शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुण्याच्या पाणी नियोजनासाठी तारेवरची कसरत : १५ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 12:49 IST

पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ठळक मुद्देखडकवासला प्रकल्पात १८.२६ टीएमसीेच पाणीपरतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माणपालिकेने १३५० एमएलडी पाणी वापरले शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही,अशी स्थिती

पुणे: खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा तब्बल पाच टीएमसी पाणीसाठा कमी असूनही पुणे महापालिकेकडून सध्या १३५० एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे. मात्र, पालिकेने दररोज एवढेच पाणी वापरले तर १५ जुलैपर्यंत धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही.परिणामी पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.खडकवासला धरण प्रकल्पात सोमवारी (दि.२४) केवळ १८.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यात जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासनातील वादाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही.पालिकेने १३५० एमएलडी पाणी वापरले शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडता येणार नाही,अशी स्थिती आहे.त्यामुळे पालिकेने ११५० एमएलडीपाणी वापरावे,अशी सूचना जलसंपदा विभागाने पालिकेला केली आहे.परंतु,त्यावर कोणताही निर्णय होत  नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अनेक अडचणी येत आहेत.त्यातच गेल्या आठ वर्षाचा विचार करता २०१५ वगळता खडकवासला धरण प्रकल्पात सर्वात कमी पाणीसाठा आहे.जलसंपदा विभागातर्फे 15 जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. त्यातही १५ जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास १५ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा धरणात ठेवावा लागतो. त्यामुळे 15 जुलैनंतरही धरणात २ ते २.५ टीएमसी पाणीसाठी असणे आवश्यक आहे. परंतु, पिण्यासाठी लागणारे पाणी, कृषीसाठी सोडले जाणारी पाणी आणि बाष्पीभवनामुळे कमी होणारा धरणातील पाणीसाठा याचा विचार केला. तर सध्यस्थितीत धरणातील पाणी कमी पडत आहे. एका वर्षापूर्वी धरण प्रकल्पात २४ डिसेंबर २०१५ रोजी १२.८८ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता.मात्र,त्यावेळी पालिकेकडून मानसी ३०३ एलपीसीडी (दरडोई ) पाण्याचा वापर केला जात आहे. परंतु, २०१८ मध्ये मानसी ३५६ एलपीसीडी पाणी वापरले जात आहे.तसेच २४ डिसेंबर २०११ रोजी सुध्दा धरणात केवळ १९.७२ टीएमसी एवढाचा पाणीसाठा होता. त्यावेळीही पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात आला होता. परंतु, सध्यस्थितीत पाणी वापराबाबत कोणतीही काटकसर केली जात नसल्याने जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करताना अडचण येत आहे.------------------------

उपलब्ध पाणीसाठा आणि वापरले जाणारे पाणी

पाटबंधारे विभागाला दुसरे रब्बीचे आवर्तन आणि उन्हाळी आवर्तन असे एकूण सुमारे ७.५ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.तसेच पालिकेकडून सध्या वापरल्या जात असलेल्या पाण्याचा विचार करता पिण्यासाठी तब्बल ९.५० ते १० टीएमसी पाणी द्यावे लागेल.त्याचप्रमाणे सुमारे २ ते २.५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे.त्यातच सर्व पाणी संपणार आहे. मात्र,शेतक-यांनी व पालिकेने प्रत्येकी एक टीएमसी पाणी कमी वापरले तरच १५ जुलैपर्यंतचे पाण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

खडकवासला धरण प्रकल्पाची २४ डिसेंबर रोजीची ८ वर्षांची आकडेवारी दिनांक         धरणसाठा २४/१२/२०११        १९.७२२४/१२/२०१२        २०.१२२४/१२/२०१३        २२.६८२४/१२/२०१४        २२.०३२४/१२/२०१५        १२.८८२४/१२/२०१६        २१.८३२४/१२/२०१७        २२.९६२४/१२/२०१८        १८.२६---------------------------------खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा (१८.२६)खडकवासला-१.१६,पानशेत- ७.२८,वरसगाव-९.६९,टेमघर -०.१३,

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका