शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास सांगवी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा : ग्रामस्थांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 14:45 IST

वर्षानुवर्ष कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न कायम; जुन्या जलवाहिन्या बदल्याची मागणी 

सांगवी : सांगवी (ता. बारामती ) ग्रामपंचायतीकडून अपुरा,अनियमित व अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना राबवून स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास महिला व आबालवृद्धांसह ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच भानुदास जगताप यांनी ग्रामपंचायतीस निवेदनाद्वारे दिला आहे.

सध्या जिल्ह्यात सामाधानकारक पाऊस झाला असताना देखील परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. पाणी मुबलक असून देखील पाणी पुरवठ्याच्या योग्य नियोजन अभावी मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सांगवी गावात दोन दिवसाआड दूषित व अपुऱ्या पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. मिलिंदनगर येथे वर्षानुवर्ष पाण्याचा प्रश्न कायम असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. गावात दोन दिवसाआड पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने तीन ते चार दिवस पाणी कसे पूरवायचे हा मोठा प्रश्न आता ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायतीची दीड लाख क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. पाणी पुरवठा करत असताना पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरलेली असताना सोडल्यास पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत असतो,गावात इतर ठिकाणी पूर्वीपासून चार इंच पाईपलाईन आहेत. तर मिलिंदनगर येथे तीन इंच पाईपलाईन असल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यातही तीन दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने आता संतप्त महिलांनी शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे....................................मिलिंदनगर परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार योग्य ती काळजी घेऊन स्वच्छ व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार आहोत. 

- चंद्रकांत तावरे, सरपंच सांगवी ग्रामपंचायत........................सध्या कॅनॉलच्या कामकाजामुळे साठवण तलावात पाणी अल्प प्रमाणात असल्याने पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. मागील महिनाभरापूर्वी जल प्राधिकरणाने सांगवीतील जुन्या पाण्याच्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गावातील सर्वच नवीन जलवाहिन्यांचे नव्याने कामकाज करण्यात येणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे चालत असलेली पाण्याची समस्या मिटणार आहे. - संजय चांदगुडे, ग्रामविकास अधिकारी. 

टॅग्स :BaramatiबारामतीMorchaमोर्चाgram panchayatग्राम पंचायतWaterपाणी