शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

आरोग्य सुविधी विशिष्ट लोकांच्या हाती एकवटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:11 IST

बारामती : बारामती शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामध्ये तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती व ...

बारामती : बारामती शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामध्ये तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती व संस्था यांच्या हाती एकवटली आहे. तालुक्यातील निवडक मंडळींसाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन राबत असल्याचे चित्र दुर्दैवाने तयार झाले आहे. प्रशासनात समन्वय साधून तत्काळ सुधारणा करावी. अन्यथा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा भाजप नेते दिलीप खैरे यांनी दिला आहे.

खैरे यांनी याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट लोकांच्या हाती गेली आहे. खरेतर ही राजकारण करण्याची वेळ नाही अथवा आरोग्यव्यवस्था पुरवताना दुजाभाव करण्याची ही वेळ नाही. परंतु ज्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था व प्रशासनाचे केवळ शहरात तेही काही ठराव व्यक्ती पदाधिकाऱ्यांच्या हाती केंद्रीकरण झाले आहे ते पाहता तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील सर्वसामान्यांना कोणी वाली नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाल्याचे खैरे म्हणाले. प्रशासनाने प्रत्येक मंडलात कोरोना चाचणी केंद्रे उभारावीत, अशी मागणी यांनी केली आहे.

कोरोना उपाययोजनेत शहरी-ग्रामीण असा भेदभाव केला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने बारामती शहर व तालुक्यातील एकूण सार्वजनिक आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांच्या दरम्यान समन्वय नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील कोविड रुग्णांची सरासरी ३५० वर राहत आहे. कोरोनाबाबत जनतेत निर्माण झालेली भीती, तपासणी केंद्रांची मर्यादित संख्या, तपासणी केल्यावर अहवाल मिळण्यासाठी होणारा विलंब, ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरनाची गैरसोय यातून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व वेगाने होत आहे. जी काही आरोग्य यंत्रणा आहे त्यावर सध्या प्रचंड ताण आहे. तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन असेल किंवा प्राथमिक उपचारातील फॅबी फ्लू गोळ्या किंवा पोस्ट कोड मधील काही औषधे वेळेवर मिळत नाहीत. त्यातून अनेकांचे जीव जात आहेत.

प्रशासनाने रेमडेसिविरचा रुग्णसंख्येनुसार न्याय पुरवठा करावा, खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट व्हावे, प्रत्येक मंडलामध्ये कोविड चाचणी केंद्रे सुरू करावीत, उपचारातील साधनसामग्री पुरवताना शहर-ग्रामीण, गरीब-श्रीमंत असा दुजाभाव त्वरित थांबवावा, अशा मागण्या खैरे यांनी केल्या आहेत.