शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Pune: पुणेकरांना किती पाणी मिळणार? कालवा समितीला करावी लागणार कसरत

By नितीन चौधरी | Updated: September 1, 2023 17:41 IST

पुणेकरांसह ग्रामीण भागाचे लक्ष लागून आहे...

पुणे : पावसाने दडी मारल्याने शहराला पिण्यासाठी तर ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे अद्याप केवळ ९४ टक्केच भरली आहेत. मॉन्सूनने दडी मारल्याने धरणे केव्हा भरतील याची शाश्वती नाही. त्यामुळे पुणेकरांना पाणी पुरवून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी ग्रामीण भागाला किती पाणी देण्यात येईल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २) होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहराच्या पाणीकपातीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. याकडे पुणेकरांसह ग्रामीण भागाचे लक्ष लागून आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही, याची उत्सुकता असली तरी सहकारमंत्री व आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री पाटील आणि पवार यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या २७.५५ टीएमसी (९४.५० टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हाच साठा २९.१० टीएमसी होता. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, पुरेसा पाऊस न आल्यास शेतीसाठीच्या पुरवठ्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.

पाणीसाठ्यात वाढ न झाल्यास शहराचे पाणीकपात करून काही पाणी ग्रामीण बागाला आवर्तनातून देण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्याला वर्षभरात १८.५ टीएमसी पाण्याची गरज भासते. आगामी काळात पुरेसा पाऊस न पडल्यास उपलब्ध साठ्यावर पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची गरज भागवावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करावे लागणार असून, पाणी जपून वापरण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे.

पुणे विभागात पाऊस झाल्यावर अतिरिक्त सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाणी जमा होते. यंदा मात्र, पुरेशा पावसाअभावी पाणी सोडण्यात आलेले नाही. अगदी थोड्या प्रमाणात सोडलेल्या पावसामुळे तसेच उजनीत जमा होणाऱ्या अन्य मार्गामुळे सध्या धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात धरणात पाणी जमा न झाल्यास सोलापूर, पंढरपूर सारख्या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायची की शेतीला पाणी द्यायचे यावरून वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पावसाचा आणखी एक महिना शिल्लक आहे. या काळात एक आठवडा सलग पाऊस झाल्यास पुणे विभागातील पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांतून सोडलेल्या पाण्यावर धरण भरू शकते असा विश्वास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी बोलून दाखविला आहे.

धरणांतील पाणीसाठा

धरण- टीएमसी- टक्के

खडकवासला १.११--५६.२२पानशेत १०.६५--१००

वरसगाव १२.८२--१००टेमघर २.८७--८०.०३

एकूण २७.५५--९४.५०गेल्या वर्षीचा साठा

२९.१० टीएमसी ९९.८३ टक्के

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड