शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

२१ व्या शतकात निम्मे तरुण नोकरीस अपात्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:36 IST

२०३० मध्ये जवळपास निम्म्याहून अधिक दक्षिण आशियाई विद्यार्थी हे कौशल्याअभावी नोकरी मिळण्यास अपात्र ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज युनिसेफ संस्थेने वर्तवला आहे.

- नेहा सराफ पुणे : २०३० मध्ये जवळपास निम्म्याहून अधिक दक्षिण आशियाई विद्यार्थी हे कौशल्याअभावी नोकरी मिळण्यास अपात्र ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज युनिसेफ संस्थेने वर्तवला आहे. युनिसेफच्या प्रमुख हेंद्रिटा फोर यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या अभ्यासात भारतासह बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, भूतान, मालदीव, श्रीलंका या देशांचा समावेश आहे.दररोज दक्षिण आशियाई देशांमधून सुमारे १ लाख तरुण हे नोकरी वतुर्ळात आशेने प्रवेश करतात. आधीच जागतिक मंदीमुळे दक्षिण आशियातले देश कठीण कालखंडातून जात आहेत. सध्या या देशातले हजारो तरुण बेरोजगारीला तोंड देत आहेत. त्यातच भविष्यात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य अभावामुळे होणारे नुकसान मोठे असणार आहे. फोर यांच्या मते, कुशल तरुणांच्या कौशल्याचा परिणाम हा थेट त्या देशाचा आर्थिक विकासावर होतो. भारतात सध्या अशा तरुणांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातही बेरोजगारीचा अधिक फटका बसू शकतो असा इशाराही यात देण्यात आलेला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी संस्थेच्या मते बेरोजगारीचा दर सध्या ८.४५ टक्के आहे. आॅटो, टेलिकॉम आणि आयटीसारख्या क्षेत्रात हा दर अधिक असल्याचे दिसत आहे.>ठळक मुद्देकौशल्याअभावी भविष्यात लाखो विद्यार्थी नोकरीविनाभारताला बसणार सर्वाधिक फटकाबांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान,भूतान, मालदीव, श्रीलंकेलाहीभेडसावणार प्रश्न>हे उपाय आवश्यकसरकारकडून वेळोवेळी बाजारात नोकरीच्या संधी असणाऱ्या क्षेत्राचे परीक्षणशिक्षण देताना लेखी शिक्षणासोबत प्रात्यक्षिकावर भर देण्याची गरजकरिअरचे पारंपरिक पर्याय न निवडता वेगळ्या संधींची निवड>दक्षिण आशियातील देशांमध्ये कौशल्यविकासासह शिक्षण घेण्याचे प्रमाणदेशाचे नाव २०१९ २०१३ (अंदाज)बांगलादेश २६% ५५%भूतान ४७% ८१%भारत १९% ४७%मालदीव १६% ४६%नेपाळ १८% ४०%पाकिस्तान १८% ४०%श्रीलंका ६१% ६८%>मुळात शिक्षणाच्या पद्धतींमध्ये बदल होण्याची गरज आहे. नुसते अभ्यासक्रम तयार करण्यापेक्षा मार्केटच्या गरजा बघून प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. याशिवाय मार्केटच्या गरजा कळण्यासाठी सरकारने किमान सहा महिन्यांनी सर्वेक्षण करावे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अभ्यासक्रम निवडताना समुपदेशन करणे योग्य ठरते.- डॉ. स्वाती मुजुमदार,प्र-कुलगुरू, सिम्बायोसिसकौशल्य विद्यापीठ, पुणे>पाठ्यपुस्तकात सांगितलेल्या अभ्यासाच्या पलीकडे आता प्रात्यक्षिकांवर भर देण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर येणाºया काळात विद्यार्थी मागे पडू शकतात. कौशल्य विकास हा विषय प्रत्येक क्षेत्रात वेगळा असला तरी अत्यावश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा जरूर अभ्यास करावा आणि अनुभव घ्यावा, तरच आगामी काळातल्या बदलांना ते सामोरे जाऊ शकतील.- डॉ. पूजा मोरे,समन्वयक कौशल विकास केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ