शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

निरोगी पिकासाठी शेतीचे आरोग्य जपणे आवश्यक; जाणून घ्या पिक संरक्षणाच्या पद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:15 IST

शेतीचा डॉक्टर : पिकांची प्रतिकारशक्ती वाढून पीक रोगाला बळी पडत नाही.

- भालचंद्र पोळ ( पुणे)

आपल्या शरीराच्या पोषणासाठी वनस्पतींचा उपयोग होतो. जगात सर्व शक्ती सूर्यापासून मिळते. सूर्याचे ऊन पिऊनच वनस्पती वाढतात. त्या वनस्पती, धान्य, फळे माणूस सेवन करतो. याचा अर्थ आपण अप्रत्यक्षपणे सूर्याच्या शक्तीला पितो असेच म्हणावे लागेल.

पीक संरक्षणासाठी विविध मार्ग आहेत. त्यापैकी प्रमुख पाच पद्धती आहेत, त्या पुढीलप्रमाणे :

१) रासायनिक पद्धती- सध्याच्या प्रचलित पद्धतीत विषारी रासायनिक औषधांचा वापर पिकावरील किडी व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केला जातो; मात्र या औषधांचा बराचसा अंश माणसाच्या रोजच्या आहारात उतरत आहे. यामुळे कॅन्सर, रक्तदाब, थायरॉईड, मधुमेह आदी आजारांना निमंत्रण मिळत आहे.

२) वनौषधी पद्धती- वनौषधी म्हणजे वनस्पतीच्या अर्कापासून बनविलेली औषधे. याचा उपयोग पिकांवरील रोग व किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केला जातो. अनेक कंपन्यांनी वनौषधींपासून बनविलेल्या औषधी बाजारात आणलेल्या आहेत. याद्वारे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होत नाही. मित्रकिडींना या औषधांमुळे कोणतेही नुकसान होत नाही.

३) जैविक पद्धती- या पद्धतीत विविध जैविक बुरशी व जीवाणूद्वारे बुरशीजन्य रोग व विविध प्रकारचे रोग, किडी नियंत्रित करता येतात.

४) फिजिकल पद्धती- या पद्धतीत फेरोमन सापळे, कामगंध सापळे, लाईट ट्रॅप आदींचा वापर करून किडींचे नियंत्रण केले जाते.

५) आहार-   या पद्धतीत मानव किंवा वनस्पती यांना पोषण आहार मिळाला तर कोणीही रोगाला बळी पडणार नाही. निरोगी पीक जन्माला येण्यासाठी जमिनीचे आरोग्य जपणे, पिकांची पद्धती, पाण्याचे नियोजन या सर्व गोष्टी सांभाळल्या तर, पिकांची प्रतिकारशक्ती वाढून पीक  रोगाला बळी पडत नाही.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी