शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

..घरकुलवाले पाय पसरी!

By admin | Updated: December 20, 2014 00:16 IST

घरकुलचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी २००८ पासून तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा केलेल्या घरकुल लाभार्थींपैकी काहींना नशिबाने साथ दिली.

रिटा कदम, पिंपरीघरकुलचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी २००८ पासून तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा केलेल्या घरकुल लाभार्थींपैकी काहींना नशिबाने साथ दिली. २०१४ मध्ये त्यांना स्वस्तातील घरकुल मिळाले. भूखंड आणि सदनिकांचे दर गगनाला भिडले असताना या शहरात हक्काच्या घराचे स्वप्न साकारणे धूसर झाले होते. अशा परिस्थितीत हक्काचे घरकुल मिळाले. अवघ्या पावणेचार लाखांत, तेही सुलभ हप्त्याने घरकुलाचा ताबा मिळाला. ताबा मिळाल्यानंतर वर्ष पूर्ण होण्याअगोदरच काहींनी गॅलरीत दुकान थाटले आहे. दिली ओसरी, घरकुलवाले पाय पसरी अशी परिस्थिती घरकुल प्रकल्पाच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनर्निर्माण विकास अभियानांतर्गत (जेएनयूआरएम) महापालिकेने शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरकुल प्रकल्प राबवला आहे. १३ हजार २५० घरांच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ६७२० लाभार्थ्यांना घरकुल बांधून दिली आहेत.निधीची कमतरता भासल्याने दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प बारगळला. उर्वरित संभाव्य लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. ज्यांना घरकुल मिळाले, त्यांनी मात्र लगेच मनमानी सुरू केली आहे. राहण्यासाठी मिळालेल्या घरकुलात अशा प्रकारे विनापरवाना दुकान थाटून पैसे कमाविण्याचा पर्याय काही रहिवाशांनी शोधला आहे. किराणा मालाचे दुकान, गुटखा, पान-बिडी विक्री अशा स्वरूपाची दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत. अतिशय धोकादायक पद्धतीने दुकाने चालवली जात आहेत. शहरातील इतर किराणा दुकानात साहित्य असते, त्याच प्रकारे घरकुलच्या बाल्कनीत दुकाने थाटण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारचे शॉप अ‍ॅक्ट परवाना नाही की, अधिकाऱ्यांची परवानगी नाही अशा स्वरूपात वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. कुलस्वामिनी आणि कल्पतरू या घरकुल इमारतींवरून पडून दोन तरूणी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. बाल्कनीतून पडून मृत्यू होण्याच्या घटनांमुळे घरकुल प्रकल्प चर्चेत आला असताना अशा पद्धतीची धोकादायक दुकाने थाटली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घरकुलमध्ये या ना त्या कारणाने अपघात झाले आहेत. कित्येक वेळा बेल वाजली की, घरातील लहान मुले धावत बाल्कनीत येतात आणि खाली वाकून वस्तूची सेवा पुरवतात. आधीच धोकादायक कठड्यांवरून होणारी अपघातांची मालिका आणि यात कुटुंबीय आपल्या चिमुरड्यांचा जीव धोक्यात टाकत आहेत. घरकुलात राहण्यास येण्याअगोदर अनेक रहिवाशांनी ठिकठिकाणी दुकानांचे फलक लावण्याची घाई केली आहे.