शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

वनजमिनीवरील अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 03:02 IST

वाणेवाडी, नगदवाडी कांदळी, हिवरेतर्फे नारायणगाव वनहद्दीत येणाऱ्या नारायणगड परिसरात आदिवासी समाजातील लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुरुवारी सकाळपासून वनविभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हाती घेतली.

कांदळी वडगाव  - येथील वाणेवाडी, नगदवाडी कांदळी, हिवरेतर्फे नारायणगाव वनहद्दीत येणाऱ्या नारायणगड परिसरात आदिवासी समाजातील लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुरुवारी सकाळपासून वनविभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या हाती घेतली. या कारवाईत एकूण ६३ कुटुंबांच्या झोपड्या हटविण्यात आल्या. उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर, आंबेगाव आणि खेड येथील १५० हून अधिक वनसंरक्षकांनी ही कारवाई केली.नारायणगड परिसरातील वनविभागाच्या जागेवर काही आदिवासी नागरिकांनी झोपड्या बांधून अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात वनविभागाने यासंदर्भात या समाजाच्या लोकांना वेळोवेळी जाहीर नोटिसा देऊन सुचित केले होते. परंतु; त्यांनी त्याला प्रतिसाद न दिल्याने जुन्नर येथील वनविभागाचे अधिकारी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर, आंबेगाव आणि खेड येथील १५० हून अधिक वनसंरक्षकांनी धडक कार्यवाही केली. या मोहिमेत आदिवासी समाजाच्या एकूण ६३ कुटुंबांच्या झोपड्या पाडण्यात आल्या. परंतु; यावेळी आदिवासी समाजाची लोकं त्याठिकाणी उपस्थित नव्हती. या कार्यवाही दरम्यान जुन्नरचेतहसीलदार किरण काकडे, जुन्नरचे पोलीस उपाधीक्षक राम पठारे, नारायणगाव सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड कार्यवाही दरम्यान उपस्थित होते.वनविभागाच्या जागेवर मागील वर्षी लोकशासन आंदोलकानी अतिक्रमण केले होते. त्यावेळी देखील अशाच पद्धतीने वनविभागाने कार्यवाही केलेली होती. परंतु, त्यावेळी कार्यवाहीला हिंसक वळण लगले होते. त्यामुळे प्रशासनाने अगोदरच काळजी घेत या समाजातील विध्वंसक प्रवृत्तीच्या १३ लोकांना दि.१३ जून रोजी हिवरेतर्फे नारायणगाव येथून अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.भोळ्या लोकांना दिला जातोय चुकीचा सल्ला1या आदिवासी समाजातील लोकांना अतिक्रमण करा, असा सल्ला दिला जातो. तुम्ही वर्षानुवर्षे त्याठिकाणी राहिलात तर तुम्हाला ती जमीन मिळेल, अशी चुकीची माहिती पुरविली जाते.2यामुळे हा समाज वारंवार अतिक्रमण करतो, अशी प्रतिक्रिया जुन्नरचे वनविभागाचे अधिकारी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांनी दिली. परंतु, अशा चुकीच्या पद्धतीने केलेल्या अतिक्रमण कायद्याच्या विरोधात आहे आणि अशा जबरदस्तीने केलेल्या हस्तगत केलेल्या जमिनी शासन कुणालाही देत नाही, असेही ते यावेळी म्हणाले व अशा प्रवृत्तीच्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याकडे मागेपुढे पाहणार नाही, अशी तंबी यावेळी दिली.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या