शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

बारावी परीक्षा रद्द झाल्यास सीईटी घ्यावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

पुणे : सीबीएसई बोर्डाने दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने परीक्षा रद्द केल्याने महाराष्ट्रातही राज्य मंडळाच्या ...

पुणे : सीबीएसई बोर्डाने दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने परीक्षा रद्द केल्याने महाराष्ट्रातही राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश बारावीच्या गुणांवर अवलंबून नसले तरी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचाच विचार केला जातो. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्यास प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा घ्यावी लागेल, असे मत प्राचार्यांकडून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमी सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आणि राज्य शासनानेसुद्धा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षासुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे. परंतु, या परीक्षा रद्द झाल्यास शहरी भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच विद्यार्थ्यांना बारावीतील विविध विषयांमधील संबंधित घटकाचे ज्ञान झाले किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी घरी राहून विद्यार्थ्यांकडून लिखित स्वरूपात काही प्रश्नांची उत्तरे मागविण्याचा विचार करावा.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट, जेईई, सीईटी आदी परीक्षा घेतल्या जातात. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेकडे फारसे लक्ष देत नाहीत. मात्र, फर्ग्युसन, स. प. महाविद्यालय, मॉडर्न कॉलेज, वाडिया महाविद्यालय साधी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे चढाओढ असते. त्यामुळे इयत्ता अकरावी प्रवेश याप्रमाणेच पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीसुद्धा सीईटी परीक्षा द्यावी लागेल, असेही प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.

----------------

कोरोनामुळे परीक्षा रद्दचा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने त्यांना काही प्रश्नांची उत्तरे घरी बसूनच लिहिण्यास सांगितली पाहिजे. त्यातून विद्यार्थ्याला संबंधित विषय समजला आहे किंवा नाही हे जाणून घेता येईल. पुढील शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्याला पायाभूत गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठीच परीक्षा महत्त्वाच्या ठरतात.

- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा कॉलेज

------------

विद्यापीठ स्तरावरील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात घेतले जातात. परंतु, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या तर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्य शासन किंवा विद्यापीठांना अभ्यासक्रम आणि प्रमाणेच प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी लागेल.

- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड