शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आत्महत्येसाठी गावठी कट्टा आला कोठून?

By admin | Updated: April 19, 2017 04:13 IST

शहरात १७ वर्षीय मुलीने गावठी कट्ट्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेला ७२ तास उलटले आहेत. त्यानंतरदेखील या घटनेचे गूढ कायम आहे.

बारामती : शहरात १७ वर्षीय मुलीने गावठी कट्ट्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेला ७२ तास उलटले आहेत. त्यानंतरदेखील या घटनेचे गूढ कायम आहे. पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहित. मंगळवारी (दि. १८) सायली बळी हिच्या आई-वडिलांनी गावठी कट्ट्याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितल्याने हे प्रकरण संशयास्पद बनले आहे. त्यामुळे पोलिसांनादेखील गावठी कट्टा आला कसा, याचा तपास लागल्यानंतरच ‘तिच्या आत्महत्येचे’ गूढ उकलणार आहे.सोमवारी (दि. १७) या घटनेची चौकशी करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्यामुळे या घटनेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. याबाबत गोऱ्हे यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. शनिवार (दि. १५) बारामती शहरातील सूर्यनगरी भागात सायली ऊर्फ संध्या मानसिंग बळी या १७ वर्षीय मुलीने गावठी कट्ट्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. सायलीने सामाजिक व विविध प्रकारच्या दबावातून प्राप्त झालेल्या नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज गोऱ्हे यांनी व्यक्त के ला आहे. तसेच गावठी कट्ट्याबाबत तपास करण्याची मागणीदेखील केली आहे. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी सांगितले, की बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात पिस्तूलबाबत सायलीच्या आई-वडिलांकडे आज चौकशी करण्यात आली. मात्र, सायली हिच्याकडे आत्महत्या करण्यासाठी रिव्हॉल्व्हर कोठून आले, याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे तिच्या आई-वडिलांंनी सांगितले.