शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पुणेकरांना किती पाणी मिळणार? कालवा समितीला करावी लागणार कसरत

By नितीन चौधरी | Updated: September 1, 2023 17:41 IST

पुणेकरांसह ग्रामीण भागाचे लक्ष लागून आहे...

पुणे : पावसाने दडी मारल्याने शहराला पिण्यासाठी तर ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे अद्याप केवळ ९४ टक्केच भरली आहेत. मॉन्सूनने दडी मारल्याने धरणे केव्हा भरतील याची शाश्वती नाही. त्यामुळे पुणेकरांना पाणी पुरवून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी ग्रामीण भागाला किती पाणी देण्यात येईल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २) होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहराच्या पाणीकपातीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. याकडे पुणेकरांसह ग्रामीण भागाचे लक्ष लागून आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही, याची उत्सुकता असली तरी सहकारमंत्री व आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री पाटील आणि पवार यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या २७.५५ टीएमसी (९४.५० टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हाच साठा २९.१० टीएमसी होता. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, पुरेसा पाऊस न आल्यास शेतीसाठीच्या पुरवठ्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.

पाणीसाठ्यात वाढ न झाल्यास शहराचे पाणीकपात करून काही पाणी ग्रामीण बागाला आवर्तनातून देण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्याला वर्षभरात १८.५ टीएमसी पाण्याची गरज भासते. आगामी काळात पुरेसा पाऊस न पडल्यास उपलब्ध साठ्यावर पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची गरज भागवावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करावे लागणार असून, पाणी जपून वापरण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे.

पुणे विभागात पाऊस झाल्यावर अतिरिक्त सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाणी जमा होते. यंदा मात्र, पुरेशा पावसाअभावी पाणी सोडण्यात आलेले नाही. अगदी थोड्या प्रमाणात सोडलेल्या पावसामुळे तसेच उजनीत जमा होणाऱ्या अन्य मार्गामुळे सध्या धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात धरणात पाणी जमा न झाल्यास सोलापूर, पंढरपूर सारख्या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायची की शेतीला पाणी द्यायचे यावरून वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पावसाचा आणखी एक महिना शिल्लक आहे. या काळात एक आठवडा सलग पाऊस झाल्यास पुणे विभागातील पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांतून सोडलेल्या पाण्यावर धरण भरू शकते असा विश्वास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी बोलून दाखविला आहे.

धरणांतील पाणीसाठा

धरण- टीएमसी- टक्के

खडकवासला १.११--५६.२२पानशेत १०.६५--१००

वरसगाव १२.८२--१००टेमघर २.८७--८०.०३

एकूण २७.५५--९४.५०गेल्या वर्षीचा साठा

२९.१० टीएमसी ९९.८३ टक्के

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड