शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
2
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
3
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
4
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
5
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
6
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
7
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
8
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
9
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
10
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
11
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
12
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
13
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
14
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
15
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
16
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
17
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
19
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
20
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी

२१ व्या शतकात निम्मे तरुण नोकरीस अपात्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:36 IST

२०३० मध्ये जवळपास निम्म्याहून अधिक दक्षिण आशियाई विद्यार्थी हे कौशल्याअभावी नोकरी मिळण्यास अपात्र ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज युनिसेफ संस्थेने वर्तवला आहे.

- नेहा सराफ पुणे : २०३० मध्ये जवळपास निम्म्याहून अधिक दक्षिण आशियाई विद्यार्थी हे कौशल्याअभावी नोकरी मिळण्यास अपात्र ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज युनिसेफ संस्थेने वर्तवला आहे. युनिसेफच्या प्रमुख हेंद्रिटा फोर यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या अभ्यासात भारतासह बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, भूतान, मालदीव, श्रीलंका या देशांचा समावेश आहे.दररोज दक्षिण आशियाई देशांमधून सुमारे १ लाख तरुण हे नोकरी वतुर्ळात आशेने प्रवेश करतात. आधीच जागतिक मंदीमुळे दक्षिण आशियातले देश कठीण कालखंडातून जात आहेत. सध्या या देशातले हजारो तरुण बेरोजगारीला तोंड देत आहेत. त्यातच भविष्यात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य अभावामुळे होणारे नुकसान मोठे असणार आहे. फोर यांच्या मते, कुशल तरुणांच्या कौशल्याचा परिणाम हा थेट त्या देशाचा आर्थिक विकासावर होतो. भारतात सध्या अशा तरुणांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातही बेरोजगारीचा अधिक फटका बसू शकतो असा इशाराही यात देण्यात आलेला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी संस्थेच्या मते बेरोजगारीचा दर सध्या ८.४५ टक्के आहे. आॅटो, टेलिकॉम आणि आयटीसारख्या क्षेत्रात हा दर अधिक असल्याचे दिसत आहे.>ठळक मुद्देकौशल्याअभावी भविष्यात लाखो विद्यार्थी नोकरीविनाभारताला बसणार सर्वाधिक फटकाबांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान,भूतान, मालदीव, श्रीलंकेलाहीभेडसावणार प्रश्न>हे उपाय आवश्यकसरकारकडून वेळोवेळी बाजारात नोकरीच्या संधी असणाऱ्या क्षेत्राचे परीक्षणशिक्षण देताना लेखी शिक्षणासोबत प्रात्यक्षिकावर भर देण्याची गरजकरिअरचे पारंपरिक पर्याय न निवडता वेगळ्या संधींची निवड>दक्षिण आशियातील देशांमध्ये कौशल्यविकासासह शिक्षण घेण्याचे प्रमाणदेशाचे नाव २०१९ २०१३ (अंदाज)बांगलादेश २६% ५५%भूतान ४७% ८१%भारत १९% ४७%मालदीव १६% ४६%नेपाळ १८% ४०%पाकिस्तान १८% ४०%श्रीलंका ६१% ६८%>मुळात शिक्षणाच्या पद्धतींमध्ये बदल होण्याची गरज आहे. नुसते अभ्यासक्रम तयार करण्यापेक्षा मार्केटच्या गरजा बघून प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. याशिवाय मार्केटच्या गरजा कळण्यासाठी सरकारने किमान सहा महिन्यांनी सर्वेक्षण करावे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अभ्यासक्रम निवडताना समुपदेशन करणे योग्य ठरते.- डॉ. स्वाती मुजुमदार,प्र-कुलगुरू, सिम्बायोसिसकौशल्य विद्यापीठ, पुणे>पाठ्यपुस्तकात सांगितलेल्या अभ्यासाच्या पलीकडे आता प्रात्यक्षिकांवर भर देण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर येणाºया काळात विद्यार्थी मागे पडू शकतात. कौशल्य विकास हा विषय प्रत्येक क्षेत्रात वेगळा असला तरी अत्यावश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा जरूर अभ्यास करावा आणि अनुभव घ्यावा, तरच आगामी काळातल्या बदलांना ते सामोरे जाऊ शकतील.- डॉ. पूजा मोरे,समन्वयक कौशल विकास केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ