शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकांना वाट दिल्यास वाचेल जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:58 IST

एका ज्येष्ठाच्या छातीत खूप वेदना होत होत्या... कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली... रुग्णाची स्थिती खूपच गंभीर होती... त्यांना बावधनहून कोथरूडमधील एका रुग्णालयात आणले.

पुणे : एका ज्येष्ठाच्या छातीत खूप वेदना होत होत्या... कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली... रुग्णाची स्थिती खूपच गंभीर होती... त्यांना बावधनहून कोथरूडमधील एका रुग्णालयात आणले. उपचार सुरू झाले अन् रुग्णाचा जीव वाचला... पण त्या वेळी डॉक्टरांचे एक वाक्य सर्वांनाच हुरहुर लावून गेले... ‘थोडा उशीर झाला असता, तर ते वाचले नसते.’ रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितलेला हा अनुभव... त्या दिवशी वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकली असती तर... प्रत्येक वेळी वाट मोकळी असेलच, असे नाही... शहर व परिसरात अनेकदा वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकल्याचे पाहायला मिळते. रुग्णांच्या नातेवाइकांप्रमाणेच आम्हालाही वाहतूककोंडीची धास्ती असल्याचे रुग्णवाहिकाचालकांनी सांगितले.‘रुग्णवाहिकांसाठी वाट मोकळी करून द्या’ असे आवाहन विविध यंत्रणांकडून सातत्याने केले जाते. पण तब्बल ३० लाखांहून अधिक वाहने असलेल्या शहरामध्ये रुग्णवाहिकांसाठी ही वाट तितकीशी सोपी नाही. ‘लोकमत’ने गुरूवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून रुग्णवाहिकांसाठी ही वाट किती बिकट असते, हे समोर आणले. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही रुग्णावाहिकांकडे अनेक वाहनचालकांकडून दुर्लक्ष केले जाते. सायरन वाजवत येणाºया रुग्णवाहिकांना वाट देण्यातही कुचराई केली जाते. त्यामुळे चालकांना अनेकदा हॉर्न वाजविण्याची वेळ येते. रस्त्यावरील सिग्नल बंद असो वा सुरू, चालकांना हा अनुभव नेहमीच येतो. प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत रस्ते ओसंडून वाहत असतात. या काळात रुग्णवाहिका चालकांचा वाट काढताना कस लागतो.वाहतूककोंडीतून वाट काढताना कराव्या लागणाºया कसरतीविषयी शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या रुग्णवाहिका चालकांशी संवाद साधला असता बहुतेकांनी बेशिस्त वाहनचालकांना दोष दिला. रस्त्यावर रुग्णवाहिका दिसल्यानंतर तिथे पोलीस असल्यास ते वाट मोकळी करण्यासाठी मदत करतात. मात्र, अनेकदा मोठ्या चौकांमध्ये पोलीस नसतील तर काही वाहनचालक साधे सामाजिक भानही ठेवत नाही.रुग्णवाहिका दिसत असूनही वाट दिली जात नाही. काही वाहनचालक स्वत:हून पुढाकार घेत गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला मदत करतात. पण हा चांगुलपणा, सामाजिक जाणीव खूप कमी वेळा पाहायला मिळते. वाहनचालक, नागरिकांची मानसिकता बदलल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही, असे रुग्णवाहिका चालकांनी सांगितले.रस्त्यावरून रुग्णवाहिका जात असताना वाट मोकळी करून देणे अपेक्षित असते. पण अनेक वाहनचालकांना त्याचे भान नसते. वाट देण्याच्या नादात वाहनांचा वेग वाढवला जातो. उजव्या, डाव्या बाजूला वाहने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मानसिकतेत बदल व्हायला हवा. वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. त्याचाही फटका रुग्णवाहिकांना बसतो.- गोपाळ जांभे, सचिव,पुणे जिल्हा अ‍ॅम्ब्युलन्स असोसिएशनमी गेली ७ वर्षे रूग्णवाहिका चालक म्हणून पिंपरी-चिंचवड येथे कार्य करत आहे. पुर्वीची आणि आताची परिस्थिती बघता रूग्णवाहिकांना योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांकडून पाहिजे तशी मदत न मिळाल्याने रूग्णवाहिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. सायरन चा आवाज येत असून देखील नागरिक बाजूला होणार नाही. आहे तिथेच उभे राहणार. आणि काही नागरिक असेही आहेत की, जे रूग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा देतील. लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. - मनोज दाभाडे, चालकमी हडपसर येथील परिसरामध्ये रूग्णवाहिका सेवा पुरवण्याचे काम करतो. साधारणत: सकाळी ३ तास आणि सायंकाळी ३ तास जास्त प्रमाणात गाड्यांची रहदारी असल्याने रूग्णवाहिकेला जाण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा वेळी एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर आम्हाला त्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी वेळ लागतो. आम्हाला रिक्षा चालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. तसेच एखाद्यावेळी बीआरटी बस जर बंद पडलेली असेल तर मार्गावर खूप अडचणी येतात.- माधव तेकवडे, चालक ईश्वर रूग्णवाहिका