्त्यावरील सिग्नल बंद असो वा सुरू, चालकांना हा अनुभव नेहमीच येतो. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत रस्ते ओसंडून वाहत असतात. या काळात रुग्णवाहिका चालकांचा वाट काढताना कस लागतो.वाहतूककोंडीतून वाट काढताना कराव्या लागणाºया कसरतीविषयी शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या रुग्णवाहिका चालकांशी संवाद साधला असता बहुतेकांनी बेशिस्त वाहनचालकांना दोष दिला. रस्त्यावर रुग्णवाहिका दिसल्यानंतर तिथे पोलीस असल्यास ते वाट मोकळी करण्यासाठी मदत करतात. मात्र, अनेकदा मोठ्या चौकांमध्ये पोलीस नसतील तर काही वाहनचालक साधे सामाजिक भानही ठेवत नाही.रुग्णवाहिका दिसत असूनही वाट दिली जात नाही. काही वाहनचालक स्वत:हून पुढाकार घेत गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला मदत करतात. पण हा चांगुलपणा, सामाजिक जाणीव खूप कमी वेळा पाहायला मिळते. वाहनचालक, नागरिकांची मानसिकता बदलल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही, असे रुग्णवाहिका चालकांनी सांगितले.रस्त्यावरून रुग्णवाहिका जात असताना वाट मोकळी करून देणे अपेक्षित असते. पण अनेक वाहनचालकांना त्याचे भान नसते. वाट देण्याच्या नादात वाहनांचा वेग वाढवला जातो. उजव्या, डाव्या बाजूला वाहने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मानसिकतेत बदल व्हायला हवा. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्याचाही फटका रुग्णवाहिकांना बसतो.- गोपाळ जांभे, सचिव,पुणे जिल्हा अ‍ॅम्ब्युलन्स असोसिएशनमी गेली ७ वर्षे रूग्णवाहिका चालक म्हणून पिंपरी-चिंचवड येथे कार्य करत आहे. पुर्वीची आणि आताची परिस्थिती बघता रूग्णवाहिकांना योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांकडून पाहिजे तशी मदत न मिळाल्याने रूग्णवाहिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. सायरन चा आवाज येत असून देखील नागरिक बाजूला होणार नाही. आहे तिथेच उभे राहणार. आणि काही नागरिक असेही आहेत की, जे रूग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा देतील. लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. - मनोज दाभाडे, चालकमी हडपसर येथील परिसरामध्ये रूग्णवाहिका सेवा पुरवण्याचे काम करतो. साधारणत: सकाळी ३ तास आणि सायंकाळी ३ तास जास्त प्रमाणात गाड्यांची रहदारी असल्याने रूग्णवाहिकेला जाण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा वेळी एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर आम्हाला त्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागतो. आम्हाला रिक्षा चालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. तसेच एखाद्यावेळी बीआरटी बस जर बंद पडलेली असेल तर मार्गावर खूप अडचणी येतात.- माधव तेकवडे, चालक ईश्वर रूग्णवाहिका