शेलपिंपळगाव : हेल्मेट न घातल्याने अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वारांना प्राणास मुकाव्या लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निष्पन्न झाल्याने हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याबाबतचा महत्त्वाकांक्षी निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. मात्र, ही सक्ती फक्त पुणे शहरासाठी न करता चाकण-शिक्रापूर हायवेसारख्या जलदगती हायवे मार्गावर बंधनकारक करावी, अशी मागणी अखिल भारतीय माहिती सेवा समितीने वाहतूक विभागाकडे केली आहे. हेल्मेटसक्तीमुळे या रस्त्यावरील अपघातात बळी जाणार्यांची संख्या काहीशा प्रमाणात कमी करण्यास निश्चित मदत होणार आहे. चाकण - शिक्रापूर हायवे हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने फार महत्वाचा असल्याने मोठी वाहने रस्त्यावरून प्रवास करत असतात. अलीकडच्या काही दिवसात इतर वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास न करता स्वता:च्या दुचाकीचा वापर करून प्रवास करण्याला बहुतांशी प्रवाशी पसंती देत असल्याने रस्त्यावर दुचाकी चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोन्हीही पोलीस ठाण्यांकडून चौकांमध्ये बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी हवालदार तैनात केलेले असतात. ारंतु हे हवालदार आपला बराचसा वेळ हॉटेलमध्ये चहा-कोफी व गप्पा मारण्यात घालवत असतात. परंतु, या महाशयांकडून दुचाकी प्रवासादरम्यान रस्ते परिवहन खात्याच्या सर्वच नियमांना धाब्यावर बसविले जाते. रस्त्यावर असलेल्या समस्या व मोठ-मोठ्या वाहनांनच्या सततच्या वदर्ळीने नित्याने अपघात होत असतात. यामध्ये दुचाकी चालकांना आपला जीव गमवावा लागतो. आजपर्यंत हजारो दुचाकी चालकांचा इतर वाहतुकीतील अपघातांमध्ये जीव गेल्याची सत्यस्थिती आहे. रस्त्यावरून प्रवास करताना स्वत:च्या सुरक्षतेसाठी डोक्यात हेल्मेट घालून प्रवास करणे दुचाकी स्वारांसाठी तात्काळ सक्तीचे करावे अशी मागणी रस्ते परिवहन खात्याकडे अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष साबळे, उपजिल्हाध्यक्ष मंगेश पºहाड, चाकण शहराध्यक्ष अभिजित जाधव, काळूस जिल्हा परिषद गणाचे अध्यक्ष माऊली डुंबरे, शेलपिंपळगावचे माजी उपसरपंच शरद मोहिते, अतुल कुटे, सयाजी मोहिते, पिंपळे-जगतापचे सरपंच सुनील बेंडभर, समितीचे जिल्हा सचिव पंकज हरगुडे, आयडियल फौंडेशनचे अध्यक्ष अविनाशजी मोहिते आदींनी केली आहे. (वार्ताहर)
हेल्मेटसक्ती बंधनकारक करावी
By admin | Updated: May 29, 2014 04:56 IST