शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ ; फडांना पॅकेज द्या : डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 17:22 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांच्या यात्रा रद्द

ठळक मुद्देतमाशा ही महाराष्ट्राची लोककला : नागरिकांचे मनोरंजन करून जनजागृती करून समाजप्रबोधन

खोडद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील अनेक यात्रा रद्द झाल्या आहेत. पर्यायाने यात्रेनिमित्त आयोजित तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले. तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंतांवर आलेली उपासमारीची वेळ थांबविण्यासाठी तमाशा फडमालक व तमाशा कलावंतांना सांस्कृतिक मंत्र्यांनी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत शून्य प्रहरातील चर्चेत केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. पर्यायाने या गावांमध्ये आयोजिलेले लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले आहेत. कोरोनामुळे तमाशाच्या बुकिंगवर परिणाम तर झालाच, पण झालेल्या बुकिंग, सुपाऱ्यादेखील मोठ्या प्रमाणात रद्द झाल्या आहेत.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातदेखील खासदार डॉ. कोल्हे यांनी तमासगिरांची व्यथा मांडली असून, राज्यशासनाने तमाशा कलावंतांसह फडमालकांनाही विशेष अनुदान पॅकेज द्यावे, अशी मागणी केली आहे.तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. तमाशा कलावंतांनी आजपर्यंत अवघ्या महाराष्ट्रात जनजागृतीसोबतच करून समाजभानदेखील निर्माण केले आहे. यात्रेच्या काळात तमाशा कलावंत गावोगावी जाऊन नागरिकांचे मनोरंजन करून जनजागृती करून समाजप्रबोधन करतात. कोरोनामुळे अनेक यात्रा रद्द झाल्या आहेत. यामुळे अनके तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले आहेत. यामुळे तमाशातील कलावंत व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सांस्कृतिकमंत्र्यांनी तमाशा फडमालक व कलावंतांसाठी पॅकेज जाहीर करावे आणि तमाशा फडमालक व कलावंतांबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने पॅकेज द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी संसदेत केली.संपूर्ण महाराष्ट्रात हंगामी आणि कायमस्वरूपी असणारे सुमारे ३८५ तमाशा फड आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे गावोगावच्या रद्द होत असलेल्या यात्रांमुळे तंबूच्या प्रत्येक तमाशा फडाचं सुमारे ७५ ते ८० लाख रुपयांचं नुकसान झालं आहे, तर प्रत्येक छोट्या  तमाशा फडाचं सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व तमाशा फडांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे...............मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले निवेदनखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन तमाशा कलावंतांना विशेष अनुदान पॅकेज देण्याची मागणी केली. शिवकाळापासून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकऱ्यांचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणारी लोककला म्हणून तमाशा आणि लोकनाट्य प्रसिद्ध आहे. याचे संवर्धन करण्यासाठी राज्यशासनही सर्वतोपरी प्रयत्न करीत असते; पण मागील तीन वर्षे सतत नुकसानीत गेल्याने ही लोककला जगविण्यासाठी सरकारने तमाशा फडांना व कलावंतांना विशेष अनुदान पॅकेज द्यावे, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी या निवेदनात केली आहे.............

टॅग्स :narayangaonनारायणगावartकला