शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

हॅरिस पूल दुभाजकातील फट बुजविली

By admin | Updated: June 30, 2015 00:13 IST

वारंवार होणाऱ्या कोंडीतून सुटण्यासाठी दापोडीतील हॅरिस पुलावर विरुद्ध बाजूने जाणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

पिंपरी : वारंवार होणाऱ्या कोंडीतून सुटण्यासाठी दापोडीतील हॅरिस पुलावर विरुद्ध बाजूने जाणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पुलाशेजारच्या तुटलेल्या दुभाजकांतून दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने वाहन रेटत होते. या दुभाजकांतील मोकळी फट बंद करण्यात आली आहे. कोंडीतून सुटण्यासाठी पुण्याच्या दिशेने जाणारे दुचाकीस्वार सीएमई गेट चौकातून वळण घेत विरुद्ध दिशेने हॅरिस पुलावर प्रवेश करतात. विरुद्ध बाजूने जात बोपोडी सिग्नल चौकात थांबतात. याच पद्धतीने हॅरिस पुलाजवळील तुटलेल्या दुभाजकामधून दुचाकी काढून विरुद्ध दिशेने वाहन काढले जाते. एकापाठोपाठ एक असे असंख्य दुचाकीस्वार हा मार्ग अवलंबत असल्याने वाहनांची रांग लागते. दुचाकीस्वारांचे पाहून तीनचाकी रिक्षा, टेम्पोचालकही विरुद्ध दिशेने जात होते. त्याचबरोबर पदपथावरून वाहने दामटली जातात. पुलाचे संरक्षक कठडे कमी उंचीचे आणि कमकुवत आहेत. कठड्यास धडकून वाहन नदीत पडून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बेशिस्त वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत होते. विरुद्ध दिशेने वाहन येत असल्याने पिंपरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ उडत असे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली असली, तरी या संदर्भात ठोस भूमिका घेण्याची नितांत गरज आहे. विरुद्ध दिशेने वाहने जाणार नाहीत यासाठी पोलिसांनी कठोर धोरण अवलंबण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’ने १६ जूनला या संदर्भात छायाचित्रासह ‘कोंडीतून सुटण्याचा जीवघेणा प्रयत्न’ या शीर्षकखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी दुसऱ्या दिवशीपासूनच कारवाई सुरू केली. तुटलेला दुभाजक दुरुस्त करून बेशिस्त दुचाकीस्वारांना लगाम घातला आहे. वेळ वाचविण्यासाठी ‘शॉर्टकट’ने विरुद्ध दिशेने जाण्यास दुचाकीस्वार, रिक्षाचालकांना अटकाव केला जात आहे. ग्रेड सेपरेटरमधून वेगात येणारी वाहने अरुंद रस्त्यामुळे दापोडी येथील हॅरीस पुलावर अडकून पडतात. वर्दळीच्या सकाळ, संध्याकाळच्या वेळी, तसेच दिवसभर अनेकदा येथे वाहतूककोंडी होते. कोंडीत अडकून एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे वाहनचालक वैतागले आहेत. बोपोडी, खडकी बाजारकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने ही कोंडी नियमितपणे होत आहे. ही वाहतूककोंडी सुटल्याने नोकरदारांना वेळेवर कामावर जाता येते. तसेच बराच काळ वाहतूक खोळंबल्याने दूरचा प्रवास करणाऱ्या नागरिकांचेही हाल होत होते. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत व्हावी अशी मागणी केली जात होती.