शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी अपघात विम्यासाठी मुख्याध्यापक आता घरोघरी

By admin | Updated: September 25, 2015 01:13 IST

अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असताना, विमा योजनेसाठी येणारे प्रस्ताव हे कमी असल्याने आता मख्याध्यापक मयत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव तयार करणार आहेत.

पुणे : अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असताना, विमा योजनेसाठी येणारे प्रस्ताव हे कमी असल्याने आता मख्याध्यापक मयत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव तयार करणार आहेत. तसे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले असून, अहवाल मागविला असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगतिले. या संदर्भात अधिक माहिती अशी की, पहिली ते बारावीतील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ‘राजीव गांधी शालेय विद्यार्थी अपघात विमा’ ही योजना आहे. अपघातात मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना ७५ हजार रुपये मिळतात. मात्र, या योजनेविषयी पालकांना माहिती नसल्याने प्रस्तावच येत नाहीत. या योजनेचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी नुकतेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवून प्रस्ताव कमी असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. दररोज वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांवरून अपघातात विद्यार्थी मयत होत आहेत; मात्र प्रस्ताव कमी आहेत. त्यामुळे अशा अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांचा शोध घेऊन, त्यांना प्रस्ताव दाखल करण्यास प्रवृत्त करावे व सहकार्य करावे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कळविले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व तालुक्यांतील गटशिक्षण अधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठविले असून, कार्यवाही करावी; तसेच आज अखेरपर्य$ंतचा निरंक अहवाल पाठवावा, असे कळविले आहे. त्यामुळे आता मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखाना स्वत: प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्याचे वांजळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)