शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बारावी अनुत्तीर्ण हॉकीपटूला क्रीडागुणाचा ‘गोल’

By admin | Updated: June 27, 2015 23:57 IST

क्रीडा संघटनेतील वादामुळे, तसेच मुदतीमध्ये प्रस्ताव सादर न केल्याने शहरातील बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना २५ क्रीडागुणांचा लाभ मिळालेला नाही.

मिलिंद कांबळे , पिंपरी क्रीडा संघटनेतील वादामुळे, तसेच मुदतीमध्ये प्रस्ताव सादर न केल्याने शहरातील बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना २५ क्रीडागुणांचा लाभ मिळालेला नाही. यामुळे वर्ष वाया जाण्याच्या भीतीने विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. या बेफिकिरीमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ सुरू झाला आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणारे महाराष्ट्र राज्यात शेकडो विद्यार्थी आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास अशा खेळाडू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार २५ गुण दिले जातात. अशा खेळाडूंची यादी संबंधित खेळाच्या राज्य संघटनेतर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे ३१ मार्चपर्यंत सादर करावी लागते. मात्र, काही संघटनांतर्फे विद्यार्थ्यांची नावे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाकडे मुदतीत दिली गेली नाहीत. त्यामुळे राज्यातील अनेक अनुत्तीर्ण खेळाडू विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना क्रीडागुणांचा लाभ मिळाला नाही. ‘‘महाराष्ट्र हॉकी संघटना अधिकृत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पत्र महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय आणि पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास १८ जूनला दिले आहे. मात्र, आॅलिम्पिक समितीच्या मान्यतेच्या प्रश्नांमुळे या संदर्भात कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. तसेच, जिल्हा क्रीडा कार्यालयास पत्र दिले आहे. मुदतीपूर्वीच पात्र पाच विद्यार्थ्यांची यादी सादर केली आहे,’’असे या संदर्भात महाराष्ट्र हॉकी संघटनेचे सचिव इक्रम खान यांनी सांगितले. अद्याप या संदर्भात उत्तर मिळाले नाही. ‘‘सर्व खेळांच्या खेळाडूंच्या याद्या मुदतीमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आल्या आहेत. अनुत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी खेळाडू जागे होतात. ३१ मार्च या ठरलेल्या मुदतीमध्ये अर्जांचे प्रस्ताव विविध क्रीडा संघटनांकडून सादर केले जातात. सदर खेळाडूंना त्यांचा लाभ मिळतो,’’अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांनी दिली. दोन वेगवेगळ्या हॉकी संघटनेच्या वादात खेळाडूला लाभ मिळाला नाही. महाराष्ट्र हॉकी संघटना आणि हॉकी महाराष्ट्र अशा दोन संघटना राज्यात कार्यरत आहेत. हा वाद न्यायालयात आहे. अधिकृत संघटना ठरत नसल्याने शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी अनुत्तीर्ण झालेल्या राज्य हॉकीपटूस क्रीडागुण मिळाले नाहीत. वर्षभरात खेळासाठी घाम गाळून उत्तम कामगिरी करूनही गुणांचा लाभ मिळत नसल्याने अनेक गुणवान खेळाडू नैराश्येच्या गर्तेत सापडले आहेत. यामुळे त्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. या नैराश्येतून विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.