शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पुण्याच्या पाणी नियोजनासाठी तारेवरची कसरत : १५ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 12:49 IST

पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ठळक मुद्देखडकवासला प्रकल्पात १८.२६ टीएमसीेच पाणीपरतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माणपालिकेने १३५० एमएलडी पाणी वापरले शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही,अशी स्थिती

पुणे: खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा कमी असूनही पुणे महापालिकेकडून सध्या १३५० एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे. मात्र, पालिकेने दररोज एवढेच पाणी वापरले तर १५ जुलैपर्यंत धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही.परिणामी पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.खडकवासला धरण प्रकल्पात सोमवारी (दि.२४) केवळ १८.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यात जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासनातील वादाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही.पालिकेने १३५० एमएलडी पाणी वापरले शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही,अशी स्थिती आहे.त्यामुळे पालिकेने ११५० एमएलडीपाणी वापरावे,अशी सूचना जलसंपदा विभागाने पालिकेला केली आहे.परंतु,त्यावर कोणताही निर्णय होत  नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अनेक अडचणी येत आहेत.त्यातच गेल्या आठ वर्षाचा विचार करता २०१५ वगळता खडकवासला धरण प्रकल्पात सर्वात कमी पाणीसाठा आहे.जलसंपदा विभागातर्फे 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. त्यातही १५ जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास १५ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात ठेवावा लागतो. त्यामुळे 15 जुलैनंतरही धरणात २ ते २.५ टीएमसी पाणीसाठी असणे आवश्यक आहे. परंतु, पिण्यासाठी लागणारे पाणी, कृषीसाठी सोडले जाणारी पाणी आणि बाष्पीभवनामुळे कमी होणारा धरणातील पाणीसाठा याचा विचार केला. तर सध्यस्थितीत धरणातील पाणी कमी पडत आहे. एका वर्षापूर्वी धरण प्रकल्पात २४ डिसेंबर २०१५ रोजी १२.८८ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता.मात्र,त्यावेळी पालिकेकडून मानसी ३०३ एलपीसीडी (दरडोई ) पाण्याचा वापर केला जात आहे. परंतु, २०१८ मध्ये मानसी ३५६ एलपीसीडी पाणी वापरले जात आहे.तसेच २४ डिसेंबर २०११ रोजी सुध्दा धरणात केवळ १९.७२ टीएमसी एवढाचा पाणीसाठा होता. त्यावेळीही पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात आला होता. परंतु, सध्यस्थितीत पाणी वापराबाबत कोणतीही काटकसर केली जात नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अडचण येत आहे.------------------------

उपलब्ध पाणीसाठा आणि वापरले जाणारे पाणी

पाटबंधारे विभागाला दुसरे रब्बीचे आवर्तन आणि उन्हाळी आवर्तन असे एकूण सुमारे ७.५ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.तसेच पालिकेकडून सध्या वापरल्या जात असलेल्या पाण्याचा विचार करता पिण्यासाठी तब्बल ९.५० ते १० टीएमसी पाणी द्यावे लागेल.त्याचप्रमाणे सुमारे २ ते २.५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे.त्यातच सर्व पाणी संपणार आहे. मात्र,शेतक-यांनी व पालिकेने प्रत्येकी एक टीएमसी पाणी कमी वापरले तरच १५ जुलैपर्यंतचे पाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

खडकवासला धरण प्रकल्पाची २४ डिसेंबर रोजीची ८ वर्षांची आकडेवारी दिनांक         धरणसाठा २४/१२/२०११        १९.७२२४/१२/२०१२        २०.१२२४/१२/२०१३        २२.६८२४/१२/२०१४        २२.०३२४/१२/२०१५        १२.८८२४/१२/२०१६        २१.८३२४/१२/२०१७        २२.९६२४/१२/२०१८        १८.२६---------------------------------खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा (१८.२६)खडकवासला-१.१६,पानशेत- ७.२८,वरसगाव-९.६९,टेमघर -०.१३,

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका