शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ ; फडांना पॅकेज द्या : डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 17:22 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांच्या यात्रा रद्द

ठळक मुद्देतमाशा ही महाराष्ट्राची लोककला : नागरिकांचे मनोरंजन करून जनजागृती करून समाजप्रबोधन

खोडद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील अनेक यात्रा रद्द झाल्या आहेत. पर्यायाने यात्रेनिमित्त आयोजित तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले. तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंतांवर आलेली उपासमारीची वेळ थांबविण्यासाठी तमाशा फडमालक व तमाशा कलावंतांना सांस्कृतिक मंत्र्यांनी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत शून्य प्रहरातील चर्चेत केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. पर्यायाने या गावांमध्ये आयोजिलेले लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले आहेत. कोरोनामुळे तमाशाच्या बुकिंगवर परिणाम तर झालाच, पण झालेल्या बुकिंग, सुपाऱ्यादेखील मोठ्या प्रमाणात रद्द झाल्या आहेत.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातदेखील खासदार डॉ. कोल्हे यांनी तमासगिरांची व्यथा मांडली असून, राज्यशासनाने तमाशा कलावंतांसह फडमालकांनाही विशेष अनुदान पॅकेज द्यावे, अशी मागणी केली आहे.तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. तमाशा कलावंतांनी आजपर्यंत अवघ्या महाराष्ट्रात जनजागृतीसोबतच करून समाजभानदेखील निर्माण केले आहे. यात्रेच्या काळात तमाशा कलावंत गावोगावी जाऊन नागरिकांचे मनोरंजन करून जनजागृती करून समाजप्रबोधन करतात. कोरोनामुळे अनेक यात्रा रद्द झाल्या आहेत. यामुळे अनके तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले आहेत. यामुळे तमाशातील कलावंत व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सांस्कृतिकमंत्र्यांनी तमाशा फडमालक व कलावंतांसाठी पॅकेज जाहीर करावे आणि तमाशा फडमालक व कलावंतांबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने पॅकेज द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी संसदेत केली.संपूर्ण महाराष्ट्रात हंगामी आणि कायमस्वरूपी असणारे सुमारे ३८५ तमाशा फड आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे गावोगावच्या रद्द होत असलेल्या यात्रांमुळे तंबूच्या प्रत्येक तमाशा फडाचं सुमारे ७५ ते ८० लाख रुपयांचं नुकसान झालं आहे, तर प्रत्येक छोट्या  तमाशा फडाचं सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व तमाशा फडांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे...............मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले निवेदनखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन तमाशा कलावंतांना विशेष अनुदान पॅकेज देण्याची मागणी केली. शिवकाळापासून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकऱ्यांचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणारी लोककला म्हणून तमाशा आणि लोकनाट्य प्रसिद्ध आहे. याचे संवर्धन करण्यासाठी राज्यशासनही सर्वतोपरी प्रयत्न करीत असते; पण मागील तीन वर्षे सतत नुकसानीत गेल्याने ही लोककला जगविण्यासाठी सरकारने तमाशा फडांना व कलावंतांना विशेष अनुदान पॅकेज द्यावे, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी या निवेदनात केली आहे.............

टॅग्स :narayangaonनारायणगावartकला