शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

आरोग्य सुविधी विशिष्ट लोकांच्या हाती एकवटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:11 IST

बारामती : बारामती शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामध्ये तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती व ...

बारामती : बारामती शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामध्ये तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती व संस्था यांच्या हाती एकवटली आहे. तालुक्यातील निवडक मंडळींसाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन राबत असल्याचे चित्र दुर्दैवाने तयार झाले आहे. प्रशासनात समन्वय साधून तत्काळ सुधारणा करावी. अन्यथा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा भाजप नेते दिलीप खैरे यांनी दिला आहे.

खैरे यांनी याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट लोकांच्या हाती गेली आहे. खरेतर ही राजकारण करण्याची वेळ नाही अथवा आरोग्यव्यवस्था पुरवताना दुजाभाव करण्याची ही वेळ नाही. परंतु ज्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था व प्रशासनाचे केवळ शहरात तेही काही ठराव व्यक्ती पदाधिकाऱ्यांच्या हाती केंद्रीकरण झाले आहे ते पाहता तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील सर्वसामान्यांना कोणी वाली नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाल्याचे खैरे म्हणाले. प्रशासनाने प्रत्येक मंडलात कोरोना चाचणी केंद्रे उभारावीत, अशी मागणी यांनी केली आहे.

कोरोना उपाययोजनेत शहरी-ग्रामीण असा भेदभाव केला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने बारामती शहर व तालुक्यातील एकूण सार्वजनिक आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांच्या दरम्यान समन्वय नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील कोविड रुग्णांची सरासरी ३५० वर राहत आहे. कोरोनाबाबत जनतेत निर्माण झालेली भीती, तपासणी केंद्रांची मर्यादित संख्या, तपासणी केल्यावर अहवाल मिळण्यासाठी होणारा विलंब, ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरनाची गैरसोय यातून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व वेगाने होत आहे. जी काही आरोग्य यंत्रणा आहे त्यावर सध्या प्रचंड ताण आहे. तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन असेल किंवा प्राथमिक उपचारातील फॅबी फ्लू गोळ्या किंवा पोस्ट कोड मधील काही औषधे वेळेवर मिळत नाहीत. त्यातून अनेकांचे जीव जात आहेत.

प्रशासनाने रेमडेसिविरचा रुग्णसंख्येनुसार न्याय पुरवठा करावा, खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट व्हावे, प्रत्येक मंडलामध्ये कोविड चाचणी केंद्रे सुरू करावीत, उपचारातील साधनसामग्री पुरवताना शहर-ग्रामीण, गरीब-श्रीमंत असा दुजाभाव त्वरित थांबवावा, अशा मागण्या खैरे यांनी केल्या आहेत.