शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

मी सैन्याच्या नव्हे, व्यवस्थेच्या विरोधात : शर्मिला इरोम यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:18 IST

सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो.

ठळक मुद्देकाश्मीरमधील महिलांसाठी काम करणार

 पुणे : ‘लोकशाहीतील सरकार लोकांचेच असले पाहिजे. मी राष्ट्रविरोधी कृत्याचे समर्थन कधीच करणार नाही. लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांच्या समस्यांचा बारकाईने विचार व्हायला हवा. सीमाभागात आस्फा कायद्याचे भीषण परिणाम भोगावे लागतात. सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो. मी सैन्याच्या नव्हे तर व्यवस्थेच्या विरोधात आहे’, अशी स्पष्टोक्ती मणिपूर येथील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या शर्मिला इरोम यांनी दिली. काँग्रेस किंवा भाजपपेक्षाही मला लोकांचे सरकार आवडते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.     जगातील सर्वात जास्त काळ उपोषण केलेल्या मणिपूर राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री ‘आयर्न लेडी’ शर्मिला इरोम यांची प्रगट मुलाखत महावीर जैन विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. युवराज शहा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शर्मिला यांचे पती दसमंड कुतिनाहो, प्रमुख पाहुणे म्हणून विद्या बाळ, असीम सरोदे, डॉ. योगेश वाठारकर, संजय शहा, सरहदचे संजय नहार उपस्थित होते. ‘सरहद’ तफे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    शर्मिला इरोम म्हणाल्या, ‘आंदोलनाच्या काळात मला खूप नैराश्य येत होते. राजकारणात गेल्याने विश्वासार्हता कमी झाली, असे मला वाटत नाही. मी आजवर मोदींना भेटले नाही. मला सरहद संस्थेने सदिच्छा दूत नेमले असून काश्मीरमधील महिलांसाठी काम करणार आहे. मी काश्मीरच्या लोकांना प्रेम देऊ इच्छिते. एकीकडे काश्मीर सरकार तर दुसरीकडे पाकिस्तान अशा दोन्ही बाजूंनी काश्मीरमधील सर्वसामान्य भरडले जात आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मला खूप काम करायचे आहे. सरकार आणि लष्कर दहशतवादाविरोधातील कारवाईसाठी अब्जावधी रुपये खर्च करतात. मात्र, सर्वसामान्यांचे हाल, शेतक-यांच्या आत्महत्या हे भीषण वास्तव स्वीकारुन त्यावर मार्ग काढायला सरकार पुढे येत नाही.’‘भारतीय समाजात आजही स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा कृत्यांविरोधात कडक कारवाई होऊन सामान्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.विद्या बाळ म्हणाल्या, ‘सर्वसामान्य लोक कायमच व्यवस्थेचे बळी ठरतात. शर्मिलाने १६ वर्षे उपोषण करुनही निष्ठुर, निर्दयी सरकारला कसलाही फरक पडला नाही. उपोषण राहून मरण्यापेक्षा जिवंत राहून काम करणे गरजेचे आहे, हे पटल्याने तिने मानवी हक्कांसाठी लढा उभारला आहे. सध्या समाजाची अवस्था संवेदनाहीन झाली आहे. या समाजाविरोधात लढा उभारणारी इरोम ही जिद्दीचे प्रतीक आहे.’--------------------मोदी सरकार मानवाधिकारासाठी काम करते का, असे विचारले असता इरोम म्हणाल्या, ‘लोकांनी सरकार निवडून दिले आहे. त्यामुळे मोदी कसे आहेत, त्यांचे सरकार कसे आहे, हे जनताच ठरवेल. माझा कोणत्याही पक्षाच्या नव्हे, तर लोकांच्या सरकारवर जास्त विश्वास आहे. आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून इतरांचा विचार केला पाहिजे.’

 

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाSanjay Naharसंजय नहारVidya Balविद्या बाळ