शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिद्द, कठोर मेहनतीची आवश्यकता - तेजश्री नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:46 IST

तेजश्री नाईक म्हणाल्या, यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी व आत्मविश्वास अंगी असणे गरजेचे आहे. तो आत्मविश्वास मनात ठेवून मी खेळायला सुरुवात केली.

तेजश्री नाईक म्हणाल्या, यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी व आत्मविश्वास अंगी असणे गरजेचे आहे. तो आत्मविश्वास मनात ठेवून मी खेळायला सुरुवात केली. वयाच्या ९ व्या वर्षापासून मी हा खेळ खेळत आहे. यामध्ये मला सर्वात जास्त माझ्या आई-वडिलांची प्रेरणा मिळाली. माझ्या खेळासाठी मला ते खूप मदत करीत होते. त्याचबरोबर क्रीडा मार्गदर्शक भास्कर भोसले यांनी मला या खेळासाठी मार्गदर्शन केले. २००६ मध्ये मी पोहण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर २००८ मध्ये पहिली राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा झाली. त्यामध्येही मी भाग घेतला. नंतर मला ट्रायथलॉन खेळाची माहिती मिळाली व त्यामध्ये मला आवड निर्माण झाल्याने मी त्याचा सराव सुरू केला, यानंतर माझी निवड ट्रायथलॉन स्पर्धेत झाली. मी याचा सराव सुरू केला. २००८ ला माझी राज्यस्तरीय स्पर्धा झाली. त्यानंतर २०१५ पर्यंत मी हा खेळ खेळत आली आहे. ट्रायथलॉन खेळ म्हणजे या खेळात दीड किलोमीटर पोहणे, ४० किलोमीटर सायकलिंग, १० किलोमीटर पळणे हे तीन खेळ सलग न थांबता खेळायला लागतात. माझी जेव्हा २०१५ ची राष्ट्रीय स्पर्धा केरला येथे झाली त्यामध्ये मला रौप्य आणि कांस्यपदके मिळाली, यांनतर वडिलांच्या निधनानंतर मी खेळामध्ये अंतर ठेवले. खेळापासून लांब गेल्याने मी खूप विचलित झाल्यामुळे मला माझ्या काका राजेंद्र नाईक यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे मी पुन्हा खेळासाठी सराव सुरू केला.नाईक म्हणाल्या, की मी जेव्हापासून खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मला ८ पदके मिळाली. एकूण २ सुवर्णपदके मिळाली. एकावेळी ३ खेळ खेळणे हे खूप अवघड आहे. यासाठी पूर्णपणे ऊर्जा, आपली मानसिक तयारी असणे गरजेचे असते. मन एकाग्र करून हा खेळ खेळावा लागतो. सहजासहजी कोणतेही यश मिळविता येत नाही. त्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि अंगी आत्मविश्वास असावा लागतो, तरच अनेक अडथळ्यांवर मात करून यशाला गवसणी घालता येते, तुमच्याकडे चांगले ज्ञान असेल किंवा साहसी खेळातील अनुभव आणि तांत्रिक ज्ञान असेल तर या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. जर तरुणाईला खेळामध्ये याची मनापासून आवड, आणि कौशल्य तुमच्या अंगी असेल तर यश हे नक्कीच मिळते. आजच्या युगामध्ये शारीरिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी व ताण-तणाव कमी करण्यासाठी खेळणे व निरोगी राहण्याचे महत्त्व जपणे आवश्यक आहे. ट्रायथलॉन खेळात आजच्या तरुणाईला करिअर करण्याची संधी आहे. यामध्ये एशियन स्पर्धा खेळण्याची संधी मिळते. जर आपल्याला ट्रायथलॉन या खेळामध्ये करिअर करायचे असेल तर त्यासाठी जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत अंगी असेल तर आणि तरच अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात. खेळासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण, साधनसामग्री, क्रीडांगण आणि पोषक आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देऊन उत्तम खेळ खेळला तर क्रीडा या माध्यमातून देशाची तरुण पिढी सक्षम होईलच; पण देशालाही जगात सन्मान मिळेल. माझ्या यशाच्या मागे माझ्या आई-वडील, तसेच काका यांचा पाठिंबा असल्याने मी आज पुरस्कार प्राप्त करू शकले.हा पुरस्कार त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे. मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळणे माझ्या वडिलांचे व काकांचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले कारण माझ्यासाठी ते खूप झटले, नेहमी त्यांनी मला मार्गदर्शन केले. पण आज ते माझ्यासोबत नाहीत, याची खंत मला नेहमी जाणवेल, असे तेजश्री नाईक यांनी सांगितले.