शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
2
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
3
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
4
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
5
"कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
6
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
7
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
8
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
9
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
10
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
11
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
13
नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं
14
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
15
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
16
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
17
Western Overseas Study Abroad IPO: पहिल्याच दिवशी IPO नं दिला झटका, आपटून ५२ रुपयांवर आला; लागलं लोअर सर्किट
18
Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..
19
Relationship Tips: बायकोला खुश कसे ठेवावे? प्रेमानंद महाराज म्हणाले, 'मी यात तज्ज्ञ नाही पण...'
20
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
Daily Top 2Weekly Top 5

मी सैन्याच्या नव्हे, व्यवस्थेच्या विरोधात : शर्मिला इरोम यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:18 IST

सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो.

ठळक मुद्देकाश्मीरमधील महिलांसाठी काम करणार

 पुणे : ‘लोकशाहीतील सरकार लोकांचेच असले पाहिजे. मी राष्ट्रविरोधी कृत्याचे समर्थन कधीच करणार नाही. लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांच्या समस्यांचा बारकाईने विचार व्हायला हवा. सीमाभागात आस्फा कायद्याचे भीषण परिणाम भोगावे लागतात. सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो. मी सैन्याच्या नव्हे तर व्यवस्थेच्या विरोधात आहे’, अशी स्पष्टोक्ती मणिपूर येथील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या शर्मिला इरोम यांनी दिली. काँग्रेस किंवा भाजपपेक्षाही मला लोकांचे सरकार आवडते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.     जगातील सर्वात जास्त काळ उपोषण केलेल्या मणिपूर राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री ‘आयर्न लेडी’ शर्मिला इरोम यांची प्रगट मुलाखत महावीर जैन विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. युवराज शहा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शर्मिला यांचे पती दसमंड कुतिनाहो, प्रमुख पाहुणे म्हणून विद्या बाळ, असीम सरोदे, डॉ. योगेश वाठारकर, संजय शहा, सरहदचे संजय नहार उपस्थित होते. ‘सरहद’ तफे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    शर्मिला इरोम म्हणाल्या, ‘आंदोलनाच्या काळात मला खूप नैराश्य येत होते. राजकारणात गेल्याने विश्वासार्हता कमी झाली, असे मला वाटत नाही. मी आजवर मोदींना भेटले नाही. मला सरहद संस्थेने सदिच्छा दूत नेमले असून काश्मीरमधील महिलांसाठी काम करणार आहे. मी काश्मीरच्या लोकांना प्रेम देऊ इच्छिते. एकीकडे काश्मीर सरकार तर दुसरीकडे पाकिस्तान अशा दोन्ही बाजूंनी काश्मीरमधील सर्वसामान्य भरडले जात आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मला खूप काम करायचे आहे. सरकार आणि लष्कर दहशतवादाविरोधातील कारवाईसाठी अब्जावधी रुपये खर्च करतात. मात्र, सर्वसामान्यांचे हाल, शेतक-यांच्या आत्महत्या हे भीषण वास्तव स्वीकारुन त्यावर मार्ग काढायला सरकार पुढे येत नाही.’‘भारतीय समाजात आजही स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा कृत्यांविरोधात कडक कारवाई होऊन सामान्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.विद्या बाळ म्हणाल्या, ‘सर्वसामान्य लोक कायमच व्यवस्थेचे बळी ठरतात. शर्मिलाने १६ वर्षे उपोषण करुनही निष्ठुर, निर्दयी सरकारला कसलाही फरक पडला नाही. उपोषण राहून मरण्यापेक्षा जिवंत राहून काम करणे गरजेचे आहे, हे पटल्याने तिने मानवी हक्कांसाठी लढा उभारला आहे. सध्या समाजाची अवस्था संवेदनाहीन झाली आहे. या समाजाविरोधात लढा उभारणारी इरोम ही जिद्दीचे प्रतीक आहे.’--------------------मोदी सरकार मानवाधिकारासाठी काम करते का, असे विचारले असता इरोम म्हणाल्या, ‘लोकांनी सरकार निवडून दिले आहे. त्यामुळे मोदी कसे आहेत, त्यांचे सरकार कसे आहे, हे जनताच ठरवेल. माझा कोणत्याही पक्षाच्या नव्हे, तर लोकांच्या सरकारवर जास्त विश्वास आहे. आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून इतरांचा विचार केला पाहिजे.’

 

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाSanjay Naharसंजय नहारVidya Balविद्या बाळ