शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लाटेतही तगले कसेबसे

By admin | Updated: February 26, 2017 03:51 IST

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराध्यक्षांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे पाठविलेल्या राजीनाम्यावरून या निकालाचा राष्ट्रवादी काँग्रेसला कसा धक्का बसला आहे, ते स्पष्ट होते

पुणे : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराध्यक्षांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे पाठविलेल्या राजीनाम्यावरून या निकालाचा राष्ट्रवादी काँग्रेसला कसा धक्का बसला आहे, ते स्पष्ट होते आहे. राज्यातील सत्ता तर गेलीच, आता महापालिकेतूनही पायउतार व्हावे लागणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वाटचालीपुढे आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इतके होऊनही पक्षाचे स्थानिक नेते अजून ‘भाजपाच्या विजयाच्या भूकंपातही आम्ही आमचे फार नुकसान होऊ दिले नाही,’ असेच म्हणत आहेत. सलग १० वर्षांच्या सत्तेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये सत्तेचा अहंकार आला होता. त्यामुळेच सत्तेतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला धुडकावणे, त्यांच्या विरोधाला न जुमानता स्मार्ट सिटी, २४ तास पाणी योजना यासारख्या विषयांच्या मंजुरीसाठी विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाला साथीला घेणे असे बरेच प्रकार मागील ५ वर्षांत झाले. त्याचबरोबर स्वपक्षाच्याच शहराध्यक्षांच्याविरोधात आघाडी उघडणे, सभागृहात त्यांच्यावर निशाणा साधणे असेही अनेकदा घडले. त्याचा परिणाम म्हणून पक्षात अगदी उघडपणे दुफळी निर्माण झाली. सत्ता आहे म्हणून राष्ट्रवादीचे नेते हवे तसे वागतात, असे एक चित्र त्यामुळे पुणेकरांसमोर तयार झाले. उपनगरांमधील वर्चस्व कमी होत आहे, याकडे पक्षाचे लक्ष गेले नाही. नातेसंबंधावर आधारलेल्या मतदानावर राष्ट्रवादीचे सगळे नेते विसंबून राहिले. गेल्या काही वर्षांत या भागात अनेक सोसायट्या निर्माण झाल्या. तिथे राहणाऱ्या वर्गापैकी बहुसंख्य वर्ग हा मध्यपुण्यातून तिथे गेलेला आहे. त्यातील अनेक जण भाजपाचे पारंपरिक मतदार आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष झाले. भाजपाला तिथे मुसंडी मारता आली ती गुणवत्तेमुळे नव्हे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या निष्क्रियपणामुळे असे त्यामुळेच पक्षातच बोलले जात आहे. शहराच्या मध्यभागासाठी सत्तेच्या १० वर्षांत राष्ट्रवादीने काहीही केले नाही. दाखवता येईल, असे काम त्यांच्याकडून झाले नाही. त्याचाही परिणाम मतदानावर झाला. खऱ्या पुणेकरांकडे राष्ट्रवादीचे नेहमीच दुर्लक्ष झाले, अशी एक भावना पेठांमधल्या पुणेकरांमध्ये निर्माण झाली होती. या भावनेला बळकटी येईल असेच वर्तन राष्ट्रवादीच्या नेत्यांचे झाले. त्याचाही फटका बसला, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. (प्रतिनिधी) उपनगरांमधील वर्चस्वाला आव्हानभाजपाचे अगदी तरुण, नवखे चेहरे पॅनलमध्ये निवडून आले. त्यातील काहींनी तर राष्ट्रवादीच्या दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांना अस्मान दाखविले. संपूर्ण पॅनेल निवडून आणणार, असे हे नेते सांगत होते. त्यांच्या स्वत:च्याच निवडून येण्याची अडचण झाली, पॅनल तर दूरच राहिले. शहराच्या मध्यभागापासून ते राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, असे म्हटले जाणाऱ्या उपनगरांमध्येही भाजपाने मुसंडी मारली. मोठ्या नेत्यांच्या पॅनलमध्येही एक-दोन तरी चेहरे निवडून आलेच. पराभवाचे विश्लेषणही नाहीमावळत्या सभागृहात राष्ट्रवादीच्या ५५ जागा होत्या. आता ३८ आहेत. १७ जागांचा फटका त्यांना बसला आहे. मात्र तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पराभवाचे विश्लेषण मात्र इतकी मोठी लाट होती, तरीही आमचे फारसे नुकसान झालेच नाही, असे करण्यात येत आहे. त्यात थोडेफार तथ्य असले तरीही राष्ट्रवादीची यापुढची वाटचाल अशीच राहिली तर मात्र पक्षापुढचे प्रश्नचिन्ह मोठे झाल्याशिवाय राहणार नाही.