शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

बारावी परीक्षा रद्द झाल्यास सीईटी घ्यावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

पुणे : सीबीएसई बोर्डाने दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने परीक्षा रद्द केल्याने महाराष्ट्रातही राज्य मंडळाच्या ...

पुणे : सीबीएसई बोर्डाने दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने परीक्षा रद्द केल्याने महाराष्ट्रातही राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश बारावीच्या गुणांवर अवलंबून नसले तरी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचाच विचार केला जातो. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्यास प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा घ्यावी लागेल, असे मत प्राचार्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमी सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आणि राज्य शासनानेसुद्धा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षासुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे. परंतु, या परीक्षा रद्द झाल्यास शहरी भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच विद्यार्थ्यांना बारावीतील विविध विषयांमधील संबंधित घटकाचे ज्ञान झाले किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी घरी राहून विद्यार्थ्यांकडून लिखित स्वरूपात काही प्रश्नांची उत्तरे मागविण्याचा विचार करावा.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट, जेईई, सीईटी आदी परीक्षा घेतल्या जातात. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेकडे फारसे लक्ष देत नाहीत. मात्र, फर्ग्युसन, स. प. महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज, वाडिया महाविद्यालय साधी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे चढाओढ असते. त्यामुळे इयत्ता अकरावी प्रवेश याप्रमाणेच पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीसुद्धा सीईटी परीक्षा द्यावी लागेल, असेही प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.

----------------

कोरोनामुळे परीक्षा रद्दचा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने त्यांना काही प्रश्नांची उत्तरे घरी बसूनच लिहिण्यास सांगितली पाहिजे. त्यातून विद्यार्थ्याला संबंधित विषय समजला आहे किंवा नाही हे जाणून घेता येईल. पुढील शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्याला पायाभूत गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठीच परीक्षा महत्त्वाच्या ठरतात.

- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा कॉलेज

------------

विद्यापीठ स्तरावरील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात घेतले जातात. परंतु, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्य शासन किंवा विद्यापीठांना अभ्यासक्रम आणि प्रमाणेच प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी लागेल.

- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड