शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

भोर तालुक्यात अतिवृष्टीने भात, नाचणीसह पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:08 IST

भोर : भोर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील दरडी, झाडेझुडपे, दगड, माती, कोसळून लागवड केलेले भात, ...

भोर : भोर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील दरडी, झाडेझुडपे, दगड, माती, कोसळून लागवड केलेले भात, नाचणी ही पिके दगड-मातीने गाडून गेल्याने आणि पाण्याने वाहून जाऊन ताली पडून पिकांसह भात खाचरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे भात पिकांवर अवलंबुन असलेली कुटुंब उघड्यावर येणार आहेत. त्यामुळे शासनाने शेतीचे खाचरांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी अडचणीत सापडलेला शेतकरी करीत आहे.

भोर तालुक्यात तीन-चार दिवस मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यातील निरा-देवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील रायरी, कंकवाडी, धारांबे, धानवली, पऱ्हर बु., पऱ्हर खुर्द, गुढे, निवंगण माझेरी, शिरवली, कुडली बु,. कुडली खुर्द, दुर्गाडी, शिरगाव शिळींब, उबार्डेवाडी, अशिपी, कुंड, राजिवडी, साळुंगण, पांगारी, हिर्डोशी, वारवंड, कारुंगण, कोंढरी, म्हसर बु., म्हसर खु., करंजगाव यांसह वीसगाव खोरे, भाटघर धरण भागातील भुतोंडे खोरे या भागातील गावात डोंगरातील दरड माती मोठमोठी झाडे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून येऊन खाचरात आल्याने खाचरातील लावलेले भात पीक गाळाने गाडली आणि भात पिकाचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले. नाचणी पीक वाहून नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे खाचरांच्या भगदाड पडून मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाताची लागवडी केली नाही. त्या खाचरात दगड, माती, झाडे आल्यामुळे खाचरे लावण्यासारखी आवस्था राहिलेली नाही.

दरम्यान, तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची तर, १५०० हेक्टरवर नाचणीची लागवड केली जाते. तालुक्याच्या पश्चिम भागात भात पिकाशिवाय कोणतेही पीक होत नसून पावसाच्या लहरीपणावरच भात पीक अवलंबून आहे. म्हणजे पाऊस नाही पडला तरी भात पिकत नाही, पाऊस अधिक झाला तरीही भात पिकाचे नुकसान होते. या वेळी पावसामुळे तालुक्यात सुमारे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. यामुळे भाताच्या पिकावर अवलंबून असलेले संसार उघड्यावर येऊन उपासमार होईल, अशीच आवस्था आहे. पिकांची पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान

पावसामुळे भात खाचरांच्या वाहून गेलेल्या दगडी ताली, खाचरात पडलेले दगड, गोटे, गाळ, माती, झाडेझुडपे बाहेर काढायला बैलजोडीचा उपयोग नसून जेसीबी किंवा मोठ्या यंत्राचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी होणार खर्च लाखो रुपयांच्या घरात आहे. सदरचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही. तर अनेकांची भात खाचरे दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेली आहेत. ती कधीच दुरुस्त होणार नाहीत. यामुळे आयुष्यभर ज्या शेतीवर संसार उभे राहिले ती खराब झाली आहेत.

तालुक्याच्या पूर्व भागातील भुईमूग, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, भाजीपाला पिकांचेही पावसाने मोठे नुकसान झालेले आहे.

भात पीक नुकसान फोटो