शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

हॅरिस पूल दुभाजकातील फट बुजविली

By admin | Updated: June 30, 2015 00:13 IST

वारंवार होणाऱ्या कोंडीतून सुटण्यासाठी दापोडीतील हॅरिस पुलावर विरुद्ध बाजूने जाणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

पिंपरी : वारंवार होणाऱ्या कोंडीतून सुटण्यासाठी दापोडीतील हॅरिस पुलावर विरुद्ध बाजूने जाणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पुलाशेजारच्या तुटलेल्या दुभाजकांतून दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने वाहन रेटत होते. या दुभाजकांतील मोकळी फट बंद करण्यात आली आहे. कोंडीतून सुटण्यासाठी पुण्याच्या दिशेने जाणारे दुचाकीस्वार सीएमई गेट चौकातून वळण घेत विरुद्ध दिशेने हॅरिस पुलावर प्रवेश करतात. विरुद्ध बाजूने जात बोपोडी सिग्नल चौकात थांबतात. याच पद्धतीने हॅरिस पुलाजवळील तुटलेल्या दुभाजकामधून दुचाकी काढून विरुद्ध दिशेने वाहन काढले जाते. एकापाठोपाठ एक असे असंख्य दुचाकीस्वार हा मार्ग अवलंबत असल्याने वाहनांची रांग लागते. दुचाकीस्वारांचे पाहून तीनचाकी रिक्षा, टेम्पोचालकही विरुद्ध दिशेने जात होते. त्याचबरोबर पदपथावरून वाहने दामटली जातात. पुलाचे संरक्षक कठडे कमी उंचीचे आणि कमकुवत आहेत. कठड्यास धडकून वाहन नदीत पडून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बेशिस्त वाहतुकीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत होते. विरुद्ध दिशेने वाहन येत असल्याने पिंपरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ उडत असे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली असली, तरी या संदर्भात ठोस भूमिका घेण्याची नितांत गरज आहे. विरुद्ध दिशेने वाहने जाणार नाहीत यासाठी पोलिसांनी कठोर धोरण अवलंबण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’ने १६ जूनला या संदर्भात छायाचित्रासह ‘कोंडीतून सुटण्याचा जीवघेणा प्रयत्न’ या शीर्षकखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी दुसऱ्या दिवशीपासूनच कारवाई सुरू केली. तुटलेला दुभाजक दुरुस्त करून बेशिस्त दुचाकीस्वारांना लगाम घातला आहे. वेळ वाचविण्यासाठी ‘शॉर्टकट’ने विरुद्ध दिशेने जाण्यास दुचाकीस्वार, रिक्षाचालकांना अटकाव केला जात आहे. ग्रेड सेपरेटरमधून वेगात येणारी वाहने अरुंद रस्त्यामुळे दापोडी येथील हॅरीस पुलावर अडकून पडतात. वर्दळीच्या सकाळ, संध्याकाळच्या वेळी, तसेच दिवसभर अनेकदा येथे वाहतूककोंडी होते. कोंडीत अडकून एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे वाहनचालक वैतागले आहेत. बोपोडी, खडकी बाजारकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने ही कोंडी नियमितपणे होत आहे. ही वाहतूककोंडी सुटल्याने नोकरदारांना वेळेवर कामावर जाता येते. तसेच बराच काळ वाहतूक खोळंबल्याने दूरचा प्रवास करणाऱ्या नागरिकांचेही हाल होत होते. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत व्हावी अशी मागणी केली जात होती.