शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

बारावी परीक्षा रद्द झाल्यास सीईटी घ्यावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

पुणे : सीबीएसई बोर्डाने दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने परीक्षा रद्द केल्याने महाराष्ट्रातही राज्य मंडळाच्या ...

पुणे : सीबीएसई बोर्डाने दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने परीक्षा रद्द केल्याने महाराष्ट्रातही राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश बारावीच्या गुणांवर अवलंबून नसले तरी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचाच विचार केला जातो. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्यास प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा घ्यावी लागेल, असे मत प्राचार्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमी सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आणि राज्य शासनानेसुद्धा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षासुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे. परंतु, या परीक्षा रद्द झाल्यास शहरी भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच विद्यार्थ्यांना बारावीतील विविध विषयांमधील संबंधित घटकाचे ज्ञान झाले किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी घरी राहून विद्यार्थ्यांकडून लिखित स्वरूपात काही प्रश्नांची उत्तरे मागविण्याचा विचार करावा.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट, जेईई, सीईटी आदी परीक्षा घेतल्या जातात. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेकडे फारसे लक्ष देत नाहीत. मात्र, फर्ग्युसन, स. प. महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज, वाडिया महाविद्यालय साधी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे चढाओढ असते. त्यामुळे इयत्ता अकरावी प्रवेश याप्रमाणेच पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीसुद्धा सीईटी परीक्षा द्यावी लागेल, असेही प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.

----------------

कोरोनामुळे परीक्षा रद्दचा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने त्यांना काही प्रश्नांची उत्तरे घरी बसूनच लिहिण्यास सांगितली पाहिजे. त्यातून विद्यार्थ्याला संबंधित विषय समजला आहे किंवा नाही हे जाणून घेता येईल. पुढील शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्याला पायाभूत गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठीच परीक्षा महत्त्वाच्या ठरतात.

- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा कॉलेज

------------

विद्यापीठ स्तरावरील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात घेतले जातात. परंतु, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्य शासन किंवा विद्यापीठांना अभ्यासक्रम आणि प्रमाणेच प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी लागेल.

- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड