शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मी सैन्याच्या नव्हे, व्यवस्थेच्या विरोधात : शर्मिला इरोम यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:18 IST

सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो.

ठळक मुद्देकाश्मीरमधील महिलांसाठी काम करणार

 पुणे : ‘लोकशाहीतील सरकार लोकांचेच असले पाहिजे. मी राष्ट्रविरोधी कृत्याचे समर्थन कधीच करणार नाही. लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांच्या समस्यांचा बारकाईने विचार व्हायला हवा. सीमाभागात आस्फा कायद्याचे भीषण परिणाम भोगावे लागतात. सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो. मी सैन्याच्या नव्हे तर व्यवस्थेच्या विरोधात आहे’, अशी स्पष्टोक्ती मणिपूर येथील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या शर्मिला इरोम यांनी दिली. काँग्रेस किंवा भाजपपेक्षाही मला लोकांचे सरकार आवडते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.     जगातील सर्वात जास्त काळ उपोषण केलेल्या मणिपूर राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री ‘आयर्न लेडी’ शर्मिला इरोम यांची प्रगट मुलाखत महावीर जैन विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. युवराज शहा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शर्मिला यांचे पती दसमंड कुतिनाहो, प्रमुख पाहुणे म्हणून विद्या बाळ, असीम सरोदे, डॉ. योगेश वाठारकर, संजय शहा, सरहदचे संजय नहार उपस्थित होते. ‘सरहद’ तफे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    शर्मिला इरोम म्हणाल्या, ‘आंदोलनाच्या काळात मला खूप नैराश्य येत होते. राजकारणात गेल्याने विश्वासार्हता कमी झाली, असे मला वाटत नाही. मी आजवर मोदींना भेटले नाही. मला सरहद संस्थेने सदिच्छा दूत नेमले असून काश्मीरमधील महिलांसाठी काम करणार आहे. मी काश्मीरच्या लोकांना प्रेम देऊ इच्छिते. एकीकडे काश्मीर सरकार तर दुसरीकडे पाकिस्तान अशा दोन्ही बाजूंनी काश्मीरमधील सर्वसामान्य भरडले जात आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मला खूप काम करायचे आहे. सरकार आणि लष्कर दहशतवादाविरोधातील कारवाईसाठी अब्जावधी रुपये खर्च करतात. मात्र, सर्वसामान्यांचे हाल, शेतक-यांच्या आत्महत्या हे भीषण वास्तव स्वीकारुन त्यावर मार्ग काढायला सरकार पुढे येत नाही.’‘भारतीय समाजात आजही स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा कृत्यांविरोधात कडक कारवाई होऊन सामान्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.विद्या बाळ म्हणाल्या, ‘सर्वसामान्य लोक कायमच व्यवस्थेचे बळी ठरतात. शर्मिलाने १६ वर्षे उपोषण करुनही निष्ठुर, निर्दयी सरकारला कसलाही फरक पडला नाही. उपोषण राहून मरण्यापेक्षा जिवंत राहून काम करणे गरजेचे आहे, हे पटल्याने तिने मानवी हक्कांसाठी लढा उभारला आहे. सध्या समाजाची अवस्था संवेदनाहीन झाली आहे. या समाजाविरोधात लढा उभारणारी इरोम ही जिद्दीचे प्रतीक आहे.’--------------------मोदी सरकार मानवाधिकारासाठी काम करते का, असे विचारले असता इरोम म्हणाल्या, ‘लोकांनी सरकार निवडून दिले आहे. त्यामुळे मोदी कसे आहेत, त्यांचे सरकार कसे आहे, हे जनताच ठरवेल. माझा कोणत्याही पक्षाच्या नव्हे, तर लोकांच्या सरकारवर जास्त विश्वास आहे. आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून इतरांचा विचार केला पाहिजे.’

 

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाSanjay Naharसंजय नहारVidya Balविद्या बाळ