शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

५० लाख पुणेकरांचे प्रश्न सुटणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 03:28 IST

सत्ताधारी भाजपाकडून सध्या महिन्याला केवळ एकच दिवस सर्वसाधारण सभा घेतली जाते. त्या एका दिवसात चार ते पाच तासाच सभेचे कामकाज होते.

पुणे : सत्ताधारी भाजपाकडून सध्या महिन्याला केवळ एकच दिवस सर्वसाधारण सभा घेतली जाते. त्या एका दिवसात चार ते पाच तासाच सभेचे कामकाज होते. याशिवाय अनेक कारणांमुळे सभा तहकुब केल्या जातात. यामुळे संपूर्ण पुणे शहराचे व तब्बल ५० लाख पुणेकारांचे हजारो प्रश्न एका दिवसात कसे सुटणार, असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक भय्यासाहेब जाधव व योगेस ससाणे यांनी केला आहे. सर्वसाधारण सभा होत नसल्यामुळेच प्रशासनावर अंकुश राहिला नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्यात किमान पाच दिवस सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी मागणी त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली.गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज हे महिन्यातून केवळ दोन दिवस चालविण्याचा नवीन पायंडा सुरू केला आहे. त्या दोन दिवसांपैकी एक सभा ही मासिक सभा असते व ती समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या निधनामुळे कोणतेही कामकाज न चालविता तहकुब केली जाते.वास्तविक पाहता पुणे महापालिकेचे सभासद हे नवीन हद्दीतील जोडलेल्या गावांतील असून सभा कामकाजासाठी येत असतात.जवळपास १५ ते २० किमी अंतरावरून सभासद त्यांच्या भागातील समस्या मांडण्यासाठी सर्वसाधारण सभा हे एकमेव साधन आहे; परंतु महिन्यातून फक्त एकच दिवस सभा चालत असेल तर त्या एका दिवसातील चार ते पाच तासांत ५० लाख लोकसंख्या असलेल्या पुणेकरांचे प्रश्न कसे सुटतील. सभा पूर्णपणे होत नसल्याने प्रशासनावरील आपला अंकुश सुटत चाललाआहे.काळानुरूप बदल घडवून महिन्याच्या पहिल्या दिवशी असलेल्या सर्वसाधारण सभेत श्रद्धांजली वाहून १० मिनिटे सभा तहकूब करून त्याच दिवशी १० मिनिटांनंतर सभेचे कामकाज पूर्ण करावे.दरमहा कमीत कमी ५ दिवस मुख्य सभा चालवावी, अशी मागणी महापौरांना दिलेल्या पत्रात ससाणे आणि जाधव यांनी केली आहे.