शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

हिर्डोशी खोऱ्यातील गावे टँकरमुक्त करणार

By admin | Updated: May 12, 2017 04:55 IST

नीरा देवघर धरण भागात अनेक वर्षांपासून दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. या टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : नीरा देवघर धरण भागात अनेक वर्षांपासून दर वर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. या टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना राबवून टंचाई दूर करून हिर्डोशी खोऱ्यातील गावे टँकरमुक्त करणार, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी व्यक्त केला उत्रौली-कारी गटातील नीरादेवघर धरण भागातील रिंगरोडवरील महाड-पंढरपूर रोडवरील टंचाईग्रस्त गावात टंचाई पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता उदय चाटे, शाखा अभियंता गायकवाड, विस्तार अधिकारी पी.डी साळुंके, पंचायत समिती सदस्य श्रीधर किंद्रे, स्वप्निल जाधव, सुनील भेलके, धनंजय शिरवले, देवा मसुरकर,गणेश साळुंके, सागर साळेकर, संतोष साळेकर, अंकुश साळेकर, पदमाकर डोंबाळे, किसन दिघे, बबन पोळ, अंकुश कंक, सुधीर शिरवल, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.यावेळी साळव, भांबटमाळ, रेणुसेवाडी, धारांबेवाडी, धानवली, पऱ्हर बु., पऱ्हर खु., गुढे, निवंगण, शिरवली हि.मा, कुडली बु., कुडली खुर्द, दुर्गाडी, मानटवस्ती, चौधरीवस्ती, अभेपुरी, माझेरी, शिरगाव, अशिंपी, उंबार्डेवाडी, शिळिंब या गावात जाऊन पाण्याच्या स्रोताची पाहणी केली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडून मंजूर केलेल्या शिवकालीन साठवण टाक्यांच्या कामांची व जलयुक्त शिवार योजनेतून सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. टंचाईग्रस्त गावांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, निधी उपलब्ध करुन भविष्यात टंचाई कायमची दूर करून सर्व गावे टँॅकरमुक्त करणार असल्याचे रणजित शिवतरे यांनी सांगितले.