शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ ; फडांना पॅकेज द्या : डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 17:22 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांच्या यात्रा रद्द

ठळक मुद्देतमाशा ही महाराष्ट्राची लोककला : नागरिकांचे मनोरंजन करून जनजागृती करून समाजप्रबोधन

खोडद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील अनेक यात्रा रद्द झाल्या आहेत. पर्यायाने यात्रेनिमित्त आयोजित तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले. तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंतांवर आलेली उपासमारीची वेळ थांबविण्यासाठी तमाशा फडमालक व तमाशा कलावंतांना सांस्कृतिक मंत्र्यांनी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत शून्य प्रहरातील चर्चेत केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. पर्यायाने या गावांमध्ये आयोजिलेले लोकनाट्य तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले आहेत. कोरोनामुळे तमाशाच्या बुकिंगवर परिणाम तर झालाच, पण झालेल्या बुकिंग, सुपाऱ्यादेखील मोठ्या प्रमाणात रद्द झाल्या आहेत.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातदेखील खासदार डॉ. कोल्हे यांनी तमासगिरांची व्यथा मांडली असून, राज्यशासनाने तमाशा कलावंतांसह फडमालकांनाही विशेष अनुदान पॅकेज द्यावे, अशी मागणी केली आहे.तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. तमाशा कलावंतांनी आजपर्यंत अवघ्या महाराष्ट्रात जनजागृतीसोबतच करून समाजभानदेखील निर्माण केले आहे. यात्रेच्या काळात तमाशा कलावंत गावोगावी जाऊन नागरिकांचे मनोरंजन करून जनजागृती करून समाजप्रबोधन करतात. कोरोनामुळे अनेक यात्रा रद्द झाल्या आहेत. यामुळे अनके तमाशाचे कार्यक्रमदेखील रद्द झाले आहेत. यामुळे तमाशातील कलावंत व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सांस्कृतिकमंत्र्यांनी तमाशा फडमालक व कलावंतांसाठी पॅकेज जाहीर करावे आणि तमाशा फडमालक व कलावंतांबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने पॅकेज द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी संसदेत केली.संपूर्ण महाराष्ट्रात हंगामी आणि कायमस्वरूपी असणारे सुमारे ३८५ तमाशा फड आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे गावोगावच्या रद्द होत असलेल्या यात्रांमुळे तंबूच्या प्रत्येक तमाशा फडाचं सुमारे ७५ ते ८० लाख रुपयांचं नुकसान झालं आहे, तर प्रत्येक छोट्या  तमाशा फडाचं सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व तमाशा फडांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे...............मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले निवेदनखासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन तमाशा कलावंतांना विशेष अनुदान पॅकेज देण्याची मागणी केली. शिवकाळापासून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकऱ्यांचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणारी लोककला म्हणून तमाशा आणि लोकनाट्य प्रसिद्ध आहे. याचे संवर्धन करण्यासाठी राज्यशासनही सर्वतोपरी प्रयत्न करीत असते; पण मागील तीन वर्षे सतत नुकसानीत गेल्याने ही लोककला जगविण्यासाठी सरकारने तमाशा फडांना व कलावंतांना विशेष अनुदान पॅकेज द्यावे, अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी या निवेदनात केली आहे.............

टॅग्स :narayangaonनारायणगावartकला