शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

हिर्डोशी खोऱ्यातील गावे टँकरमुक्त करणार

By admin | Updated: May 12, 2017 04:55 IST

नीरा देवघर धरण भागात अनेक वर्षांपासून दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. या टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : नीरा देवघर धरण भागात अनेक वर्षांपासून दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. या टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना राबवून टंचाई दूर करून हिर्डोशी खोऱ्यातील गावे टँकरमुक्त करणार, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी व्यक्त केला उत्रौली-कारी गटातील नीरादेवघर धरण भागातील रिंगरोडवरील महाड-पंढरपूर रोडवरील टंचाईग्रस्त गावात टंचाई पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता उदय चाटे, शाखा अभियंता गायकवाड, विस्तार अधिकारी पी.डी साळुंके, पंचायत समिती सदस्य श्रीधर किंद्रे, स्वप्निल जाधव, सुनील भेलके, धनंजय शिरवले, देवा मसुरकर,गणेश साळुंके, सागर साळेकर, संतोष साळेकर, अंकुश साळेकर, पदमाकर डोंबाळे, किसन दिघे, बबन पोळ, अंकुश कंक, सुधीर शिरवल, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.यावेळी साळव, भांबटमाळ, रेणुसेवाडी, धारांबेवाडी, धानवली, पऱ्हर बु., पऱ्हर खु., गुढे, निवंगण, शिरवली हि.मा, कुडली बु., कुडली खुर्द, दुर्गाडी, मानटवस्ती, चौधरीवस्ती, अभेपुरी, माझेरी, शिरगाव, अशिंपी, उंबार्डेवाडी, शिळिंब या गावात जाऊन पाण्याच्या स्रोताची पाहणी केली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडून मंजूर केलेल्या शिवकालीन साठवण टाक्यांच्या कामांची व जलयुक्त शिवार योजनेतून सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. टंचाईग्रस्त गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, निधी उपलब्ध करुन भविष्यात टंचाई कायमची दूर करून सर्व गावे टँॅकरमुक्त करणार असल्याचे रणजित शिवतरे यांनी सांगितले.