शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

भोर तालुक्यात अतिवृष्टीने भात, नाचणीसह पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:08 IST

भोर : भोर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील दरडी, झाडेझुडपे, दगड, माती, कोसळून लागवड केलेले भात, ...

भोर : भोर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातील दरडी, झाडेझुडपे, दगड, माती, कोसळून लागवड केलेले भात, नाचणी ही पिके दगड-मातीने गाडून गेल्याने आणि पाण्याने वाहून जाऊन ताली पडून पिकांसह भात खाचरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे भात पिकांवर अवलंबुन असलेली कुटुंब उघड्यावर येणार आहेत. त्यामुळे शासनाने शेतीचे खाचरांचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी अडचणीत सापडलेला शेतकरी करीत आहे.

भोर तालुक्यात तीन-चार दिवस मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यातील निरा-देवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील रायरी, कंकवाडी, धारांबे, धानवली, पऱ्हर बु., पऱ्हर खुर्द, गुढे, निवंगण माझेरी, शिरवली, कुडली बु,. कुडली खुर्द, दुर्गाडी, शिरगाव शिळींब, उबार्डेवाडी, अशिपी, कुंड, राजिवडी, साळुंगण, पांगारी, हिर्डोशी, वारवंड, कारुंगण, कोंढरी, म्हसर बु., म्हसर खु., करंजगाव यांसह वीसगाव खोरे, भाटघर धरण भागातील भुतोंडे खोरे या भागातील गावात डोंगरातील दरड माती मोठमोठी झाडे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून येऊन खाचरात आल्याने खाचरातील लावलेले भात पीक गाळाने गाडली आणि भात पिकाचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले. नाचणी पीक वाहून नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे खाचरांच्या भगदाड पडून मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाताची लागवडी केली नाही. त्या खाचरात दगड, माती, झाडे आल्यामुळे खाचरे लावण्यासारखी आवस्था राहिलेली नाही.

दरम्यान, तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची तर, १५०० हेक्टरवर नाचणीची लागवड केली जाते. तालुक्याच्या पश्चिम भागात भात पिकाशिवाय कोणतेही पीक होत नसून पावसाच्या लहरीपणावरच भात पीक अवलंबून आहे. म्हणजे पाऊस नाही पडला तरी भात पिकत नाही, पाऊस अधिक झाला तरीही भात पिकाचे नुकसान होते. या वेळी पावसामुळे तालुक्यात सुमारे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. यामुळे भाताच्या पिकावर अवलंबून असलेले संसार उघड्यावर येऊन उपासमार होईल, अशीच आवस्था आहे. पिकांची पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान

पावसामुळे भात खाचरांच्या वाहून गेलेल्या दगडी ताली, खाचरात पडलेले दगड, गोटे, गाळ, माती, झाडेझुडपे बाहेर काढायला बैलजोडीचा उपयोग नसून जेसीबी किंवा मोठ्या यंत्राचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी होणार खर्च लाखो रुपयांच्या घरात आहे. सदरचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही. तर अनेकांची भात खाचरे दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेली आहेत. ती कधीच दुरुस्त होणार नाहीत. यामुळे आयुष्यभर ज्या शेतीवर संसार उभे राहिले ती खराब झाली आहेत.

तालुक्याच्या पूर्व भागातील भुईमूग, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, भाजीपाला पिकांचेही पावसाने मोठे नुकसान झालेले आहे.

भात पीक नुकसान फोटो