शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

लाटेतही तगले कसेबसे

By admin | Updated: February 26, 2017 03:51 IST

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराध्यक्षांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे पाठविलेल्या राजीनाम्यावरून या निकालाचा राष्ट्रवादी काँग्रेसला कसा धक्का बसला आहे, ते स्पष्ट होते

पुणे : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराध्यक्षांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे पाठविलेल्या राजीनाम्यावरून या निकालाचा राष्ट्रवादी काँग्रेसला कसा धक्का बसला आहे, ते स्पष्ट होते आहे. राज्यातील सत्ता तर गेलीच, आता महापालिकेतूनही पायउतार व्हावे लागणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वाटचालीपुढे आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इतके होऊनही पक्षाचे स्थानिक नेते अजून ‘भाजपाच्या विजयाच्या भूकंपातही आम्ही आमचे फार नुकसान होऊ दिले नाही,’ असेच म्हणत आहेत. सलग १० वर्षांच्या सत्तेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये सत्तेचा अहंकार आला होता. त्यामुळेच सत्तेतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला धुडकावणे, त्यांच्या विरोधाला न जुमानता स्मार्ट सिटी, २४ तास पाणी योजना यासारख्या विषयांच्या मंजुरीसाठी विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाला साथीला घेणे असे बरेच प्रकार मागील ५ वर्षांत झाले. त्याचबरोबर स्वपक्षाच्याच शहराध्यक्षांच्याविरोधात आघाडी उघडणे, सभागृहात त्यांच्यावर निशाणा साधणे असेही अनेकदा घडले. त्याचा परिणाम म्हणून पक्षात अगदी उघडपणे दुफळी निर्माण झाली. सत्ता आहे म्हणून राष्ट्रवादीचे नेते हवे तसे वागतात, असे एक चित्र त्यामुळे पुणेकरांसमोर तयार झाले. उपनगरांमधील वर्चस्व कमी होत आहे, याकडे पक्षाचे लक्ष गेले नाही. नातेसंबंधावर आधारलेल्या मतदानावर राष्ट्रवादीचे सगळे नेते विसंबून राहिले. गेल्या काही वर्षांत या भागात अनेक सोसायट्या निर्माण झाल्या. तिथे राहणाऱ्या वर्गापैकी बहुसंख्य वर्ग हा मध्यपुण्यातून तिथे गेलेला आहे. त्यातील अनेक जण भाजपाचे पारंपरिक मतदार आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष झाले. भाजपाला तिथे मुसंडी मारता आली ती गुणवत्तेमुळे नव्हे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या निष्क्रियपणामुळे असे त्यामुळेच पक्षातच बोलले जात आहे. शहराच्या मध्यभागासाठी सत्तेच्या १० वर्षांत राष्ट्रवादीने काहीही केले नाही. दाखवता येईल, असे काम त्यांच्याकडून झाले नाही. त्याचाही परिणाम मतदानावर झाला. खऱ्या पुणेकरांकडे राष्ट्रवादीचे नेहमीच दुर्लक्ष झाले, अशी एक भावना पेठांमधल्या पुणेकरांमध्ये निर्माण झाली होती. या भावनेला बळकटी येईल असेच वर्तन राष्ट्रवादीच्या नेत्यांचे झाले. त्याचाही फटका बसला, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. (प्रतिनिधी) उपनगरांमधील वर्चस्वाला आव्हानभाजपाचे अगदी तरुण, नवखे चेहरे पॅनलमध्ये निवडून आले. त्यातील काहींनी तर राष्ट्रवादीच्या दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांना अस्मान दाखविले. संपूर्ण पॅनेल निवडून आणणार, असे हे नेते सांगत होते. त्यांच्या स्वत:च्याच निवडून येण्याची अडचण झाली, पॅनल तर दूरच राहिले. शहराच्या मध्यभागापासून ते राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, असे म्हटले जाणाऱ्या उपनगरांमध्येही भाजपाने मुसंडी मारली. मोठ्या नेत्यांच्या पॅनलमध्येही एक-दोन तरी चेहरे निवडून आलेच. पराभवाचे विश्लेषणही नाहीमावळत्या सभागृहात राष्ट्रवादीच्या ५५ जागा होत्या. आता ३८ आहेत. १७ जागांचा फटका त्यांना बसला आहे. मात्र तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पराभवाचे विश्लेषण मात्र इतकी मोठी लाट होती, तरीही आमचे फारसे नुकसान झालेच नाही, असे करण्यात येत आहे. त्यात थोडेफार तथ्य असले तरीही राष्ट्रवादीची यापुढची वाटचाल अशीच राहिली तर मात्र पक्षापुढचे प्रश्नचिन्ह मोठे झाल्याशिवाय राहणार नाही.