शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बुद्धांनी दिलेले पंचशील अंगीकारल्यास आदर्श जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:10 IST

खोडद: तथागत बुद्धांनी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त व मध्यम मार्ग म्हणून पंचशील व अष्टांगिक मार्ग दिला ...

खोडद: तथागत बुद्धांनी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त व मध्यम मार्ग म्हणून पंचशील व अष्टांगिक मार्ग दिला आहे. आपले मन हे दुःखाचे उगमस्थान आहे. आपण जर मनावर नियंत्रण मिळवले तर आपण नक्कीच दुखःमुक्त होऊ. मैत्री, दान, समाधान, नम्रता आणि प्रज्ञा हे पंचशीलाचे महत्त्वाचे गुण आहेत. बुद्धांनी दिलेले पंचशील प्रामाणिकपणे अंगीकारल्यास एक आदर्श जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन धम्मचारी अदित्य बोधी यांनी केले.

वर्षावासानिमित्त जुन्नर तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी भाजे येथील बुद्धलेणी व सधम्म प्रदीप ध्यान-धारणा केंद्राला भेट देण्यासाठी धम्मसहल आयोजित केली होती. ध्यान-धारणा केंद्रात त्रिशरण, पंचशील, ध्यान व बुद्धवंदना झाल्यानंतर धम्मप्रवचन करताना अदित्य बोधी बोलत होते.

यावेळी धम्मचारी अदित्यबोधी म्हणाले की, ध्यान-धारणेमुळे आपले मन एकाग्र होते व मन एकाग्र झाल्याने आपण आपल्या कामावर उत्तमप्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी बुद्धांनी दिलेला ध्यान-धारणेचा मार्ग सर्वोत्तम आहे. आपले मन व विचार हे मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहेत. आपले मन व विचार नियंत्रणात ठेवण्यासाठी ध्यान-धारणा महत्वाची आहे.

धम्मचारी यशोरत्न म्हणाले की, "अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, शडायतन, स्पर्श, वेदना,तृष्णा, उपदान (आसक्ती ),भव, जन्म, जरा (मृत्यू) हे मानवी जीवनातील शाश्वत सत्य आहेत तर दुःख,श्रद्धा,आनंद,प्रीती,प्रमोद,सुख,समाधी,या अवस्था आहेत.दुःख, दुःखातून श्रद्धा,श्रद्धेतून आनंद,आनंदातून प्रमोद,प्रमोदातून सुख,सुखातून समाधी अशाप्रकारे एकातून एक भावना निर्माण होतात. म्हणून आजच्या काळात बुद्धांनी दिलेला मध्यम मार्ग जीवन जगण्यासाठी सोपा व सहज आहे."

प्रास्ताविक धम्मचारी यशोरत्न यांनी केले व धम्मचारी प्रबोधरत्न यांनी स्वागत व आभार व्यक्त केले.धम्म प्रवचनानंतर भाजे येथील बुद्ध लेणीला सर्वांनी भेट देऊन या लेणीविषयी माहिती जाणून घेतली.

२५ खोडद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने वर्षावासानिमित्त भाजे येथील सधम्म प्रदीप ध्यानधारणा केंद्राला भेट दिली.

250921\picsart_09-25-02.17.47.jpg

?????? - ??.????????? ??????? ??????????????????? ????? ??????????? ???? ????? ????? ?????? ?????????? ????????? ??? ????.