शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
3
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
4
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
5
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
7
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
8
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
9
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
12
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
13
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
14
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
15
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
16
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
17
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
18
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
19
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
20
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही इंजिनिअरिंगच्या निम्म्या जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:52 IST

विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंगला जाण्याचा कमी झालेला कल यंदा जैसे थे राहिला आहे. पुणे विभागातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या ५५ हजार ४५९ पैकी २६ हजार ५४८ इतक्या निम्म्या जागा रिक्त राहिल्या आहेत.

पुणे : विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंगला जाण्याचा कमी झालेला कल यंदा जैसे थे राहिला आहे. पुणे विभागातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या ५५ हजार ४५९ पैकी २६ हजार ५४८ इतक्या निम्म्या जागा रिक्त राहिल्या आहेत. इंजिनिअरिंगच्या हजारो जागा सातत्याने रिक्त राहू लागल्याने अनेक विनाअनुदानित महाविद्यालये अडचणीत आली आहेत.पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सातारा या ५ जिल्ह्यांमध्ये १४२ इंजिनिअरिंगमध्ये ५५ हजार ४५९ जागांची क्षमता होती. प्रवेशाच्या फेºया संपल्यानंतर केवळ २१ हजार ६७४ जणांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. मॅनेजमेंट कोट्यांतर्गत ४ हजार ६४३ जागा उपलब्ध होत्या; मात्र त्यासाठी केवळ ६४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तब्बल ३ हजार ९९६ जागा रिक्त राहिल्या आहेत. अल्पसंख्याक महाविद्यालयांच्या कोट्याबाबतही तीच स्थिती असून १,३८८ पैकी केवळ ५१० जागांवर प्रवेश झाले आहेत. इंजिनिअरिंकडे विद्यार्थ्यांचा कल पुन्हा वाढेल, या अपेक्षेवर कशीबशी तग धरून राहिलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयांची स्थिती यामुळे आणखीनच बिकट बनली आहे.इंजिनिअरिंगची पदवी घेऊनही नोकरीच्या अपेक्षित संधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग करण्याचा कल कमी होत आहे. त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेजना मोठ्या प्रमाणात मान्यतांची खैरात वाटण्यात आल्यानेही परिस्थिती उद्भवली आहे. विद्यार्थ्यांकडून तांत्रिक शिक्षणासाठी दहावीनंतरच इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. हा डिप्लोमा केल्यानंतर थेट डिग्रीला दुसºया वर्षात प्रवेश मिळतो. मागील वर्षीही राज्यातील एकूण रिक्त जागांची संख्या ६१ हजार व पुणे विभागातील रिक्त जागा ३० हजार इतक्या राहिल्या होत्या.इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, सिव्हील आदी शाखांना पसंती दिलेली आहे. इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा खर्चही आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने अनेक गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घेणे अवघड जाऊ लागले आहे. केंद्र व राज्य शासनांकडून ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली असली, तरी अंमलबजावणीच्या स्तरावर अजूनही फारशा हालचाली झालेल्या नाहीत.काही नामवंत महाविद्यालयांतून कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे मिळणाºया नोकºयांचा अपवाद वगळता इंजिनिअरिंच्या पदवीवर नोकरी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकºया उपलब्ध व्हाव्यात, तसेचत्यांना लघुउद्योग करून स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.