शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

यंदाही इंजिनिअरिंगच्या निम्म्या जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:52 IST

विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंगला जाण्याचा कमी झालेला कल यंदा जैसे थे राहिला आहे. पुणे विभागातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या ५५ हजार ४५९ पैकी २६ हजार ५४८ इतक्या निम्म्या जागा रिक्त राहिल्या आहेत.

पुणे : विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंगला जाण्याचा कमी झालेला कल यंदा जैसे थे राहिला आहे. पुणे विभागातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या ५५ हजार ४५९ पैकी २६ हजार ५४८ इतक्या निम्म्या जागा रिक्त राहिल्या आहेत. इंजिनिअरिंगच्या हजारो जागा सातत्याने रिक्त राहू लागल्याने अनेक विनाअनुदानित महाविद्यालये अडचणीत आली आहेत.पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सातारा या ५ जिल्ह्यांमध्ये १४२ इंजिनिअरिंगमध्ये ५५ हजार ४५९ जागांची क्षमता होती. प्रवेशाच्या फेºया संपल्यानंतर केवळ २१ हजार ६७४ जणांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. मॅनेजमेंट कोट्यांतर्गत ४ हजार ६४३ जागा उपलब्ध होत्या; मात्र त्यासाठी केवळ ६४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तब्बल ३ हजार ९९६ जागा रिक्त राहिल्या आहेत. अल्पसंख्याक महाविद्यालयांच्या कोट्याबाबतही तीच स्थिती असून १,३८८ पैकी केवळ ५१० जागांवर प्रवेश झाले आहेत. इंजिनिअरिंकडे विद्यार्थ्यांचा कल पुन्हा वाढेल, या अपेक्षेवर कशीबशी तग धरून राहिलेल्या विनाअनुदानित महाविद्यालयांची स्थिती यामुळे आणखीनच बिकट बनली आहे.इंजिनिअरिंगची पदवी घेऊनही नोकरीच्या अपेक्षित संधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग करण्याचा कल कमी होत आहे. त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेजना मोठ्या प्रमाणात मान्यतांची खैरात वाटण्यात आल्यानेही परिस्थिती उद्भवली आहे. विद्यार्थ्यांकडून तांत्रिक शिक्षणासाठी दहावीनंतरच इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. हा डिप्लोमा केल्यानंतर थेट डिग्रीला दुसºया वर्षात प्रवेश मिळतो. मागील वर्षीही राज्यातील एकूण रिक्त जागांची संख्या ६१ हजार व पुणे विभागातील रिक्त जागा ३० हजार इतक्या राहिल्या होत्या.इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, सिव्हील आदी शाखांना पसंती दिलेली आहे. इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा खर्चही आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने अनेक गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घेणे अवघड जाऊ लागले आहे. केंद्र व राज्य शासनांकडून ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली असली, तरी अंमलबजावणीच्या स्तरावर अजूनही फारशा हालचाली झालेल्या नाहीत.काही नामवंत महाविद्यालयांतून कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे मिळणाºया नोकºयांचा अपवाद वगळता इंजिनिअरिंच्या पदवीवर नोकरी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकºया उपलब्ध व्हाव्यात, तसेचत्यांना लघुउद्योग करून स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.