शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पाणी नियोजनासाठी तारेवरची कसरत : १५ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 12:49 IST

पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ठळक मुद्देखडकवासला प्रकल्पात १८.२६ टीएमसीेच पाणीपरतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माणपालिकेने १३५० एमएलडी पाणी वापरले शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही,अशी स्थिती

पुणे: खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा कमी असूनही पुणे महापालिकेकडून सध्या १३५० एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे. मात्र, पालिकेने दररोज एवढेच पाणी वापरले तर १५ जुलैपर्यंत धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही.परिणामी पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.खडकवासला धरण प्रकल्पात सोमवारी (दि.२४) केवळ १८.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यात जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासनातील वादाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही.पालिकेने १३५० एमएलडी पाणी वापरले शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही,अशी स्थिती आहे.त्यामुळे पालिकेने ११५० एमएलडीपाणी वापरावे,अशी सूचना जलसंपदा विभागाने पालिकेला केली आहे.परंतु,त्यावर कोणताही निर्णय होत  नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अनेक अडचणी येत आहेत.त्यातच गेल्या आठ वर्षाचा विचार करता २०१५ वगळता खडकवासला धरण प्रकल्पात सर्वात कमी पाणीसाठा आहे.जलसंपदा विभागातर्फे 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. त्यातही १५ जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास १५ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात ठेवावा लागतो. त्यामुळे 15 जुलैनंतरही धरणात २ ते २.५ टीएमसी पाणीसाठी असणे आवश्यक आहे. परंतु, पिण्यासाठी लागणारे पाणी, कृषीसाठी सोडले जाणारी पाणी आणि बाष्पीभवनामुळे कमी होणारा धरणातील पाणीसाठा याचा विचार केला. तर सध्यस्थितीत धरणातील पाणी कमी पडत आहे. एका वर्षापूर्वी धरण प्रकल्पात २४ डिसेंबर २०१५ रोजी १२.८८ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता.मात्र,त्यावेळी पालिकेकडून मानसी ३०३ एलपीसीडी (दरडोई ) पाण्याचा वापर केला जात आहे. परंतु, २०१८ मध्ये मानसी ३५६ एलपीसीडी पाणी वापरले जात आहे.तसेच २४ डिसेंबर २०११ रोजी सुध्दा धरणात केवळ १९.७२ टीएमसी एवढाचा पाणीसाठा होता. त्यावेळीही पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात आला होता. परंतु, सध्यस्थितीत पाणी वापराबाबत कोणतीही काटकसर केली जात नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अडचण येत आहे.------------------------

उपलब्ध पाणीसाठा आणि वापरले जाणारे पाणी

पाटबंधारे विभागाला दुसरे रब्बीचे आवर्तन आणि उन्हाळी आवर्तन असे एकूण सुमारे ७.५ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.तसेच पालिकेकडून सध्या वापरल्या जात असलेल्या पाण्याचा विचार करता पिण्यासाठी तब्बल ९.५० ते १० टीएमसी पाणी द्यावे लागेल.त्याचप्रमाणे सुमारे २ ते २.५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे.त्यातच सर्व पाणी संपणार आहे. मात्र,शेतक-यांनी व पालिकेने प्रत्येकी एक टीएमसी पाणी कमी वापरले तरच १५ जुलैपर्यंतचे पाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

खडकवासला धरण प्रकल्पाची २४ डिसेंबर रोजीची ८ वर्षांची आकडेवारी दिनांक         धरणसाठा २४/१२/२०११        १९.७२२४/१२/२०१२        २०.१२२४/१२/२०१३        २२.६८२४/१२/२०१४        २२.०३२४/१२/२०१५        १२.८८२४/१२/२०१६        २१.८३२४/१२/२०१७        २२.९६२४/१२/२०१८        १८.२६---------------------------------खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा (१८.२६)खडकवासला-१.१६,पानशेत- ७.२८,वरसगाव-९.६९,टेमघर -०.१३,

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका